शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

सुटकेच्या नावाखाली वेश्यांचे शोषण ! अभ्यासाचा निष्कर्ष -वेश्यांच्या सुटकेचे सर्व प्रयत्न निरर्थक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:17 IST

कोल्हापूर : समाजाला वेश्यामुक्त करण्यासाठी प्रशासन आणि तथाकथित कार्यकर्ते वेश्या अड्ड्यांवर छापे घालून या व्यवसायातील तरुणींची सुटका करतात; परंतु त्यातील बहुतांशी पुन्हा या व्यवसायात येत असल्याचे एका नव्या अभ्यासातून उघड झाले आहे.

ठळक मुद्देया अभ्यासासाठी छाप्यात सापडलेल्या २४३ तरुणींचे अनुभव आणि मते जाणून घेण्यात आली७७% या छाप्यांमध्ये २१८ तरुणींची सुटका करण्यात आली. त्यातील १६८ तरुणी पुन्हा या व्यवसायात परतल्या

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : समाजाला वेश्यामुक्त करण्यासाठी प्रशासन आणि तथाकथित कार्यकर्ते वेश्या अड्ड्यांवर छापे घालून या व्यवसायातील तरुणींची सुटका करतात; परंतु त्यातील बहुतांशी पुन्हा या व्यवसायात येत असल्याचे एका नव्या अभ्यासातून उघड झाले आहे. प्रशासनाचा पक्षपातीपणा, वेश्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे या व्यवसायातून सुटका होण्याऐवजी त्यांचे शोषणच होत असल्याचा निष्कर्ष निघाल्याचे हा अहवाल सांगतो. 

आंतरराष्ट्रीय वेश्या हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘रेडेड’ नावाचा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. बचाव आणि पुनर्वसन मोहिमा केवळ पक्षपाती, हिंसक आणि समाज विध्वंसकच नव्हे, तर वेश्या आणि जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या तरुणींचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्या असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील वेश्या अन्याय मुक्ती परिषद (व्हॅम्प), संग्राम ही एनजीओ आणि नेदरलँडस्थित राईटस् फॉर चेंज यांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे.

महाराष्ट्रातील सहेली एचआयव्ही/एड्स कार्यकर्ता संघ आणि आधार बहुउद्देशीय संस्था, कर्नाटकातील उत्तर कर्नाटक महिला ओक्कुट्टा, केरळमधील केरला नेटवर्क आॅफ सेक्स वर्कर्स आणि झारखंडमधील सृजन फौंडेशन यांनीही या अभ्यासात योगदान दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजूर केलेल्या मानवी व्यापार (प्रतिबंध, संरक्षण आणि पुनर्वसन) विधेयक २०१८ च्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास करण्यात आला आहे. वेश्या अड्ड्यांवरील छाप्यात सापडलेल्या, सुटका करण्यात आलेल्या आणि पुनर्वसन करण्यात आलेल्या वेश्या तरुणी यांचे अनुभव जाणून घेणे  आणि ते समाजासमोर आणणेयासाठी हा अभ्यास करण्यात आला आहे. मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा आणि धोरणांचे परिणाम याऐवजी पोलिसांचे वेश्या अड्ड्यांवर पडणारे छापे, सुटका आणि पुनर्वसन केल्या जाणाºया तरुणी यांना केंद्रस्थानी ठेवून हा अभ्यास करण्यात आला आहे. यातून निघालेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.या अभ्यासासाठी छाप्यात सापडलेल्या २४३ तरुणींचे अनुभव आणि मते जाणून घेण्यात आली. त्यातून निघालेल्या निष्कर्षानुसार..०.८२% २४३ पैकी केवळ २ तरुणी अल्पवयीन निघाल्या हे प्रमाण ०.८२ टक्के आहे.७९% २४३ पैकी १९३ तरुणींनी छाप्यावेळी आपण स्वत:हून या व्यवसायात आल्याचे सांगितले. आपली सुटका होऊ नये, असेही त्यांना वाटत होते. हे प्रमाण ७९टक्के इतके आहे.

३६% ३६ तरुणींपैकी १३ तरुणींना नुकतेच या व्यवसायासाठी आणण्यात आले होते आणि त्या या व्यवसायातच राहू इच्छित होत्या. हे प्रमाण ३६ टक्के आहे.

७७% या छाप्यांमध्ये २१८ तरुणींची सुटका करण्यात आली. त्यातील १६८ तरुणी पुन्हा या व्यवसायात परतल्या. हे प्रमाण ७७ टक्के आहे.अहवालातील काही निष्कर्षअनैतिक व्यवहार संरक्षक कायदा (आयटीपीए) यामध्ये नावातच अनैतिक आणि व्यवहार असल्यामुळे महिलांबाबत गैरअर्थ काढला जाऊन वेश्या महिलांविषयीचा दृष्टिकोन विरोधाचा होतो.२०१० ते २०१७ या काळात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचे विश्लेषण केले असता प्रकरणे वाढल्याचे दिसते. वेश्यामुक्त समाजनिर्मितीच्या धोरणाचा एक भाग म्हणून काही लॉबिज यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असाव्यात, अशी शक्यता आहे. 

न्यायालयाचे आदेश आणि निकालांचे अर्थ लावणारी कायदेशीर यंत्रणा हे वेश्या व्यवसाय हा अनैतिक असल्याचे मानणारी आहे. महिला या कुटुंबातच सुरक्षित असतात, असे त्यांचे मत असते.कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही वेश्यांच्या विरोधात आपले वजन वापरते. पोलीसही हिंसाचार, मारहाण, दंड, खंडणी यांचा वापर करतात. यामुळे कायदेशीर पद्धतीने चुकण्याची आशा खूपच कमी राहते.

एखाद्या इमारतीवर पोलिसांनी छापा टाकला, तर वेश्या असो नाही तर त्या इमारतीतील इतर महिला पोलीस कुणाचाच आदर ठेवत नाहीत. सर्वांनाच वेश्यालयातील महिलांप्रमाणे वागवतात.

कारवाईच्यावेळी एकूणच व्यवहार अनादराचा, शिवीगाळ, मानहानी आणि शारीरिक मारहाण ही ठरलेली असते.महिलांची मानहानी करणाºया सनसनाटी छाप्याच्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा गैरवापर केला जातो. खासगी हक्काचे उल्लंघन होत असल्याचे दुर्लक्षिले जाते.पोलिसांनी वेश्या अड्ड्यांवर टाकलेले छापे, केलेल्या सुटका आणि पुनर्वसन याबाबत वेश्या महिलांचे अनुभव आणि कायद्याची अंमलबजावणी करणाºया यंत्रणेचा दृष्टिकोन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा अभ्यास आहे. -मीना शेषू, सचिव, संग्राम संस्था

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार