शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: फसवणूक करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मालमत्तांवर बोजा, पोलिसांची १६ पथके रवाना

By उद्धव गोडसे | Updated: November 7, 2023 12:02 IST

गंडा घालणाऱ्या ठेकेदारांचा शोध : ४० संशयित अटकेत

उद्धव गोडसेकोल्हापूर : ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे करार करून ऊस वाहतूकदारांची फसवणूक केलेल्या ठेकेदारांची धरपकड पोलिसांकडून सुरू झाली. ऊस तोडणी मजुरांच्या बीड, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, लातूर, परभणी जिल्ह्यांमध्ये पोलिसांची १६ पथके रवाना झाली आहेत. आजवर ४० संशयितांना अटक झाली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. फसवणूक केलेल्या संशयितांच्या मालमत्तांवर बोजा चढवला जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.ऊस तोडण्यासाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून अनेक ठेकेदारांनी वाहतूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत जिल्ह्यात शंभराहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणुकीची रक्कम संशयितांकडून वसूल करण्यासाठी आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे दाखल करून घेण्याची विशेष मोहीम राबवली. या गुन्ह्यांच्या शोधासाठी पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली दहा कर्मचाऱ्यांची १६ पथके तयार केली आहेत. या पथकांना ऊस तोडणी मजुरांच्या गावात जाऊन त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक पंडित यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पथकांचे काम सुरू आहे.

पथकांकडून अशी कारवाई..फसवणूक केलेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. प्रकृती अस्वास्थ्य किंवा अन्य कारणांमुळे ज्या संशयितांना अटक करणे शक्य नाही, त्यांना नोटीस देऊन न्यायालयात हजर राहण्यास सांगितले जाते. फसवणुकीतील रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त करून त्यावर बोजा चढवण्याचे काम केले जात आहे.

मजूर परराज्यात पळालेगुन्हे दाखल झालेले ठेकेदार आणि मजूर परराज्यात पळाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कामासाठी गेल्यास अटक होऊ शकते, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना काही संशयितांच्या घरावर नोटीस लावून परतावे लागत आहे.फसवणुकीला आळा बसणारपोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे यापुढे होणाऱ्या फसवणुकींना आळा बसणार आहे. वाहतूकदारांची फसवणूक केल्यास गुन्हे दाखल होऊन आपल्या मालमत्तेवर टाच येऊ शकते, हे ऊस तोडणी मजूर आणि ठेकेदारांना समजले आहे. त्यामुळे यापुढे फसवणुकीचे प्रकार कमी होतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने