शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

इलेक्ट्रोरल बाँड म्हणजे कायदेशीर खंडणी, निरंजन टकले यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 12:15 IST

प्रश्न विचारणे हीच लोकशाही : कामत

कोल्हापूर : ज्या इलेक्ट्रोरल बाँडला सरकारने कायदेशीर स्वरूप दिले, ते प्रत्यक्षात खंडणीचा भाग आहेत आणि त्यासाठी एखाद्या गँगस्टरप्रमाणे गँग तयार केली आहे, ज्यात ईडी आणि सीबीआयला सदस्य केलेले आहे, असा आरोप निरंजन टकले (मुंबई) यांनी रविवारी केले.येथील शाहू स्मारक भवनातील मिनी हॉल येथे रविवारी झालेल्या विचारवेध संमेलनात ते बोलत होते. टकले म्हणाले, ‘गुजरातमध्ये नरेंद्र मोदी प्रथम जिंकले तेव्हा सर्वांनी त्यांचे कौतुक केले; पण सीताराम येचुरी यांनी गुजरात मॉडेल सर्वप्रथम एक्स्पोज केले. निवडणुकांमध्ये ज्यांना कधीही हरवता येत नाही, अशा शाश्वत मूल्यांना मोदींच्या काळात बदनाम करण्यास सुरुवात झाली. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ हा त्याचाच भाग होता. हा दहशतवाद आज देशात आला त्यामागे अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो आला आहे,’ असा आरोपही टकले यांनी यावेळी केला.ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक दिलीप कामत (बेळगाव) म्हणाले, ‘लोकशाहीचे शासन संस्था आणि माध्यमे यांचे मिळून चार खांब आहेत. शाळा हा मधला कंपू आहे. प्रश्न विचारणे हीच लोकशाही आहे; पण आज तोंडावर बोट ठेवून शांत बसायला सांगतात, म्हणून बोलणे जरुरी आहे. जात आणि धर्म यांचा समावेश भांडवलशाही व्यवस्थेत आहे. ही व्यवस्था बदलायची आहे. लोकशाही समजून घेण्याची ताकद लोकांमध्ये आहे.’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग