शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

जिल्ह्यात ऊसाचे हेक्टरी १० टन जादा उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यंदा पाऊस चांगल्या राहिल्याने उसाचे उत्पादन अधिक होणार आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : यंदा पाऊस चांगल्या राहिल्याने उसाचे उत्पादन अधिक होणार आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही गावेवगळता उर्वरित जिल्ह्यांत आडसाली लागणीला सरासरी हेक्टरी दहा टनाने उत्पादकतेत वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या हंगामात १६० लाख टन उसाचे गाळप उद्दिष्ट पार करण्याची शक्यता आहे.

मागील हंगामात महापुरामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातही अनेक दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने उत्पादकतेत मोठी घट झाली होती. शेतकऱ्यांचे नुकसान झालेच, त्याचबरोबर साखर कारखान्यांची उद्दिष्ट पार करताना दमछाक झाली होती. यंदा उसाचे क्षेत्र जास्त आहे, त्यात उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी मिळाले आणि पावसाळ्यात उसाला पोषक असाच पाऊस राहिल्याने वाढ जोमात झाली. त्यामुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने १६० लाख टन गाळपाचा टप्पा पार करतील, असा अंदाज हंगामापूर्वीच व्यक्त केला होता.

हंगाम सुरू होऊन सरासरी ४५ दिवस झाले आहेत. जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ५५ लाख १८ हजार ४०२ टन उसाचे गाळप करत ६१ लाख ११ हजार ८७३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यात उसाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसते. आडसाल लागणीला सरासरी हेक्टरी दहा टन जादा ऊस मिळत आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही गावांत मात्र उत्पादकता वाढीचे हे प्रमाण कमी दिसत आहे. ऑक्टोबरअखेर राहिलेला परतीचा पाऊस व पाणथळ जमिनीमुळे उसाच्या मुळातील ओल कमी न झाल्याने वजन अपेक्षित मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

जिल्ह्यातील हेक्टरी उसाचे उत्पादन असे-

ऊस उत्पादन

आडसाल लागण ९० ते १०० टन

सुरू लागण ७० ते ७५ टन

खोडवा ६० ते ७० टन

उताऱ्यात ‘बिद्री’ अव्वल

जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १०.७८ टक्के आहे. अद्याप आडसाल लागणीचे गाळप मोठ्या प्रमाणात असल्याने उतारा कमी आहे. त्यात अनेक कारखान्यांने ‘बी. हेव्ही’ मोलॅसिस काढत असल्याने उतारा कमी दिसत आहे तरीही ‘बिद्री’ साखर कारखान्याची सर्वाधिक १२.१८ टक्के आहे.

कोट-

मागील हंगामापेक्षा यंदा उसाचे उत्पादन चांगले मिळत आहे. पूर्वेकडील तालुकेवगळता उर्वरित जिल्ह्यात हेक्टरी टनाने वाढ दिसत असल्याने उद्दिष्टापर्यंत सर्वच कारखाने मजल मारतील.

- विजय औताडे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)

- राजाराम लोंढे