शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळी कोल्हापूर धावले कोल्हापूरकरांसाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 03:29 IST

वृद्ध नागरिक, महिला, लहान मुलांना मदतीस प्राधान्य; अन्न, कपडे, आरोग्य सुविधा पुरविण्यास सामाजिक संस्थांकडून सुरुवात

कोल्हापूर : महापुरात अडकलेले वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले यांच्यासह हजारो कोल्हापूरकरांना मदत करण्यासाठी कोल्हापूरकरच धावले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापुरांच्या दातृत्वाचे हजारो हात पुढे आले आहेत. हजारो कुटुंबांना जेवण, कपडे, ब्लॅकेटस, चादरी, औषधे, प्रथमोपचार अशा सुविधा देण्यासाठी रात्रंदिवस अनेक व्यक्ती, संस्था, जैन व राज्यस्थानी समाज व इतर संघटनांचे कार्यकर्ते झटत आहेत.महापुरामुळे हजारो घरं पाण्याखाली गेल्याने अंगावरच्या कपड्यानिशी आणि हाताला येईल तेवढे जीवनावश्यक सामान घेवून हे नागरिक सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री घराबाहेर पडले. सीता कॉलनी येथील ६० नागरिकांचे दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये स्थलांतर केले. येथे जैन सोशल ग्रुप सिल्व्हर लीप या संघटनेने जेवण, ब्लँकेटस, चादरी दिल्या. स्वरा फौंडेशन, स्मार्ट वन, राजारामपूरी मंडळ, इस्कॉनचे दिपक सपाटे आदींनी मदत केली. चित्रदुर्ग मठात २७ कुटुंब आणि ९० माणसे वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी श्रृंगार ग्रूपने जेवणाची सोय केली.मुस्लिम बोर्डिंगमध्ये सोमवारी केवळ आठ कुटुंब स्थलांतरित झाली होती बुधवारी ही संख्या ५० कुटुंब आणि १०२ नागरिकांवर गेली. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, सरनाईक वसाहत मुस्लीम जमात, करवीर गर्जना यांनी जेवण दिले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आपत्कालीन पथकाद्वारे मदत केली.तीनही दलांच्या मदतीमुळे मदतकार्याला वेग - पाटीलखराब हवामानामुळे कोल्हापुरात येवू न शकलेली विमाने, हेलिकॉप्टर्स दाखल होवून मदतकार्य सुरू झालेले आहे. नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त कामगिरीमुळे मदतकायार्ला वेग आल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिली.मंत्री पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह बुधवारी दुपारी तीन वाजता महावीर कॉलेजजवळ सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी केली. पाटील म्हणाले, पाऊसच एवढा झाला की कोयनेपासून ते राधानगरी धरणापर्यंत सर्व धरणांमधून पाणी सोडावे लागले. अन्यथा धरणांना धोका झाला असता. मंगळवारीच एक विमान कोल्हापूरला येण्यासाठी निघाले होते. परंतू खराब हवामानामुळे ते पोहोचू शकले नाही. गोव्याहून निघालेले हेलिकॉप्टरही रत्नागिरीहून परत गेले. परंतू आज हेलिकॉप्टर्स, एनडीआरएफच्या बोटी दाखल झाल्या आहेत.ही यंत्रणा कुणी कामाला लावली?जनतेला वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केल्याबाबत पाटील म्हणाले, पालकमंत्री कुठे आहेत अशी विचारणा काहीजण करत आहेत. परंतू रात्री दीड, दीड वाजता मी आणि जिल्हाधिकारी बोलत आहोत. ही यंत्रणा कुणी कामाला लावली, असे त्यांनी विचारले.नाशिक : ४ हजार लोक सुरक्षितअतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या काळात राबविण्यात आलेल्या बचाव कार्यात ३,९४० जणांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले, तर सटाणा तालुक्यातील आरम नदीच्या पुरातून एका तरुणास वाचविण्यात यश आले.मराठवाडा : जायकवाडी ६० टक्के उर्वरित प्रकल्पांत मात्र ठणठणाट औरंगाबाद : नाशिक-नगर जिल्ह्यांत झालेला दमदार पाऊस कोरड्या मराठवाड्याला पावला. आठही जिल्हे अद्याप कोरडेच असताना औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प बुधवारी ६० टक्क्यांवर पोहोचला. समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडी वगळता जवळपास सर्वच मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप ठणठणाट आहे.बीड : पाण्याचे ७९५ टँकर सुरूच बीड जिल्ह्यात ऐन पावसाळ््यात जवळपास ७९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी १०३ कोरडेठाक, तर इतर प्रकल्प जोत्याखाली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण १७ मध्यम प्रकल्प आहेत़ त्यापैकी १० कोरडे असून ७ प्रकल्प जोत्याखाली आहेत़पंढरपूर : संपर्क तुटला... उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढपुरात भीमा नदीवरील तिन्ही पूल पाण्यात गेले. बुधवारी दुपारपासून पंढरपूरचा संपर्क तुटला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. उजनी धरण मंगळवारी शंभर टक्के भरले.पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीची मागणीमुंबई : राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत १६ नागरिकांचा बळी गेला आहे. हजारो जनावरे वाहून गेली आहेत. पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर