शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

महाआयटी प्रणालीचा सर्व्हर डाऊन! विद्यार्थ्यांचे दाखले देण्याचे काम ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:11 IST

पालकांची मोठी गैरसोय

शिवाजी सावंतगारगोटी : राज्य सरकारच्या महाआयटी प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने गेल्या चार दिवसांपासून ऑनलाइन दाखले मिळविणाऱ्या हजारो विद्यार्थी व पालकांना मोठी गैरसोय होत आहे. गेल्या शनिवारी (दि. ५) रात्री दहा वाजल्यापासून महाआयटीचा सर्व्हर पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमिलेअर, जात दाखला, डोमिसाईल दाखला, अल्पभूधारक, भूमिहीन यासह सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्रे ऑनलाइन उपलब्ध होत नाहीत.राज्यातील अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकल, कृषी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, जात पडताळणीसाठी ‘प्रतिज्ञापत्र’ आवश्यक असून, ते उपलब्ध नसल्यामुळे जात पडताळणीसाठी अर्ज करणे शक्य नाही. प्रतिज्ञापत्राशिवाय जात पडताळणी अर्ज स्वीकारले जात नाहीत, त्यामुळे शासनाने आरक्षित वर्गासाठी दिलेल्या सवलतींचा लाभही या विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही.इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख ९ जुलै आहे. सर्व्हर बंद राहिल्यास आवश्यक कागदपत्रे न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश वाया जाण्याची भीती आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक विविध ‘सेतू केंद्रे’, ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे, ‘महाऑनलाइन’ कार्यालयांत धावपळ करत आहेत, मात्र कोणत्याही कार्यालयातून समाधानकारक उत्तर मिळत नाही.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित ही गंभीर समस्या असून, शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून महाआयटीचा सर्व्हर त्वरित सुरू करावा, अशी मागणी राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.राज्य शासनाच्या डिजिटल यंत्रणेचा विस्कळीत कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच प्रवेश प्रक्रियेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठा मानसिक त्रास सहन करत आहेत. महाआयटीकडून अधिकृत घोषणा न झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, पालक व विद्यार्थी यामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.

केंद्र चालक हैराण..सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यावर किंवा बंद झाल्यावर महा ई केंद्र चालकांना अर्जदारांना तोंड द्यावे लागते. तहसील कार्यालयातून वेळेवर दाखले प्रमाणित करून मिळत नाहीत, त्यामुळे बऱ्याच वेळा व्यर्थ वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. याबाबत शालेय शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि माहिती तंत्रज्ञानमंत्र्यांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. केवळ गतिमान सरकार असल्याची जाहिरात करून चालणार नाही, तर यंत्रणा गतिमान होण्याचीही आवश्यकता आहे.