शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांवर पॅचवर्कचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:10 IST

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी उड्डाणपूल येथेपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडल्याने वाहने जोरात आदळत आहेत.

ठळक मुद्देपाऊस ओसरल्याने डागडुजी सुरू कागल ते उजळाईवाडीपर्यंतचा प्रवास धोक्याचा

कोल्हापूर: पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी उड्डाणपूल येथेपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडल्याने वाहने जोरात आदळत आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पॅचवर्क करण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पॅचवर्कचा दर्जा पाहता आणखी एक-दोन मोठ्या पावसांतच ते पुन्हा उखडण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी येथपर्यंत जवळपास १२ ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. कर्नाटकच्या हद्दीतून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर दूधगंगा नदीच्या पुलापासून खड्ड्यांचे दर्शन सुरू होते. आरटीओ चेकपोस्ट नाक्यासमोर तर या खड्ड्याने अपघातही घडला आहे. तसेच पुढे आल्यावर कागल मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या बोगद्यावरील आणि त्याच्या पुढे गेल्यावर अखिलेश पार्कच्या समोर तर खड्ड्यांमुळे झालेली चाळण पाहिली की हा राष्ट्रीय महामार्ग आहे की गल्लीतील रस्ता असा प्रश्न पडावा असे चित्र आहे.

कागलजवळ लक्ष्मी टेकडीसमोर असलेला खड्डा तर वाहन जोरात आदळल्यानंतरच दिसतो. तीच परिस्थिती पुढे कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव आणि सुदर्शन पेट्रोल पंपासमोर आहे. वाहन चालवताना खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागते.दर उन्हाळ्यात महामार्गाची डागडुजी होते; पण यावर्षी लॉकडाऊनमुळे केवळ साईटपट्ट्या भरण्याचे काम झाले. रस्त्यांचे डांबरीकरण झालेच नाही. शिवाय पाणी वाहून जाण्यासाठी मोऱ्यांची दुरुस्तीही झाली नाही. त्यामुळे आठ दिवसांच्या पावसातच महामार्गावरील पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने खड्डे पडण्यास सुुरुवात झाली.

कागल, एमआयडीसी पूल, गोकुळ शिरगाव, सुदर्शन पेट्रोल पंप, मयूर पंप या ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहतात. यातून रस्ते खराब होत आहेत. बुधवारी या रस्त्यावर डांबर-खडीचे मिश्रण टाकून ते तात्पुरते भरण्याचे काम सुरू होते; पण त्याचा दर्जा पाहता ते आणखी दोन पावसांतच पूर्णपणे उखडून जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर