शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुखासह आठजणांना शिक्षा

By Admin | Updated: August 26, 2015 23:52 IST2015-08-26T23:52:18+5:302015-08-26T23:52:18+5:30

सतरा महिने सक्तमजुरी : शासकीय मालमत्तेचे नुकसान प्रकरण

Education for eight people, including Sena chief of Sawantwadi city | शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुखासह आठजणांना शिक्षा

शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुखासह आठजणांना शिक्षा

सावंतवाडी : नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या कार्यालयात घुसून टेबलावरील काळी शाई अंगावर फेकून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सावंतवाडी शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार यांच्यासह आठजणांना बुधवारी सावंतवाडी न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश दस्तगीर पठाण यांनी १७ महिन्यांची सक्तमजुरी व ५७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा ठोठावलेल्यांमध्ये मणियार यांच्यासह शैलेश गणपत तावडे, महेश अनंत पांचाळ, विलास विठ्ठल सावंत, अजित लक्ष्मण सांगेलकर, रामचंद्र दामोदर भराडे, गजानन प्रभाकर कुडपकर, महम्मद ऊर्फ राजू अब्दुल तनीफ पटेल यांचा समावेश आहे.२४ मे २०१३ रोजी दुपारी सावंतवाडी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे आपल्या कार्यालयात असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात घुसून शिल्पग्राम येथे सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामाबाबत जाब विचारला. हे बांधकाम बंद करा, असे सांगून शब्बीर मणियार यांनी टेबलावरील काच फोडली, तर पांचाळ यांनी काळी शाई अंगावर फेकली. तसेच शासकीय कार्यालयातील संगणक, टेलिफोनची मोडतोड केली होती. याबाबत मुख्याधिकारी नार्वेकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. याबाबत बुधवारी सावंतवाडी न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवून विविध कलमांखाली सतरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा व मुख्याधिकारी नितीन देसाई यांना मनस्ताप झाल्याने त्यांना नुकसानभरपाई पाच हजार रुपये, तसेच सावंतवाडी नगर परिषद यांच्या कार्यालयातील तोडफोड केल्याने पंचवीस हजार रुपये व प्रत्येकी चार हजार रुपये अशी एकूण ५७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. लीना पेडणेकर यांनी युक्तिवाद केला. (वार्ताहर)

Web Title: Education for eight people, including Sena chief of Sawantwadi city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.