शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाण्यासाठीचा संघर्ष संपेना : दानोळीनंतर कोथळीकरांचाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:47 IST

इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची

संतोष बामणे ।उदगाव : इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची योजना हाणून पाडली. त्यानंतर इचलकरंजीला कोथळीतील कृष्णा-वारणा संगमावरील पर्याय समोर होता. इतक्यात कोथळी ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविल्याने इचलकरंजी शहर व शिरोळ तालुका यामध्ये सुरू असलेला पाण्याचा संघर्ष मात्र वाढत चालला आहे.

इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून अमृत योजना मंजूर झाल्यापासून इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाणी मिळेल, अशी आशा होती. मात्र, वारणा नदीतील पाण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे वारणाकाठच्या शेतीला व पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासतअसल्याने इचलकरंजीला वारणेचे पाणी देणार नाही, यावरून गेल्या दोन वर्षांपासून घडामोडी व संघर्ष सुरू आहे. अखेर मुंबई येथील बैठकीत दानोळी येथून अमृत योजना रद्द झाल्याचा निर्णय झाला. तसेच कोथळी-हरिपूर येथील कृष्णा- वारणा नदीच्या संगमापासून मजरेवाडीपर्यंतच्या कृष्णाकाठावर प्राधिकरण विभागाने उपसा केंद्राची जागेची पाहणी करून योजना आणावी, असे बैठकीत ठरले होते. अशातच दानोळीच्या विषयावर पडदा पडतो इतक्यातच कोथळीकरांनी संगमातून पाणी नेण्यासाठी कडकडून विरोध दर्शविला आहे.

कृष्णा-वारणा संगमावर प्राधिकरण विभागाचे अधिकारी अचानक पाहणी करायला आले होते. त्यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले. दुसºया दिवशी इचलकरंजी शहराला पाणी द्यायचे नाही, या विरोधात सर्वपक्षीय बैठक घेऊन गावबंद ठेवले. तसेच शेतकरी नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्याशी चर्चाही झाली. तसेच कृष्णाकाठावरील असलेल्यासर्वच गावांना एकत्रित करण्याचे काम कोथळी गावाने सुरू केले आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला कृष्णा-वारणा नदीचा संगम ते मजरेवाडीपर्यंत पाणी द्यायचे नाही, यावर निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचा व इचलकरंजी शहराचा संघर्ष वाढत चाललेला दिसत आहे. त्यामुळे वारणाकाठच्या व कृष्णा नदीकाठच्या जनतेचा विचार करून लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा,अशीे मागणी शिरोळ तालुक्यातून होत आहे.जनतेचा विचार महत्त्वाचाइचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी आहे. ही नदी इचलकरंजी शहरामुळेच प्रदूषित झाली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होऊन आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशातच इचलकरंजी शहराला वारणेतून पाणी देण्याचा हट्ट इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींचा आहे. मात्र, हा हट्ट करण्याऐवजी कृष्णा व वारणाकाठच्या जनतेच्या लोकप्रतिनिधींनी विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा कोणतेही संकट आल्यास त्यासाठी आम्ही तयार असल्याचे कोथळी सरपंच अमृत पाटील-धडेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

मुंबई येथे झालेल्या बैठकीत कोथळी-हरिपूर संगम ते मजरेवाडीपर्यंत देण्याचा निर्णय झाला आहे. इचलकरंजीसाठी सध्या पंचगंगा व कृष्णा येथून पाणीपुरवठा होतो. अशातच शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळवून नेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मतासाठी पाण्याचे राजकारण इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी करू नये, अन्यथा कोथळीकर एकीचे बळ दाखवतील.- राजगोंडा पाटील,पं. स. सदस्य, कोथळी.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर