शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

यंत्रमागधारकांना लवकरच विजेची सबसिडी, चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 20:08 IST

इचलकरंजीतील विविध विकास कामांचा शुभारंभ तर काही कामांचे लोकार्पण पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले.

कोल्हापूर : हे सरकार शेतकऱ्यांचे असून, जे पीक वाहून गेलं त्या पिकावरील कर्ज व्याजासह शासन भरणार आहे. शेतमजुराला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. शेतकऱ्याला जे-जे हवं ते-ते देणारं राज्यशासन देणार आहे. इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांसाठी 1 रुपये 22 पैसे दराने वीज, सबसिडीच्या बाबतीतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.

इचलकरंजीतील विविध विकास कामांचा शुभारंभ तर काही कामांचे लोकार्पण पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, हिंदुराव शेळके, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, 107 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ तर काही कामांचे लोकार्पण करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय शासनाने घेतले आहेत. महापुराच्या काळातही 4 लाख 13 हजार लोकांना बोटीतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. रोख पाच हजारांची मदत, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू मोफत वाटप केले आहे. इचलकंरजी येथील यंत्रमागधारकांसाठी एक रुपया 22 पैशांची सबसिडी कमी केली आहे. याबाबतीतही अधिकाधिक सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

श्रीमती मुंडे यावेळी म्हणाल्या, सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून शासनाने निर्णय घेतले आहेत. गरिबांपर्यंत, समाजातील अंतिम माणसापर्यंत विकासाचा उदय पोहचला पाहिजे, हा उद्देश शासनाचा आहे. अनाथांना देखील एक टक्का आरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. मराठा आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या शासनाने घेतला आहे. बीडसारख्या दुष्काळग्रस्त भागातून सांगली-कोल्हापूरमधील आपत्तीग्रस्तांसाठी मदत दिली जात आहे, असेही त्या म्हणाल्या. नगराध्यक्ष श्रीमती स्वामी यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार हाळवणकर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. 

 

टॅग्स :ichalkaranji-acइचलकरंजीchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरelectricityवीज