शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

संकटकाळी कोल्हापूर धावले कोल्हापूरकरांसाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 03:29 IST

वृद्ध नागरिक, महिला, लहान मुलांना मदतीस प्राधान्य; अन्न, कपडे, आरोग्य सुविधा पुरविण्यास सामाजिक संस्थांकडून सुरुवात

कोल्हापूर : महापुरात अडकलेले वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले यांच्यासह हजारो कोल्हापूरकरांना मदत करण्यासाठी कोल्हापूरकरच धावले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापुरांच्या दातृत्वाचे हजारो हात पुढे आले आहेत. हजारो कुटुंबांना जेवण, कपडे, ब्लॅकेटस, चादरी, औषधे, प्रथमोपचार अशा सुविधा देण्यासाठी रात्रंदिवस अनेक व्यक्ती, संस्था, जैन व राज्यस्थानी समाज व इतर संघटनांचे कार्यकर्ते झटत आहेत.महापुरामुळे हजारो घरं पाण्याखाली गेल्याने अंगावरच्या कपड्यानिशी आणि हाताला येईल तेवढे जीवनावश्यक सामान घेवून हे नागरिक सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री घराबाहेर पडले. सीता कॉलनी येथील ६० नागरिकांचे दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये स्थलांतर केले. येथे जैन सोशल ग्रुप सिल्व्हर लीप या संघटनेने जेवण, ब्लँकेटस, चादरी दिल्या. स्वरा फौंडेशन, स्मार्ट वन, राजारामपूरी मंडळ, इस्कॉनचे दिपक सपाटे आदींनी मदत केली. चित्रदुर्ग मठात २७ कुटुंब आणि ९० माणसे वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी श्रृंगार ग्रूपने जेवणाची सोय केली.मुस्लिम बोर्डिंगमध्ये सोमवारी केवळ आठ कुटुंब स्थलांतरित झाली होती बुधवारी ही संख्या ५० कुटुंब आणि १०२ नागरिकांवर गेली. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, सरनाईक वसाहत मुस्लीम जमात, करवीर गर्जना यांनी जेवण दिले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आपत्कालीन पथकाद्वारे मदत केली.तीनही दलांच्या मदतीमुळे मदतकार्याला वेग - पाटीलखराब हवामानामुळे कोल्हापुरात येवू न शकलेली विमाने, हेलिकॉप्टर्स दाखल होवून मदतकार्य सुरू झालेले आहे. नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त कामगिरीमुळे मदतकायार्ला वेग आल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिली.मंत्री पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह बुधवारी दुपारी तीन वाजता महावीर कॉलेजजवळ सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी केली. पाटील म्हणाले, पाऊसच एवढा झाला की कोयनेपासून ते राधानगरी धरणापर्यंत सर्व धरणांमधून पाणी सोडावे लागले. अन्यथा धरणांना धोका झाला असता. मंगळवारीच एक विमान कोल्हापूरला येण्यासाठी निघाले होते. परंतू खराब हवामानामुळे ते पोहोचू शकले नाही. गोव्याहून निघालेले हेलिकॉप्टरही रत्नागिरीहून परत गेले. परंतू आज हेलिकॉप्टर्स, एनडीआरएफच्या बोटी दाखल झाल्या आहेत.ही यंत्रणा कुणी कामाला लावली?जनतेला वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केल्याबाबत पाटील म्हणाले, पालकमंत्री कुठे आहेत अशी विचारणा काहीजण करत आहेत. परंतू रात्री दीड, दीड वाजता मी आणि जिल्हाधिकारी बोलत आहोत. ही यंत्रणा कुणी कामाला लावली, असे त्यांनी विचारले.नाशिक : ४ हजार लोक सुरक्षितअतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या काळात राबविण्यात आलेल्या बचाव कार्यात ३,९४० जणांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले, तर सटाणा तालुक्यातील आरम नदीच्या पुरातून एका तरुणास वाचविण्यात यश आले.मराठवाडा : जायकवाडी ६० टक्के उर्वरित प्रकल्पांत मात्र ठणठणाट औरंगाबाद : नाशिक-नगर जिल्ह्यांत झालेला दमदार पाऊस कोरड्या मराठवाड्याला पावला. आठही जिल्हे अद्याप कोरडेच असताना औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प बुधवारी ६० टक्क्यांवर पोहोचला. समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडी वगळता जवळपास सर्वच मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप ठणठणाट आहे.बीड : पाण्याचे ७९५ टँकर सुरूच बीड जिल्ह्यात ऐन पावसाळ््यात जवळपास ७९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी १०३ कोरडेठाक, तर इतर प्रकल्प जोत्याखाली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण १७ मध्यम प्रकल्प आहेत़ त्यापैकी १० कोरडे असून ७ प्रकल्प जोत्याखाली आहेत़पंढरपूर : संपर्क तुटला... उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढपुरात भीमा नदीवरील तिन्ही पूल पाण्यात गेले. बुधवारी दुपारपासून पंढरपूरचा संपर्क तुटला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. उजनी धरण मंगळवारी शंभर टक्के भरले.पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीची मागणीमुंबई : राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत १६ नागरिकांचा बळी गेला आहे. हजारो जनावरे वाहून गेली आहेत. पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर