शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पाऊसधारांत बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 12:33 AM

कोल्हापूर : पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या धारा आणि पुराची टांगती तलवार सोसत कोल्हापूरकरांनी शनिवारी घरगुती गौरी-गणपतीला निरोप दिला. विधायक गणेशोत्सवाच्या ...

कोल्हापूर : पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या धारा आणि पुराची टांगती तलवार सोसत कोल्हापूरकरांनी शनिवारी घरगुती गौरी-गणपतीला निरोप दिला. विधायक गणेशोत्सवाच्या आदर्शांची पुनरावृत्ती करीत नागरिकांनी विसर्जन कुंडात गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. कोल्हापूर जिल्ह्यातून दोन लाख ३२ हजारांहून अधिक, तर शहरातून ५० हजारांहून अधिक अशा जवळपास तीन लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे काहिलीत विसर्जन झाले, तर १०० टक्के निर्माल्य दान झाले.शनिवारी दुपारपासून पावसाने क्षणभरही उसंत घेतली नाही. मात्र धो-धो कोसळणारा पाऊसही गणेशभक्तांचा उत्साह कमी करू शकला नाही. पुन्हा महापुराची भीती आणि अतिवृष्टी सहन करीत नागरिक बाप्पांना निरोप देण्यासाठी बाहेर पडले. कोल्हापूर शहरात सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीघाटावर होते. मात्र शनिवारी सकाळी गायकवाड वाड्यापर्यंत आलेले पंचगंगेचे पाणी दुपारपर्यंत जामदार क्लबजवळ आल्याने यंदा नदीघाटावर नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करता आले नाही. त्यामुळे गायकवाड वाड्याजवळ विसर्जन कुंड ठेवण्यात आले. पंचगंगेला पूर आल्याने गणेशमूर्ती विसर्जनाचा भार यंदा रंकाळ्याने पेलला. जथ्थेच्या जथ्थे गणेशमूर्ती हातगाड्या, दुचाकी, चारचाकीतून व चालत घेऊन येत होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी तुंबली. यासह राजाराम बंधारा, रंकाळा, इराणी खण, कळंबा, राजाराम तलाव, कोटीतीर्थ येथेही विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड आणि ट्रॅक्टर-ट्रॉलींची सोय करण्यात आली होती.