शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पृथ्वीच कधीतरी आपल्याला नष्ट करेल, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 12:43 IST

कोल्हापूर : शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक आरोग्य आणि विचार प्रणाली, बोधनात्मक पातळीपर्यंत निसर्ग प्रणाली बिघडली आहे. आपण पृथ्वीला संपवण्याआधी ...

कोल्हापूर : शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक आरोग्य आणि विचार प्रणाली, बोधनात्मक पातळीपर्यंत निसर्ग प्रणाली बिघडली आहे. आपण पृथ्वीला संपवण्याआधी पृथ्वीच आपल्याला नष्ट करेल अशी वेळ आली आहे. विविध शास्त्रज्ञांनी शास्त्रीय अभ्यासातून हे दाहक चित्र स्पष्ट करूनही राजकीय नेते, लोकांना, कॉर्पोरेट कंपन्यांना ते कसे कळत नाही? असा सवाल पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी शुक्रवारी उपस्थित केला. शिवाजी विद्यापीठ व किर्लोस्कर उद्योग समूह यांच्यातर्फे आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना विद्यापीठ परिसर जलयुक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या विज्ञान शिक्षणाच्या प्रचार-प्रसार कार्यासाठी वसुंधरा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रमोद पाटील होते.यावेळी देऊळगावकर यांनी सद्य पर्यावरणीय परिस्थितीची विस्तृत मांडणी केली. युरोपातील अनेक देशांमध्ये कलेच्या माध्यमातून पर्यावरणीय संकट मांडले जाते आणि ते अधिक प्रभावीपणे नव्या पिढीला भावते परंतु आपल्याकडे मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ.पी. एस. पाटील म्हणाले, वसुंधरा वाचली तरच आपले सर्वांचे अस्तित्व टिकणार आहे. त्यासाठी आज आणि आत्ताच प्रत्येकाला जागे होऊन कृतिशील होणे गरजेचे आहे. भविष्यात किर्लोस्कर उद्योग समूहासोबत अनेक उपक्रम हाती घेऊन ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.यावेळी किर्लोस्कर समूहाचे सी. जी. रानडे, धीरज जाधव, वीरेंद्र चित्राव, पर्यावरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव उपस्थित होत्या. डॉ. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. शरद आजगेकर यांनी आभार मानले.

वसुंधरा मित्र पुरस्काराचे मानकरी

  • सुहास वायंगणकर,
  • व्ही. टी. पाटील फाउंडेशन
  • जलमित्र फाउंडेशन, मजले
  • गार्डन्स क्लब
टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण