शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

पाण्यासाठीचा संघर्ष संपेना : दानोळीनंतर कोथळीकरांचाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:47 AM

इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची

संतोष बामणे ।उदगाव : इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची योजना हाणून पाडली. त्यानंतर इचलकरंजीला कोथळीतील कृष्णा-वारणा संगमावरील पर्याय समोर होता. इतक्यात कोथळी ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविल्याने इचलकरंजी शहर व शिरोळ तालुका यामध्ये सुरू असलेला पाण्याचा संघर्ष मात्र वाढत चालला आहे.

इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून अमृत योजना मंजूर झाल्यापासून इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाणी मिळेल, अशी आशा होती. मात्र, वारणा नदीतील पाण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे वारणाकाठच्या शेतीला व पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासतअसल्याने इचलकरंजीला वारणेचे पाणी देणार नाही, यावरून गेल्या दोन वर्षांपासून घडामोडी व संघर्ष सुरू आहे. अखेर मुंबई येथील बैठकीत दानोळी येथून अमृत योजना रद्द झाल्याचा निर्णय झाला. तसेच कोथळी-हरिपूर येथील कृष्णा- वारणा नदीच्या संगमापासून मजरेवाडीपर्यंतच्या कृष्णाकाठावर प्राधिकरण विभागाने उपसा केंद्राची जागेची पाहणी करून योजना आणावी, असे बैठकीत ठरले होते. अशातच दानोळीच्या विषयावर पडदा पडतो इतक्यातच कोथळीकरांनी संगमातून पाणी नेण्यासाठी कडकडून विरोध दर्शविला आहे.

कृष्णा-वारणा संगमावर प्राधिकरण विभागाचे अधिकारी अचानक पाहणी करायला आले होते. त्यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले. दुसºया दिवशी इचलकरंजी शहराला पाणी द्यायचे नाही, या विरोधात सर्वपक्षीय बैठक घेऊन गावबंद ठेवले. तसेच शेतकरी नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्याशी चर्चाही झाली. तसेच कृष्णाकाठावरील असलेल्यासर्वच गावांना एकत्रित करण्याचे काम कोथळी गावाने सुरू केले आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला कृष्णा-वारणा नदीचा संगम ते मजरेवाडीपर्यंत पाणी द्यायचे नाही, यावर निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचा व इचलकरंजी शहराचा संघर्ष वाढत चाललेला दिसत आहे. त्यामुळे वारणाकाठच्या व कृष्णा नदीकाठच्या जनतेचा विचार करून लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा,अशीे मागणी शिरोळ तालुक्यातून होत आहे.जनतेचा विचार महत्त्वाचाइचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी आहे. ही नदी इचलकरंजी शहरामुळेच प्रदूषित झाली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होऊन आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशातच इचलकरंजी शहराला वारणेतून पाणी देण्याचा हट्ट इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींचा आहे. मात्र, हा हट्ट करण्याऐवजी कृष्णा व वारणाकाठच्या जनतेच्या लोकप्रतिनिधींनी विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा कोणतेही संकट आल्यास त्यासाठी आम्ही तयार असल्याचे कोथळी सरपंच अमृत पाटील-धडेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

मुंबई येथे झालेल्या बैठकीत कोथळी-हरिपूर संगम ते मजरेवाडीपर्यंत देण्याचा निर्णय झाला आहे. इचलकरंजीसाठी सध्या पंचगंगा व कृष्णा येथून पाणीपुरवठा होतो. अशातच शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळवून नेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मतासाठी पाण्याचे राजकारण इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी करू नये, अन्यथा कोथळीकर एकीचे बळ दाखवतील.- राजगोंडा पाटील,पं. स. सदस्य, कोथळी.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर