शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राजकीय पक्षांकडून निवडणुका ‘प्रतिष्ठे’च्या--सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:32 PM

जयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून,

ठळक मुद्देशिरोळ तालुक्यामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभगावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावपातळीवरच्या या निवडणुका केवळ नावापुरत्या मर्यादित राहिल्या नसून, विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या १६ आॅक्टोबरला सार्वत्रिक निवडणुका होत असून, सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुका प्रतिष्ठेच्या असल्याने सरपंच, उमेदवार चाचपणीला वेग आला आहे.शिरोळ तालुक्यात १७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुका कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या, तरी थेट सरपंचपदामुळे ग्रामपंचायतीचा कारभार हाकणारा प्रतिनिधी आपल्याच पक्षाचा असावा आणि ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे, यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. उद्या, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. सध्या गावागावांत राजकीय पक्षांचे नेते चाचपणी करीत आहेत. गावातील वजनदार व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आघाड्या, पॅनेल तयार करण्यासाठी सोयीचे इच्छुक उमेदवार निवडले जात आहेत. परिणामी, राजकीय वातावरण तापू लागल्याने उमेदवार निश्चित झाले नसले तरी इच्छुकांनी मात्र तयारी सुरू केली आहे.‘सरपंच’ निवडीत राजकारण होणार?सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जनतेतून थेट सरपंच निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सरपंचपदासाठी उमेदवाराची चाचपणीही केली जात आहे. सरपंचपदासाठी नवखा व अभ्यासू उमेदवार देण्यासाठी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शिवसेना यांसारख्या पक्षांनी उडी घेतली असून, थेट सरपंच निवड असल्याने गावाचा विचार करून उमेदवार देण्याबाबत विचार केला जात आहे. काही आघाड्यांकडून सरपंचपदाची नावे घोषित केली जात आहेत.संभाजीपूरची निवडणूक महत्त्वपूर्ण : तालुक्यातील ५३ वे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया संभाजीपूर ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. जयसिंगपूर शहरालगत असलेली ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राजकीय मंडळींनी जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. गेल्या पाच वर्षांत सरपंचपदावरून झालेल्या घडामोडी लक्षात घेता, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.निवडणूक रणधुमाळीऔरवाड, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकिवाट, अब्दुललाट, लाटवाडी, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हेरवाड, खिद्रापूर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.