शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

कोल्हापुरात रक्ताची टंचाई संकलन ठप्प : शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची हॉस्पिटलवर वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:15 IST

कोल्हापूर : कडक उन्हाळा, शाळा-महाविद्यालयांना असणारी सुट्टी, लग्न समारंभाची धांदल व ग्रामीणभागात शेती कामांच्या सुरू असलेल्या लगबगीमुळे रक्तदान शिबिरे ठप्प

राजाराम लोंढे।कोल्हापूर : कडक उन्हाळा, शाळा-महाविद्यालयांना असणारी सुट्टी,लग्न समारंभाची धांदल व ग्रामीणभागात शेती कामांच्या सुरू असलेल्या लगबगीमुळे रक्तदान शिबिरे ठप्पझाली आहेत. शिबिरे होत नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे. परिणामी, बड्या हॉस्पिटलना शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे.

रक्तदान चळवळ कोल्हापुरात खऱ्या अर्थाने रूजली आहे. सामाजिक काम म्हणून रक्तदान करणाºया व्यक्तींची संख्याही काही कमी नाही. आपल्याकडे सप्टेंबर ते जानेवारी या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. फेबु्रवारी, मार्च महिन्यात परीक्षा असल्याने शिबिरांचे प्रमाण कमी होते. एप्रिल ते जूनमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, लग्नसराई, पर्यटनासाठी लोक घराबाहेर पडले आहेत, ग्रामीण भागात शेतीच्या कामांची धांदल उडालेली असते, त्यात कडक उन्हामुळे एकदमच रक्तदान शिबिरे ठप्प होतात. परिणामी रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा ठणठणाट पहावयास मिळत आहे.

कोल्हापुरात सरासरी महिन्याला ७ ते ८ हजार पिशव्यांचे संकलन होते आणि ८ ते ९ हजार पिशव्यांची मागणी असते. सध्या रक्त संकलन पूर्णपणे बंद आणि मागणी तेवढीच आहे. त्यात रक्त साठवणुकीसाठी विशिष्ट कालमर्यादा असल्याने रक्तटंचाई भासत आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये केवळ तातडीच्या शस्त्रक्रियाच होत आहेत. ज्या शस्त्रक्रिया दोन-तीन महिन्यांनी करणे शक्य आहे, अशा लांबणीवर टाकल्या जात आहेत. रक्तटंचाई दूर करण्यासाठी रक्तपेढ्यांनी सामुदायिकपणे प्रयत्न करणे गरजेचे असून एप्रिल, मे महिन्यासाठी शिबिरांचे आयोजन केले पाहिजे.

रक्त घटकांचे आयुष्यमान असे-रक्तघटक आयुष्यमानप्लेटलेटस ५ दिवससंपूर्ण रक्त ३२ दिवसतांबड्या पेशी ४२ दिवसप्लाझमा १ वर्षक्रायो १ वर्षऐच्छिक रक्तदानामुळे पेचरुग्णाला तातडीने रक्त हवे असते आणि रक्तपेढीत रक्तनसते, अशा वेळी बदली रक्तदेऊन आवश्यक घटक घेतला जातो. पण राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आदेशानुसार रक्तदान हे ऐच्छिक असल्याने रक्तपेढ्यांसमोर पेच आहे.तांबड्या पेशींची अधिक गरजसुट्टी असल्याने सध्या नियोजित शस्त्रक्रियांची संख्याही अधिक असते. त्यामुळे रक्ताची मागणीही वाढते, सध्याचे वातावरण पाहता इतर रक्त घटकांच्या तुलनेत तांबड्या पेशींची मागणी अधिक असते.

-टंचाईवर काय करावेजयंती, उत्सवादिवशी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करणे टाळणे.टंचाईच्या काळात म्हणजे एप्रिल, मे महिन्यासाठी शिबिरांसाठी हॉस्पिटलने पुढाकार घ्यावा.नियोजित शस्त्रक्रिया करणाºया रुग्णांच्या नातेवाईकांनी अगोदरच रक्तदान करून रक्ताची गरज पूर्ण करावी.

तीव्र उन्हाळा, महाविद्यालयांना सुट्टीसह इतर कारणांमुळे रक्तटंचाई भासते. यासाठी एकदम रक्तसंकलन न करता, टप्याटप्प्याने करावे. अनावश्यक साठाही अनेकवेळा खराब होतो.- प्रकाश घुंगूरकर, अध्यक्ष, जीवनधारा ब्लड बॅँक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल