शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

हंगामाच्या शेवटी ‘ब्याडगी’चा ठसका, क्विंटलला हजाराची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:03 IST

लाल मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना मिरचीचा ठसका वाढला आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’, ‘लवंगी’ मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल एक हजाराची वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची पेंढी २५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाजीपाल्याच्या दरात मात्र चढउतार दिसत आहे. डाळींच्या दरातील तेजी कायम राहिली आहे.

ठळक मुद्देहंगामाच्या शेवटी ‘ब्याडगी’चा ठसका, क्विंटलला हजाराची वाढपालेभाज्या कडाडल्या : फळभाज्यात मात्र चढउतार

कोल्हापूर : लाल मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना मिरचीचा ठसका वाढला आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’, ‘लवंगी’ मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल एक हजाराची वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची पेंढी २५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाजीपाल्याच्या दरात मात्र चढउतार दिसत आहे. डाळींच्या दरातील तेजी कायम राहिली आहे.यंदा लाल मिरचीची आवक चांगली राहून ग्राहकांना दिलासा मिळेल असे सांगितले जात होते. सुरुवातीच्या टप्प्यात मिरचीचे दर साधारण राहिले. आता मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना दर चांगलेच कडाडले आहेत. ‘ब्याडगी’ १६० रुपये, ‘जवारी’ १३०, तर ‘लवंगी’ १४० रुपये किलोपर्यंत राहिली आहे. सरासरी क्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. आणखी आठ ते दहा दिवस हंगाम तेजीत राहील, त्यानंतर हळूहळू कमी होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

पालेभाज्यांच्या दरात कमालीची घट झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मेथीची पेंढी हातात घेण्यासही भीती वाटत आहे. (छाया - दीपक जाधव)कडक उन्हामुळे पालेभाज्यांची आवक गेले पंधरा दिवस मंदावली आहे. या आठवड्यात तर बाजार समितीत रोज कशीबशी ५०० पेंढ्यांची आवक होते. त्यामुळे दरात वाढ झाली असून, घाऊक बाजारात पेंढीचा दर २० रुपये आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात मेथीची विक्री कशी करायची, असा पेच विक्रेत्यांसमोर आहे.

पालक, पोकळा, शेपू, कांदा पातीचे दरही १५ ते २० रुपये पेंढी आहे. भाजीपाल्याची आवक कमी-अधिक असल्याने दरात चढउतार दिसत आहे. वांगी, टोमॅटो, ढब्बू, ओला वाटाणा या भाज्यांच्या दरात थोडी वाढ झाली असून कोबी, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचे दर स्थिर आहेत. कोथिंबीरची आवक स्थिर असून, किरकोळ बाजारात २० रुपये दर आहे.फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील हापूसबरोबरच मद्रास हापूस व पायरी आंब्याची आवक झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात थोडी घसरण झाली आहे. मद्रास हापूसच्या पेटीमागे सरासरी दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात हापूसचा बॉक्स १५० पासून २५० रुपयांपर्यंत आहे. लिंबूची मागणी कायम असून, दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींचे दर चढेच राहिले आहेत. साखर, सरकी तेल, शाबूसह इतर किराणा मालाच्या दरात फारसा फरक झालेला नाही.

घाऊक बाजारातील आंब्याचा दरदाम-आंबा                    आवक               सरासरी दरहापूस                  ६८० पेटी            १२०० रुपयेहापूस                 १०१२० बॉक्स     २२५ रुपयेपायरी                  ४० बॉक्स         ९० रुपयेलालबाग           ५०० बॉक्स         १०० रुपयेमद्रास हापूस          २०० पेटी       ६५० रुपयेमद्रास हापूस        १००० बॉक्स    १२५ रुपयेमद्रास पायरी         ५०० बॉक्स    १०० रुपये

मिरचीची मागणी आणि आवक यात मोठी तफावत असल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. चांगल्या मालाचे दर सुरुवातीपासूनच चढे राहिले आहेत.- भगवान लोखंडे, मिरची विक्रेते, रुकडी 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर