शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कोल्हापूर : आवक वाढल्याने टोमॅटोचे दर गडगडले,  कोथळीत उभ्‍या पिकात सोडल्या मेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 6:44 PM

टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतक-यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतक-यांनी टोमॅटोच्या उभ्‍या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचे चित्र आहे. बाजारात आवक वाढल्याने व कर्नाटकातून येणा-या टोमॅटोमुळे हे दर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देआवक वाढल्याने टोमॅटोचे दर गडगडलेकोथळीत उभ्‍या पिकात सोडल्या मेंढ्याशेतकरी आर्थिक संकटात; उत्पादन खर्चही निघेना

संदीप बावचे

जयसिंगपूर : टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतक-यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतक-यांनी टोमॅटोच्या उभ्‍या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचे चित्र आहे. बाजारात आवक वाढल्याने व कर्नाटकातून येणा-या टोमॅटोमुळे हे दर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

शिरोळ तालुक्यातील कोथळी, दानोळी, चिपरी, नांदणी, जैनापूर या परिसरात टोमॅटोचे पिक घेतले जाते. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल म्हणून या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड केली. परंतु सध्या टोमॅटोला अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. गेल्या आठवड्यात दहा रुपये किलो असणारा टोमॅटो आता पाच रुपये किलो दराने विकला जात आहे.सध्या जागेवर तीन ते चार रुपये किलो दराने व्यापा-यांकडून टोमॅटोची मागणी होत आहे. वाहतुक खर्च, काढणी खर्च याचा हिशोब घातल्यास टोमॅटोचे पिक न परवडणारे बनले आहे. त्यामुळे सध्या टोमॅटोला प्रतिकिलो एक ते दोन रुपये प्रमाणे शेतक-याला पैसे मिळत आहेत.कोथळी (ता.शिरोळ) येथील शेतक-यांकडून आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या जात आहेत. तर समाधानकारक बाजारभाव नसल्याने तसेच वाहतुक खर्चही निघत नसल्याने काही शेतक-यांनी उभ्‍या पिकात शेळ्या, मेंढ्या चरावयास सोडल्या आहेत.

 

टोमॅटोला भाव नसल्याने सुमारे ८०० पेटी निघणारा असा एकूण २० हजार किलो टोमॅटोच्या पिकात शेळ्या, मेंढ्या चरायला सोडून दिल्या. तोडणी व वाहतुक खर्च अंगावर बसत असल्याने टोमॅटोची तोडणी बंद केली आहे. दलालांच्या संकटातून अजूनही शेतकरी सुटलेला नाही.- कुबेर चौगुले, शेतकरी कोथळी 

दोन एकर क्षेत्रातील टोमॅटो पिक सध्या तसेच सोडून दिले आहे. कर्नाटकातून येणारा व शितगृहामुळे टोमॅटोची आवक वाढली आहे. शासनाकडे ऊस क्षेत्राबाबत माहिती असते. मात्र, टोमॅटोसह भाजीपाला पिकाची माहिती नसते. त्यामुळे सरसकट शेतकरी कमी कालावधीतला भाजीपाला पिकवितो. त्यामुळे शासनाने भाजीपाला पिकाची नोंद करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.- अनिल मगदूम, शेतकरी कोथळी 

भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने वेळेत त्याची विक्री होणे गरजेचे आहे. एकीकडे औषध कंपन्या पिकाची हमी देतात तर दुसरीकडे दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे.- सुभाष पाटील, शेतकरी

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagricultureशेतीFarmerशेतकरी