शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

सुशिक्षितांनी श्रद्धा ठेवावी; पण डोळसपणे

By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST

श्याम मानव : वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे गरजेचे, चमत्काराच्या नावाखाली होते फसवणूक

कोल्हापूर : अध्यात्माचा आणि शब्दप्रामाण्याचा आधार घेऊन विविध बुवा-बाबांकडून सहजपणे लोकांची फसवणूक केली जाते़ विज्ञानाचे नियम ओलांडणारे कोणतेही अध्यात्म नाही़ अध्यात्माच्या नावाखाली सुशिक्षितानांही सहजपणे फसविले जात आहे़ त्यामुळे सुशिक्षितांनी श्रद्धा ठेवावी; पण ती डोळस असली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आणि जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीचे राज्यस्तरीय सहअध्यक्ष प्रा़ श्याम मानव यांनी केले़ सामाजिक न्याय पुणे विभागांतर्गत कोल्हापूर जिल्हास्तरीय समितीने आयोजित केलेल्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणाविरोधी कायदा चमत्कार’ प्रात्यक्षिकांसह या जाहीर सभेत ते बोलत होते़ महावीर कॉलेज येथील आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनमध्ये आज, रविवारी ही सभा झाली़ प्रा़ मानव म्हणाले, अध्यात्माला विज्ञानाचे कोणतेही नियम लागू नाहीत, हा पूर्वीपासून आपल्यावर होत आलेला संस्कार आहे़ पण जगाची गेल्या दोनशे वर्षांत जी प्रगती झाली आहे, तिचा आधार केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन आहे़ या दोनशे वर्षांत झालेली प्रगती यापूर्वीच्या हजारो वर्षांत झालेली नव्हती़ त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे गरजेचे आहे़ राज्यातील अनेक भागांत बुवा-बाबा चमत्कारांच्या नावाखाली सुशिक्षितांचीही फसवणूक करत आहेत़ त्यामुळे सुशिक्षितांनी श्रद्धा जरूर बाळगावी, पण आपण ज्यांच्यावर विश्वास दाखवतो, तो पुन:पुन्हा तपासून बघितला पाहिजे़ महाराष्ट्रात सातत्याने नरबळींच्या घटना घडतात याचा संदर्भ देत प्रा़ मानव म्हणाले, अलौकिक शक्ती, गुप्तधन, आणि अपत्यप्राप्ती यासाठी आजही नरबळी देण्याची अघोरी प्रथा घडत आहेत़ अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचे स्तोम माजले आहे़ या पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी, प्रसार करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांनी सहभाग घ्यावा़ यावेळी मानव यांनी जादूटोणाविरोधी कायद्याचे वाचन केले तसेच या कायद्याचा भंग केल्यास होणाऱ्या शिक्षा सांगितल्या़ यावेळी प्रा़ मानव यांनी चमत्कारिक बुवा कशा प्रकारे हवेतून चेन, अंगठी काढून दाखवितात, उदबत्तीची दिशा आपल्याला हवी त्याप्रमाणे फिरवून व्यक्तीला संभ्रमात कसे टाकतात, याची प्रात्यक्षिकेही दाखवली़ तसेच बाबांच्या कारनाम्यालासुद्धा वैज्ञानिक आधार असतो हे सिद्ध करणारी विविध प्रात्यक्षिके दाखवली़ यावेळी जिल्ह्णातील विविध सरकारी कर्मचारी, संघटना आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या सभेचे उद्घाटन साहाय्यक समाजकल्याण आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी केले़ सुरेश झिरमुरे यांनी कायद्याच्या अंमलबजावणीची गरज मांडली़ यावेळी निवृत्त साहाय्यक समाजकल्याण आयुक्त बाबा पाटील, समन्वय शैला कुरणे आदी उपस्थित होते़. (प्रतिनिधी)