शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पीकविमा ठरतोय मृगजळ; गतवर्षीची नुकसानभरपाईही हवेत अन् यंदा पंचनाम्यांना मुहूर्त सापडेना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 15:49 IST

भरपाई मिळणार तरी कधी?, शेतकरी हवालदिल

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : रुपयात पीकविमा उतरवला; पण पूर ओसरून दहा दिवस उलटले तरीही पूरबाधित पिकांचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे पूरबाधित शेतकऱ्यांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी विवंचनेत सापडलेले आहेत. विमा कंपन्यांकडून पंचनामे कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे, तर वर्षे उलटले तरीही अद्याप गतवर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून पीक संरक्षित करावे. यासाठी गत वर्षांपासून शासनाने एक रुपयात पीकविमा योजना लागू केली. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा उतरवला. परंतु, गेल्यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाईची रक्कम मिळालेली नाही.यंदा तर कागल तालुक्यातील वेदगंगा व दुधगंगा नदीकाठावरील शेकडो एकरातील उसासह भात, सोयाबीन, भुईमूग पिके कुजून गेली आहेत. यंदा तब्बल १८ दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दरम्यान, दहा-पंधरा दिवसांनंतर पूरबाधित पिके पुन्हा थोडी फार हिरवी दिसू शकतील, मात्र पुरामुळे ते अशक्त झाल्याने उत्पादकता कमी होणार आहे.भरपाई मिळणार तरी कधी?२०२३ खरीप हंगामात रामचंद्र दत्तू गोते (आनूर क्षेत्र अंदाजे ६० गुंठे), सुभाष भाऊ चौगुले (आनूर क्षेत्र अंदाजे ८४ गुंठे),लक्ष्मीबाई बाळाराम पाटील (म्हाकवे ३० गुंठे) यांनी गतवर्षी पीकविमा उतरवला होता; परंतु, नुकसान होऊनही भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कागलमधील चार टक्केच शेतकरीच पात्र

गत २०२३ खरीप हंगामात कागलमधील १५७० शेतकऱ्यांनी २८९९ विमा अर्ज दाखल केल्याने ९१३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. मात्र, केवळ ६० म्हणजे अवघ्या चार टक्के शेतकऱ्यांनाच पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. अद्याप या शेतकऱ्यांच्या हातात भरपाईची रक्कम आलेली नाहीच तर उर्वरित शेतकरी भरपाईसाठी पात्र होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.विमा प्रतिनिधी आहेत तरी कुठे?यंदाच्या २०२४ खरीप हंगामात २१७० शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी ५०४५ अर्ज दाखल करून एक हजार ३१५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ८-१० दिवसापूंर्वीच शेतावर जाऊन नुकसानीची ऑनलाइन तक्रार दाखल केली. मात्र, विमा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी अद्यापही फिरकलेलाच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी