शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वांदे

By admin | Updated: August 19, 2015 23:21 IST

महापालिका : एलबीटी निर्णयानंतर आर्थिक स्थिती ढासळली

कोल्हापूर : पन्नास कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना १ आॅगस्टपासून एलबीटीमधून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे महानगरपालिकेचा आर्थिक कणा मोडला आहे. त्याचा पहिला दणका कर्मचाऱ्यांच्या पगाराला बसणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणारे कर्मचाऱ्यांचे पगार कधी आणि कसे भागावायचे, या प्रश्नाने मनपा प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. विकासकामे थांबविता येतील, खर्चाची काटकसर केली जाईल, पण पगार कसे थांबविणार हाच प्रश्न तीव्रतेने जाणवत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. १ आॅगस्टपासून एलबीटीमधून सूट मिळाल्यामुळे कोल्हापुरात व्यापाऱ्यांनी कर भरणे आता बंद केले आहे. गेले दोन महिने भरणाही कमी होत होता. त्याचा परिणाम आता पालिकेच्या उत्पन्नावर झालेला आहे. महिन्याला सरासरी ८ कोटी रुपयांपर्यंत एलबीटी जमा होत होता. तो आता पूर्णपणे बंद झाला आहे. एलबीटी सुरू होता तोपर्यंत प्रत्येक महिन्याचा १ ते ७ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होत होते, पण आता आवकच कमी झाल्यामुळे आॅगस्ट महिन्याचे कर्मचाऱ्यांचे पगार कसे भागवायचे, असा प्रश्न प्रशासनला भेडसावू लागला आहे. मंजूर निधी आलाच नाहीराज्य सरकारने एलबीटी रद्द केल्यानंतर महानगरपालिकांना अर्थसाह्य करण्याची भूमिका घेतली असून गत वर्षीच्या आॅगस्ट महिन्यात जेवढा एलबीटी जमा झाला होता, तेवढीच रक्कम निधीच्या स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ६ कोटी ४२ लाख रुपये निधी मंजूर झाल्याच्या वृत्तपत्रांतून बातम्या आल्या, पण अद्याप निधी मिळालेला नाही. हा निधी वेळेत मिळाला तरच काही प्रमाणात पगारावरील भार हलका होईल. जर तो वेळेवर मिळाला नाही, तर मात्र पगार होणे अशक्य आहे. (प्रतिनिधी)