शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पश्चिम घाटामुळे अलमट्टीचे ‘उदर’ भरले, १०७ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 10:56 IST

पश्चिम घाटात पडलेल्या दमदार पावसामुळेच अलमट्टी पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. कृष्णा नदीच्या उपनद्या असणाऱ्या कोयना, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी यांच्या एकत्रित पाणीसाठ्यामुळेच अलमट्टीचे ‘उदर’ भरले आहे.

ठळक मुद्देपश्चिम घाटामुळे अलमट्टीचे ‘उदर’ भरले, १०७ टीएमसी पाणीसाठा दक्षिण महाराष्ट्रातील पावसाचा परिणाम

पोपट पवारकोल्हापूर : एकीकडे जुलै संपत आला तरी कृष्णा खोऱ्यातील अनेक धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा नसल्याने शेतीसह भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत आहे. दुसरीकडे मात्र याच कृष्णा नदीवर वसलेले बागलकोट जिल्ह्यातील अलमट्टी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरत आले आहे.

या धरणात शुक्रवारपर्यंत तब्बल १०७ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदा उत्तर कर्नाटकात पुरेसा पाऊस झालेला नाही; मात्र पश्चिम घाटात पडलेल्या दमदार पावसामुळेच अलमट्टी पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. कृष्णा नदीच्या उपनद्या असणाऱ्या कोयना, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी यांच्या एकत्रित पाणीसाठ्यामुळेच अलमट्टीचे ‘उदर’ भरले आहे.गतवर्षीही जुलैमध्ये अलमट्टीत १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. उत्तर कर्नाटकची जीवनवाहिनी असणाºया अलमट्टी धरणाची १२३ टीएमसी इतकी पाणीसाठा क्षमता असून, कृष्णा नदीवरील हे सर्वात मोठे धरण मानले जाते. अलमट्टीच्या पाण्यावरच उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हे हिरवेगार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी अलमट्टीच्या पाणीपातळीकडेच येथील बळिराजा डोळे लावून बसलेला असतो.

यंदा उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, बिदर, बेल्लारी, कलबुर्गी, यादगिरी, रायचूर, गदग, धारवाड, हावेरी, नॉर्थ कॅनरा आणि कोप्पल या सर्वच जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस नसल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, उत्तर कर्नाटकातील अलमट्टी, बसवसागर या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्याने बळिराजा चांगलाच सुखावला आहे. दरम्यान, घटप्रभा, मलप्रभा आणि तुंगभद्रा धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा अत्यल्प असल्याने गोकाक, होस्पेट या शहरांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे....अन् अलमट्टीने बदलले जीवनमान...कधीकाळी दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अलमट्टीच्या पाण्याने सधन बनविले आहे. कडधान्याच्या पिकावर गुजराण करणारा येथील शेतकरी अलमट्टीच्या पाण्यामुळे उसाची शेती करू लागल्याने त्यांचा आर्थिक स्तरही उंचावला आहे. विशेष म्हणजे अलमट्टी आणि यादगिरी जिल्ह्यांतील बसवसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे गुलबर्गा, रायचूर, विजापूर, यादगिरी आणि बागलकोट जिल्ह्यांतील तब्बल सहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.तुंगभद्रेची चिंता...कर्नाटकातील होसपेट येथे तुंगभद्रा नदीवर असलेल्या तुंगभद्रा धरणात सध्या अपेक्षित पाणीसाठा नसल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शहरे गॅसवर आहेत. सध्या या धरणात १५.६३ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. गतवर्षी या धरणात जुलैमध्ये ९३.३५ टीएमसी इतका पाणीसाठा होता.उत्तर कर्नाटकातील धरणांमधील पाणीसाठा...धरणाचे नाव    क्षमता         पाणीसाठा

  • अलमट्टी-            १२३             १०७
  • तुंगभद्रा-            १००.८६        १५.६२
  • बसवसागर-       ३७                २२.४५
  • मलप्रभा-           ३४.३५           ९.५९
  • घटप्रभा-             ४८.९८          २२.७७

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव