शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोल्हापुरात रक्ताची टंचाई संकलन ठप्प : शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची हॉस्पिटलवर वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:15 IST

कोल्हापूर : कडक उन्हाळा, शाळा-महाविद्यालयांना असणारी सुट्टी, लग्न समारंभाची धांदल व ग्रामीणभागात शेती कामांच्या सुरू असलेल्या लगबगीमुळे रक्तदान शिबिरे ठप्प

राजाराम लोंढे।कोल्हापूर : कडक उन्हाळा, शाळा-महाविद्यालयांना असणारी सुट्टी,लग्न समारंभाची धांदल व ग्रामीणभागात शेती कामांच्या सुरू असलेल्या लगबगीमुळे रक्तदान शिबिरे ठप्पझाली आहेत. शिबिरे होत नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे. परिणामी, बड्या हॉस्पिटलना शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे.

रक्तदान चळवळ कोल्हापुरात खऱ्या अर्थाने रूजली आहे. सामाजिक काम म्हणून रक्तदान करणाºया व्यक्तींची संख्याही काही कमी नाही. आपल्याकडे सप्टेंबर ते जानेवारी या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. फेबु्रवारी, मार्च महिन्यात परीक्षा असल्याने शिबिरांचे प्रमाण कमी होते. एप्रिल ते जूनमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, लग्नसराई, पर्यटनासाठी लोक घराबाहेर पडले आहेत, ग्रामीण भागात शेतीच्या कामांची धांदल उडालेली असते, त्यात कडक उन्हामुळे एकदमच रक्तदान शिबिरे ठप्प होतात. परिणामी रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा ठणठणाट पहावयास मिळत आहे.

कोल्हापुरात सरासरी महिन्याला ७ ते ८ हजार पिशव्यांचे संकलन होते आणि ८ ते ९ हजार पिशव्यांची मागणी असते. सध्या रक्त संकलन पूर्णपणे बंद आणि मागणी तेवढीच आहे. त्यात रक्त साठवणुकीसाठी विशिष्ट कालमर्यादा असल्याने रक्तटंचाई भासत आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये केवळ तातडीच्या शस्त्रक्रियाच होत आहेत. ज्या शस्त्रक्रिया दोन-तीन महिन्यांनी करणे शक्य आहे, अशा लांबणीवर टाकल्या जात आहेत. रक्तटंचाई दूर करण्यासाठी रक्तपेढ्यांनी सामुदायिकपणे प्रयत्न करणे गरजेचे असून एप्रिल, मे महिन्यासाठी शिबिरांचे आयोजन केले पाहिजे.

रक्त घटकांचे आयुष्यमान असे-रक्तघटक आयुष्यमानप्लेटलेटस ५ दिवससंपूर्ण रक्त ३२ दिवसतांबड्या पेशी ४२ दिवसप्लाझमा १ वर्षक्रायो १ वर्षऐच्छिक रक्तदानामुळे पेचरुग्णाला तातडीने रक्त हवे असते आणि रक्तपेढीत रक्तनसते, अशा वेळी बदली रक्तदेऊन आवश्यक घटक घेतला जातो. पण राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आदेशानुसार रक्तदान हे ऐच्छिक असल्याने रक्तपेढ्यांसमोर पेच आहे.तांबड्या पेशींची अधिक गरजसुट्टी असल्याने सध्या नियोजित शस्त्रक्रियांची संख्याही अधिक असते. त्यामुळे रक्ताची मागणीही वाढते, सध्याचे वातावरण पाहता इतर रक्त घटकांच्या तुलनेत तांबड्या पेशींची मागणी अधिक असते.

-टंचाईवर काय करावेजयंती, उत्सवादिवशी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करणे टाळणे.टंचाईच्या काळात म्हणजे एप्रिल, मे महिन्यासाठी शिबिरांसाठी हॉस्पिटलने पुढाकार घ्यावा.नियोजित शस्त्रक्रिया करणाºया रुग्णांच्या नातेवाईकांनी अगोदरच रक्तदान करून रक्ताची गरज पूर्ण करावी.

तीव्र उन्हाळा, महाविद्यालयांना सुट्टीसह इतर कारणांमुळे रक्तटंचाई भासते. यासाठी एकदम रक्तसंकलन न करता, टप्याटप्प्याने करावे. अनावश्यक साठाही अनेकवेळा खराब होतो.- प्रकाश घुंगूरकर, अध्यक्ष, जीवनधारा ब्लड बॅँक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल