शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

Kolhapur: पीकविमा ठरतोय मृगजळ; गतवर्षीची नुकसानभरपाईही हवेत अन् यंदा पंचनाम्यांना मुहूर्त सापडेना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 15:49 IST

भरपाई मिळणार तरी कधी?, शेतकरी हवालदिल

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : रुपयात पीकविमा उतरवला; पण पूर ओसरून दहा दिवस उलटले तरीही पूरबाधित पिकांचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे पूरबाधित शेतकऱ्यांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी विवंचनेत सापडलेले आहेत. विमा कंपन्यांकडून पंचनामे कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे, तर वर्षे उलटले तरीही अद्याप गतवर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून पीक संरक्षित करावे. यासाठी गत वर्षांपासून शासनाने एक रुपयात पीकविमा योजना लागू केली. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा उतरवला. परंतु, गेल्यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाईची रक्कम मिळालेली नाही.यंदा तर कागल तालुक्यातील वेदगंगा व दुधगंगा नदीकाठावरील शेकडो एकरातील उसासह भात, सोयाबीन, भुईमूग पिके कुजून गेली आहेत. यंदा तब्बल १८ दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दरम्यान, दहा-पंधरा दिवसांनंतर पूरबाधित पिके पुन्हा थोडी फार हिरवी दिसू शकतील, मात्र पुरामुळे ते अशक्त झाल्याने उत्पादकता कमी होणार आहे.भरपाई मिळणार तरी कधी?२०२३ खरीप हंगामात रामचंद्र दत्तू गोते (आनूर क्षेत्र अंदाजे ६० गुंठे), सुभाष भाऊ चौगुले (आनूर क्षेत्र अंदाजे ८४ गुंठे),लक्ष्मीबाई बाळाराम पाटील (म्हाकवे ३० गुंठे) यांनी गतवर्षी पीकविमा उतरवला होता; परंतु, नुकसान होऊनही भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कागलमधील चार टक्केच शेतकरीच पात्र

गत २०२३ खरीप हंगामात कागलमधील १५७० शेतकऱ्यांनी २८९९ विमा अर्ज दाखल केल्याने ९१३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. मात्र, केवळ ६० म्हणजे अवघ्या चार टक्के शेतकऱ्यांनाच पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. अद्याप या शेतकऱ्यांच्या हातात भरपाईची रक्कम आलेली नाहीच तर उर्वरित शेतकरी भरपाईसाठी पात्र होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.विमा प्रतिनिधी आहेत तरी कुठे?यंदाच्या २०२४ खरीप हंगामात २१७० शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी ५०४५ अर्ज दाखल करून एक हजार ३१५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ८-१० दिवसापूंर्वीच शेतावर जाऊन नुकसानीची ऑनलाइन तक्रार दाखल केली. मात्र, विमा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी अद्यापही फिरकलेलाच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी