शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पीकविमा ठरतोय मृगजळ; गतवर्षीची नुकसानभरपाईही हवेत अन् यंदा पंचनाम्यांना मुहूर्त सापडेना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 15:49 IST

भरपाई मिळणार तरी कधी?, शेतकरी हवालदिल

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : रुपयात पीकविमा उतरवला; पण पूर ओसरून दहा दिवस उलटले तरीही पूरबाधित पिकांचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे पूरबाधित शेतकऱ्यांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी विवंचनेत सापडलेले आहेत. विमा कंपन्यांकडून पंचनामे कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे, तर वर्षे उलटले तरीही अद्याप गतवर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून पीक संरक्षित करावे. यासाठी गत वर्षांपासून शासनाने एक रुपयात पीकविमा योजना लागू केली. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा उतरवला. परंतु, गेल्यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाईची रक्कम मिळालेली नाही.यंदा तर कागल तालुक्यातील वेदगंगा व दुधगंगा नदीकाठावरील शेकडो एकरातील उसासह भात, सोयाबीन, भुईमूग पिके कुजून गेली आहेत. यंदा तब्बल १८ दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

दरम्यान, दहा-पंधरा दिवसांनंतर पूरबाधित पिके पुन्हा थोडी फार हिरवी दिसू शकतील, मात्र पुरामुळे ते अशक्त झाल्याने उत्पादकता कमी होणार आहे.भरपाई मिळणार तरी कधी?२०२३ खरीप हंगामात रामचंद्र दत्तू गोते (आनूर क्षेत्र अंदाजे ६० गुंठे), सुभाष भाऊ चौगुले (आनूर क्षेत्र अंदाजे ८४ गुंठे),लक्ष्मीबाई बाळाराम पाटील (म्हाकवे ३० गुंठे) यांनी गतवर्षी पीकविमा उतरवला होता; परंतु, नुकसान होऊनही भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कागलमधील चार टक्केच शेतकरीच पात्र

गत २०२३ खरीप हंगामात कागलमधील १५७० शेतकऱ्यांनी २८९९ विमा अर्ज दाखल केल्याने ९१३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते. मात्र, केवळ ६० म्हणजे अवघ्या चार टक्के शेतकऱ्यांनाच पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. अद्याप या शेतकऱ्यांच्या हातात भरपाईची रक्कम आलेली नाहीच तर उर्वरित शेतकरी भरपाईसाठी पात्र होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.विमा प्रतिनिधी आहेत तरी कुठे?यंदाच्या २०२४ खरीप हंगामात २१७० शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी ५०४५ अर्ज दाखल करून एक हजार ३१५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ८-१० दिवसापूंर्वीच शेतावर जाऊन नुकसानीची ऑनलाइन तक्रार दाखल केली. मात्र, विमा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी अद्यापही फिरकलेलाच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी