शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पदे मस्त, तरी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते अस्वस्थ; सत्ता येऊन दहा महिने झाले तरी नव्या नियुक्त्या नाहीत

By समीर देशपांडे | Updated: April 25, 2023 12:55 IST

याआधी झाला होता भ्रमनिरास

समीर देशपांडेकोल्हापूर : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येऊन दहा महिने झाले तरी शासनाची विविध महामंडळे, समित्यांवर नेते, कार्यकर्त्यांना अजूनही संधी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.महाविकास आघाडीचे सरकार असतानाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होऊन विविध समित्यांवर नेते, कार्यकर्ते यांना संधी देण्यासाठी विलंब झाला आणि अडीच वर्षे सरकार असूनही कार्यकर्त्यांना संधी देता आली नव्हती. जिल्हा नियोजन समितीवर ज्यांची नियुक्ती केली होती त्यांना एकही बैठक हजर राहता आली नाही तोपर्यंत उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि सरकारच पडले.त्यानंतर शिंदे, फडणवीस यांचे सरकार येऊन दहा महिने होत आले. परंतु काही तालुक्यांच्या संजय गांधी निराधार समितीच्या निवडी सोडल्या तर अनेक महामंडळे, समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी फारशी आग्रही भूमिका घेताना कोणी दिसत नाही अशी परिस्थिती आहे. एकीकडे लोकसभेला मिळेल त्याचा पाठिंबा घेण्याची तयारी भाजपने सुरू केली असताना वेळ पडली तर आपल्या कार्यकर्त्यांना गप्प करता येईल परंतु पाठबळ देणाऱ्या इतरांना बळ देण्याची भूमिका भाजप घेताना दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेते, कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय प्रामु्ख्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक घेतील असे दिसते. तर शिवसेनेकडून नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने हे या निर्णय प्रक्रियेत असतील. त्यादृष्टीने प्राथमिक सूचनाही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.राज्यातील सध्याची राजकीय स्थिती बेभरवशाची असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. अशा स्थितीत शिंदे, फडणवीस कोणताही असा निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगण्यात येते. परंतु इकडे कार्यकर्ते मात्र या आपल्याच सरकारकडून काही पदरात पडेल काय, याच्या प्रतीक्षेत आहेत.

याआधी झाला होता भ्रमनिरासयाआधी युतीचे सरकार असताना शेवटी शेवटी जिल्ह्यातील भाजप, शिवसेना युतीच्या १६ नेते, कार्यकर्त्यांची विविध महामंडळांवर नियुक्ती करण्यात आली. या सर्वांचे विविध संस्थांत अभिनंदन करण्यात आले. सत्कार करण्यात आले. परंतु शेवटपर्यंत याचा शासन आदेश निघालाच नाही आणि संबंधितांना त्यांच्या नियुक्ती झालेले कार्यालयदेखील पाहता आले नाही. असेच यावेळी होऊ नये अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना