शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘गडहिंग्लज’ कारखान्यासह २८०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; पावसाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 12:40 IST

सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ अखेर लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

कोल्हापूर : राज्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू असल्याने अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही. त्यामुळे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ अखेर लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी काढण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज साखर कारखाना, कोल्हापूर अर्बन बँकेसह २८०० संस्थांच्या निवडणुका अडीच महिने पुढे गेल्या आहेत.राज्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. १ जून ते १२ जुलैअखेर राज्यात ८९ व्यक्ती व १८१ जनावरे पावसामुळे मृत्युमुखी पडली आहेत. पावसामुळे २४९ गावे बाधित झाल्याने अशा स्थितीत निवडणुका घेणे उचित होणार नाही. त्यामुळे उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत, तिथे थांबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता, तर कोल्हापूर अर्बन बँकेसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. त्याशिवाय जवळपास २८०० सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबली आहे.

सततच्या मुदतवाढीने संचालक जोमातकोरोनामुळे दीड वर्ष निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर सुरू झाल्या. मात्र, विकास संस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याने इतर संस्थांच्या निवडणुकांचा वेग कमी झाला. त्यामुळे साखर कारखाने, बँकांच्या संचालकांना मुदतवाढीचा फायदा झाला असून, ते जोमात आहेत. मात्र, सभासदांमध्ये अस्वस्थता दिसत आहे.

या प्रमुख संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक-गडहिंग्लज साखर कारखानाकोल्हापूर अर्बन बँकअण्णासाहेब चौगुले बँकनांदणी बँकयूथ बँककोहिनूर बँक, इचलकरंजीग्रामसेवक पतसंस्थाजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीदृष्टिक्षेपात राज्यातील निवडणुकीस पात्र संस्था-निवडणुकीस पात्र - ३२ हजार ४७३प्रक्रिया सुरू - ७ हजार ६२०प्रत्येक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात - ५ हजार ६३६नामनिर्देशन पत्र सुरू न झालेल्या - १९८४

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकRainपाऊस