शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Environment Day Special : पर्यावरणात मानवी हस्तक्षेप नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 14:12 IST

2000 ते 2020 या काळात जिल्ह्यातील पर्यावरणाचे आम्ही काय बरे-वाईट केले त्याचा हा आढावा... कोल्हापूर हा पश्चिम घाटातील विपुल जैवविविधतेचा भाग आहे. नद्या, अभयारण्य, वनस्पती, पशुपक्षी यांची विविधता येथे मोठी आहे. मात्र, गेल्या 20 वर्षांत कोल्हापूरचा परिसर पर्यावरणदृष्ट्या कमकुवत बनत चालला आहे, तो वाचवण्याची गरज आहे.

ठळक मुद्देपर्यावरणात मानवी हस्तक्षेप नको जिल्ह्यात नव्या अभयारण्याची गरज : पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

संदीप आडनाईककोल्हापूर : सह्याद्रीचा भाग असलेल्या पश्चिम घाटात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे, हे खरे तर आपले भाग्य आहे. विपुल जैवविविधता ही निसर्गाची देणगी असलेल्या या जिल्ह्यातील पर्यावरणाचा हळूहळू ऱ्हास होत आहे, हे लक्षात घेता, हे आपले जीवन समृद्ध करणारे पर्यावरण वाचविण्याची गरज आहे. पर्यावरणवादी प्रयत्नांना सामान्य माणसांची जोड मिळेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने समृद्धसंपन्न होऊ हे संचारबंदीच्या काळात मानवी हस्तक्षेप नसल्याने नितळ आणि स्वच्छ निसर्गाने आपल्याला दाखवून दिले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यांतच जैवविविधता आहे, असे नाही. त्यामुळे इको सेन्सिटिव्ह झोन, चोरटी वृक्षतोड, बेकायदा शिकार आणि तस्करीला आळा घालण्यासाठी नव्या दोन अभयारण्यांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.गेल्या 20 वर्षांचा आढावा घेतला तर तापमानातील वाढ ही ३५ अंश सेल्सिअसवरुन ४0 अंशांपर्यंत वाढली आहे, याचे कारण जागतिक हवामान बदल, माणसांसाठीच्या सुविधा, रस्तेविकासासाठी झालेली वृक्षतोड, कमी झालेले वृक्षआच्छादन आहे.पावसाचा लहरीपणाही गेल्या 20 वर्षांत वाढला आहे. पावसाचे प्रमाण जरी कमी-अधिक असले तरी त्यात नियमितता नाही. महिन्याचा पाऊस आता चार दिवसांतच पडतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या पाण्याचा निचरा होण्याची क्षमता कमी झाली आहे.वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण यांमुळे प्रदूषण वाढले आहे. लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण कमी झालेले आढळले. त्यामुळे मानवी हस्तक्षेप, अतिक्रमण यांमुळे प्रदूषण वाढल्याचे सिद्ध होते. औद्योगिकीकरण आणि वाहनांची वाढलेली अमाप संख्या यांमुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. यामुळेच ध्वनीचेही प्रदूषण वाढले आहे. हे लक्षात येते.सन 2000 ची स्थिती1. पर्जन्यमान नियमित होते. पावसाचा लहरीपणा नव्हता. संपूर्ण चार महिन्यांच्या हंगामात सरासरीने पाऊस पडत होता.2. महामार्गावर वृक्षराजी दाट होती. त्यामुळे वृक्षआच्छादन होते. रस्त्याकडेला सावलीचे प्रमाण अधिक होते.3. कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय द्वीपकल्पात आढळणाऱ्या १८00 पैकी ७00 एंडेमिक वनस्पतींच्या प्रजातींची नोंद झाली.4. कोल्हापूर जिल्ह्याचे तापमान ३0 ते ३५ अंश सेल्सिअस इतके होते. हवा, वायू, ध्वनी आणि जलप्रदूषणाचे प्रमाण कमी होते.5. जंगलक्षेत्राचे प्रमाण मोठे होते. राधानगरी आणि दाजीपूर हे गवा अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आले.सध्याची स्थिती

1. मानवी हस्तक्षेपामुळे पर्जन्यमान अनियमित झालेले आहे. महिन्याचा पाऊस आता चार दिवसांतच पडतो आहे.2. विविध रस्तेप्रकल्पांमुळे रस्त्याच्या कडेला असलेली झाडांची तोड मोठ्या प्रमाणात झाली. त्या तुलनेत झाडे लावली गेली नाहीत.3. नोंदवलेल्या ७00 वनस्पतींच्या प्रजातींपैकी आता १३५ प्रजाती संकटग्रस्त, तर ९ प्रजाती अतिसंकटग्रस्त किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.4. विविध विकास प्रकल्प, वृक्षतोड, उद्योग, वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे प्रदूषण वाढलेले आहे. यामुळे तापमान ४0 अंशांवर पोहोचले.5. जंगलक्षेत्र घटले आहे. अभयारण्याची अधिकृत अंतिम अधिसूचना अद्यापही काढण्यात आलेली नाही.

बदलते वातावरण, मानवी हस्तक्षेप, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे पर्यावरणात गेल्या 20 वर्षांत मोठा हानिकारक बदल झाला आहे. ही स्थिती बदलायची असेल तर आपणच आपल्यावर लॉकडाऊनचा कालावधी तयार करण्याची गरज आहे. पर्यावरणाची हानी वाचली तरच मानवाची हानी होणार नाही.- डॉ. मधुकर बाचुळकर

गेल्या 20 वर्षांत पर्यावरणात मोठा बदल झाला आहे, याला कारण माणूस आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणवादी व्यक्ती आणि संस्थांमुळे यात सकारात्मक बदल होतो आहे. आंदोलनामुळे पर्यावरण राखले जाऊ लागले आहे. याला सामूहिक बळ मिळाले पाहिजे.- उदय गायकवाड.

टॅग्स :World Environment DayWorld Environment Dayriverनदीkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण