शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

स्वराज्य संस्थांची पाणी, वीज बिले शासन भरणार : ‘ग्रामविकास’च्या आदेशाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:58 PM

मार्च २०१८ अखेरची महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांची ५० टक्के थकीत पाणीपुरवठा आणि वीज बिले १४व्या वित्त आयोगातून भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने

ठळक मुद्देमार्च २०१८ अखेरची थकबाकी चार हजार ५३७ कोटी रुपयांची

कोल्हापूर : मार्च २०१८ अखेरची महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांची ५० टक्के थकीत पाणीपुरवठा आणि वीज बिले १४व्या वित्त आयोगातून भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याबाबत उद्योग आणि ऊर्जा विभागाने आदेश काढला असून, मात्र ग्रामविकास विभागाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यातील एकूण थकबाकी ४ हजार ५३८ कोटी रुपयांची आहे. २१ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्जा विभागाने याबाबत प्रस्ताव मांडला होता. त्यावर चर्चा करताना या सर्व थकीत रकमेवरील दंड व व्याज वगळता मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम १४व्या वित्त आयोगातून देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार ८ मार्च २०१८ च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयानुसार आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची जी पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची थकबाकी आहे, त्यांपैकी दंड व व्याज सोडूनची मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम आता थेट शासनाकडून चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून त्या-त्या विभागाला अदा करणार आहे.

उर्वरित ५० टक्के रक्कम ही संबंधित संस्थांनी, त्यांना मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याबाबतही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीचा मुद्दा तात्पुरता निकालात निघणार आहे. मात्र, मार्च २०१८ नंतरची सर्व बिले ही त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना भरणे बंधनकारक राहणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार दिलासाराज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांची ही बिले थकीतच आहेत. करवसुली आणि येणारी बिले यांचा ताळमेळ लागत नसल्याने थकबाकी वाढली आहे.शासनानेच आता हा निर्णय घेतल्याने या संस्थांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यासाठी नगरविकास आणि ग्रामविकास विभागाचा आदेश निघणे आवश्यक असून, तो मिळाल्याशिवाय यापुढील कार्यवाही अशक्य आहे.