शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी वाढवल्यामुळे यंदा शेतक-यांना 3400 रुपयांचा पहिला हप्ता मिळणार -  सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 21:56 IST

केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढवली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा किमान साला प्रति टन 3400 रुपयांचा पहिला हप्ता निश्‍चितपणे मिळणार आहे, असे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

इचलकरंजी - केंद्र सरकारने यंदा एफआरपी वाढवली आहे. त्यामुळे साखरेचा सरासरी उतारा पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा किमान साला प्रति टन 3400 रुपयांचा पहिला हप्ता निश्‍चितपणे मिळणार आहे. त्यामुळे ऊस दरासाठी आंदोलन करण्याची गरजच उरली नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित रयत क्रांती संघटनेच्या पहिल्या शेतकरी मेळाव्यात मंत्री खोत बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर यांची खास उपस्थिती होती. खोत पुढे म्हणाले रयत क्रांती संघटना कोणाची संघटना मोडण्यासाठी नसून ती शेतकर्‍यांचा संसार उभारण्यासाठी आहे. तसेच माझ्या जाण्याने स्वाभिमानीचा टवकाही उडला नाही म्हणणार्‍यांना खिंडार पडल्याचा टोलाही यावेळी खोत यांनी लगावला. वेगवेगळे आरोप करुन माझ्यामुळेच शेतकर्‍यांचा प्रश्‍न निर्माण झाल्याची टीका होत आहे. पण 32 वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त शेतकर्‍यांसाठी लढलो असून त्यासाठी कोणी निष्ठेचे सर्टीफिकेट देण्याची गरज नाही. जनतेने राजीनामा मगितल्यास हजारवेळा राजीनामा देईन, पण मी गड सोडून पळणारा नव्हे तर लढणारा कार्यकर्ता आहे. माझा राजीनामा मागण्याचा हक्क केवळ शेतकर्‍याला असून कोणीतरी सांगतो म्हणून मी राजीनामा देणार नाही. 

देशात सरासरी 235 ते 245 लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. मात्र गरज 250 ते 260 लाख मेट्रीक टन इतकी आहे. गरजेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने सखरेचे दर स्थिर रहाणार आहेत. शिवाय एफआरपीनुसार 9.5 टक्के साखर उतार्‍यासाठी 2550 रुपये, 12 टक्क्याला 3220 आणि 13 टक्क्याला 3486 रुपये प्रति टन असा कायद्यानुसार दर कारखानदारांना द्यावाच लागणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सरासरी 12.50 टक्के साखर उतार्‍यामुळे 3400 रुपयांचा पहिला हप्ता निश्‍चित मिळणार आहे. तरीही एफआरपी आणि अधिक 300 रुपये अधिक असा दर कारखांदारांनी द्यावा असे आवाहन ही त्यांनी केले. तसेच साखरेचा भाव वाढला तर रंगराजन शिफारशीनुसार 70:30 हा फॉर्म्युला वापरायचा असेही त्यांनी स्पष्ट केले. मी सत्तेत असलो तरी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सरकार ऐकत नसेल तर आंदोलनासाठी बलिदानाची तयारी ठेवा, असे आवाहन खोत यांनी केले. स्वागत मोहन माने यांनी तर प्रास्ताविक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, सागर खोत, सतिश वुरूलकर, संघटनेचे युवाध्यक्ष शार्दुल जाधवर आदींची भाषणे झाली. मेळाव्यास महाराष्ट्र, कोकण, खानदेश, कर्नाटक आदी भागातून शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणारसरसकट कर्जमाफीचा लाभ 50 लाख शेतकर्‍यांना मिळणार असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच 2018 पर्यन्त नियमित कर्जाची परतफेड करणार्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे.

पवार शेट्टी एक गट्टीबारामतीत जाऊन ज्या पवारांना नावे ठेऊन तुम्ही खासदार झालात आता त्यांचे गुणगान तुम्ही गात गळ्यात गळे घालून फिरत आहात, असा आरोप खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.

प्रत्येक जिल्ह्यात वेगळीच गट्टीआम्हाला एकनिष्ठ नाही म्हणणाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वेग-वेगळ्या पक्षाबरोबर युती केली आहे. सत्तेसाठी सगळे चालतात मग सदाभाऊ का नाही चालला,असा सवाली खोत यांनी केला.

टॅग्स :Farmerशेतकरी