शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

कोल्हापूर : आवक वाढल्याने टोमॅटोचे दर गडगडले,  कोथळीत उभ्‍या पिकात सोडल्या मेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:41 IST

टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतक-यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतक-यांनी टोमॅटोच्या उभ्‍या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचे चित्र आहे. बाजारात आवक वाढल्याने व कर्नाटकातून येणा-या टोमॅटोमुळे हे दर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देआवक वाढल्याने टोमॅटोचे दर गडगडलेकोथळीत उभ्‍या पिकात सोडल्या मेंढ्याशेतकरी आर्थिक संकटात; उत्पादन खर्चही निघेना

संदीप बावचे

जयसिंगपूर : टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतक-यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतक-यांनी टोमॅटोच्या उभ्‍या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचे चित्र आहे. बाजारात आवक वाढल्याने व कर्नाटकातून येणा-या टोमॅटोमुळे हे दर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

शिरोळ तालुक्यातील कोथळी, दानोळी, चिपरी, नांदणी, जैनापूर या परिसरात टोमॅटोचे पिक घेतले जाते. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल म्हणून या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड केली. परंतु सध्या टोमॅटोला अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. गेल्या आठवड्यात दहा रुपये किलो असणारा टोमॅटो आता पाच रुपये किलो दराने विकला जात आहे.सध्या जागेवर तीन ते चार रुपये किलो दराने व्यापा-यांकडून टोमॅटोची मागणी होत आहे. वाहतुक खर्च, काढणी खर्च याचा हिशोब घातल्यास टोमॅटोचे पिक न परवडणारे बनले आहे. त्यामुळे सध्या टोमॅटोला प्रतिकिलो एक ते दोन रुपये प्रमाणे शेतक-याला पैसे मिळत आहेत.कोथळी (ता.शिरोळ) येथील शेतक-यांकडून आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या जात आहेत. तर समाधानकारक बाजारभाव नसल्याने तसेच वाहतुक खर्चही निघत नसल्याने काही शेतक-यांनी उभ्‍या पिकात शेळ्या, मेंढ्या चरावयास सोडल्या आहेत.

 

टोमॅटोला भाव नसल्याने सुमारे ८०० पेटी निघणारा असा एकूण २० हजार किलो टोमॅटोच्या पिकात शेळ्या, मेंढ्या चरायला सोडून दिल्या. तोडणी व वाहतुक खर्च अंगावर बसत असल्याने टोमॅटोची तोडणी बंद केली आहे. दलालांच्या संकटातून अजूनही शेतकरी सुटलेला नाही.- कुबेर चौगुले, शेतकरी कोथळी 

दोन एकर क्षेत्रातील टोमॅटो पिक सध्या तसेच सोडून दिले आहे. कर्नाटकातून येणारा व शितगृहामुळे टोमॅटोची आवक वाढली आहे. शासनाकडे ऊस क्षेत्राबाबत माहिती असते. मात्र, टोमॅटोसह भाजीपाला पिकाची माहिती नसते. त्यामुळे सरसकट शेतकरी कमी कालावधीतला भाजीपाला पिकवितो. त्यामुळे शासनाने भाजीपाला पिकाची नोंद करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.- अनिल मगदूम, शेतकरी कोथळी 

भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने वेळेत त्याची विक्री होणे गरजेचे आहे. एकीकडे औषध कंपन्या पिकाची हमी देतात तर दुसरीकडे दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे.- सुभाष पाटील, शेतकरी

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagricultureशेतीFarmerशेतकरी