शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 01:36 IST

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, पंजाब,राजस्थान, आदी राज्यांसह आयआयटीसारख्या संस्थेने परीक्षा रद्द केली आहे.

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दोन वेळा दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात अंतिम सत्राच्या परीक्षा सध्या घेणे शक्य नाही. त्यामुळे सरासरी पद्धतीनेप्रमाणे गुण देऊन या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येईल. पण ज्या विद्यार्थ्यांना गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा द्यावयाची आहे,त्यांच्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर डिसेंबरनंतर परीक्षा घेतली जाईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, पंजाब,राजस्थान, आदी राज्यांसह आयआयटीसारख्या संस्थेने परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे यूजीसीने सद्य:स्थिती समजून घ्यावी. राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा करून, त्यांच्या शिफारशी घेऊन राज्य सरकारने अंतिम सत्राच्यापरीक्षांबाबत निर्णय घेतला आहे. अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना आता पदवी देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय यूजीसीने देशभरासाठी घ्यावा. त्याबाबचे पत्र दोन दिवसांत यूजीसीला पाठविणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी विद्यार्थिहिताचा विचार करावा, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मंत्री सामंत म्हणाले...

या वर्षीचे शुल्क परत मिळेल अथवा पुढील वर्षासाठी ते आकारावे, अशा पर्यायांचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे पालकांनी निर्धास्त राहावे. एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन कॅरी फॉरवर्ड केले जाईल. जे कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत त्यांना ग्रेस गुण दिले जातील. तरीही जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांची कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षा घेतली जाईल. ग्रंथालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. आगामी अधिवेशनात ग्रंथालयाबाबत नवे धोरण आणले जाणार आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEducationशिक्षण