शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

जिल्ह्यात ऊसाचे हेक्टरी १० टन जादा उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यंदा पाऊस चांगल्या राहिल्याने उसाचे उत्पादन अधिक होणार आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : यंदा पाऊस चांगल्या राहिल्याने उसाचे उत्पादन अधिक होणार आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही गावेवगळता उर्वरित जिल्ह्यांत आडसाली लागणीला सरासरी हेक्टरी दहा टनाने उत्पादकतेत वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या हंगामात १६० लाख टन उसाचे गाळप उद्दिष्ट पार करण्याची शक्यता आहे.

मागील हंगामात महापुरामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातही अनेक दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने उत्पादकतेत मोठी घट झाली होती. शेतकऱ्यांचे नुकसान झालेच, त्याचबरोबर साखर कारखान्यांची उद्दिष्ट पार करताना दमछाक झाली होती. यंदा उसाचे क्षेत्र जास्त आहे, त्यात उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी मिळाले आणि पावसाळ्यात उसाला पोषक असाच पाऊस राहिल्याने वाढ जोमात झाली. त्यामुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने १६० लाख टन गाळपाचा टप्पा पार करतील, असा अंदाज हंगामापूर्वीच व्यक्त केला होता.

हंगाम सुरू होऊन सरासरी ४५ दिवस झाले आहेत. जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ५५ लाख १८ हजार ४०२ टन उसाचे गाळप करत ६१ लाख ११ हजार ८७३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यात उसाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसते. आडसाल लागणीला सरासरी हेक्टरी दहा टन जादा ऊस मिळत आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही गावांत मात्र उत्पादकता वाढीचे हे प्रमाण कमी दिसत आहे. ऑक्टोबरअखेर राहिलेला परतीचा पाऊस व पाणथळ जमिनीमुळे उसाच्या मुळातील ओल कमी न झाल्याने वजन अपेक्षित मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

जिल्ह्यातील हेक्टरी उसाचे उत्पादन असे-

ऊस उत्पादन

आडसाल लागण ९० ते १०० टन

सुरू लागण ७० ते ७५ टन

खोडवा ६० ते ७० टन

उताऱ्यात ‘बिद्री’ अव्वल

जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १०.७८ टक्के आहे. अद्याप आडसाल लागणीचे गाळप मोठ्या प्रमाणात असल्याने उतारा कमी आहे. त्यात अनेक कारखान्यांने ‘बी. हेव्ही’ मोलॅसिस काढत असल्याने उतारा कमी दिसत आहे तरीही ‘बिद्री’ साखर कारखान्याची सर्वाधिक १२.१८ टक्के आहे.

कोट-

मागील हंगामापेक्षा यंदा उसाचे उत्पादन चांगले मिळत आहे. पूर्वेकडील तालुकेवगळता उर्वरित जिल्ह्यात हेक्टरी टनाने वाढ दिसत असल्याने उद्दिष्टापर्यंत सर्वच कारखाने मजल मारतील.

- विजय औताडे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)

- राजाराम लोंढे