शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

पृथ्वीच कधीतरी आपल्याला नष्ट करेल, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 12:43 IST

कोल्हापूर : शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक आरोग्य आणि विचार प्रणाली, बोधनात्मक पातळीपर्यंत निसर्ग प्रणाली बिघडली आहे. आपण पृथ्वीला संपवण्याआधी ...

कोल्हापूर : शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक आरोग्य आणि विचार प्रणाली, बोधनात्मक पातळीपर्यंत निसर्ग प्रणाली बिघडली आहे. आपण पृथ्वीला संपवण्याआधी पृथ्वीच आपल्याला नष्ट करेल अशी वेळ आली आहे. विविध शास्त्रज्ञांनी शास्त्रीय अभ्यासातून हे दाहक चित्र स्पष्ट करूनही राजकीय नेते, लोकांना, कॉर्पोरेट कंपन्यांना ते कसे कळत नाही? असा सवाल पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी शुक्रवारी उपस्थित केला. शिवाजी विद्यापीठ व किर्लोस्कर उद्योग समूह यांच्यातर्फे आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना विद्यापीठ परिसर जलयुक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या विज्ञान शिक्षणाच्या प्रचार-प्रसार कार्यासाठी वसुंधरा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रमोद पाटील होते.यावेळी देऊळगावकर यांनी सद्य पर्यावरणीय परिस्थितीची विस्तृत मांडणी केली. युरोपातील अनेक देशांमध्ये कलेच्या माध्यमातून पर्यावरणीय संकट मांडले जाते आणि ते अधिक प्रभावीपणे नव्या पिढीला भावते परंतु आपल्याकडे मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ.पी. एस. पाटील म्हणाले, वसुंधरा वाचली तरच आपले सर्वांचे अस्तित्व टिकणार आहे. त्यासाठी आज आणि आत्ताच प्रत्येकाला जागे होऊन कृतिशील होणे गरजेचे आहे. भविष्यात किर्लोस्कर उद्योग समूहासोबत अनेक उपक्रम हाती घेऊन ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.यावेळी किर्लोस्कर समूहाचे सी. जी. रानडे, धीरज जाधव, वीरेंद्र चित्राव, पर्यावरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव उपस्थित होत्या. डॉ. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. शरद आजगेकर यांनी आभार मानले.

वसुंधरा मित्र पुरस्काराचे मानकरी

  • सुहास वायंगणकर,
  • व्ही. टी. पाटील फाउंडेशन
  • जलमित्र फाउंडेशन, मजले
  • गार्डन्स क्लब
टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण