दोन मुलांसह पत्नीच्या अपंगत्वामुळे वृद्धाची दमछाक

By Admin | Updated: August 10, 2015 21:11 IST2015-08-10T21:11:55+5:302015-08-10T21:11:55+5:30

आमजाई व्हरवडे येथील कुटुंब : वयाच्या सत्तराव्या वर्षी कुटुंबाच्या अपंगत्वाचे ओझे अंगावर घेऊन हाकत आहेत संसाराचा गाडा

Due to the disability of the wife with two children | दोन मुलांसह पत्नीच्या अपंगत्वामुळे वृद्धाची दमछाक

दोन मुलांसह पत्नीच्या अपंगत्वामुळे वृद्धाची दमछाक


शिरोळ तालुका : दानोळी, उमळवाड, उदगावात स्वतंत्र पद भरण्याची गरज
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व मोठ्या गावात गेल्या दहा वर्षांपासून
पोलीसपाटील पदे रिक्त आहेत. कोथळी येथील एका पोलीसपाटलावर ६० हजार लोकसंख्येचा ताण असून दानोळी, उदगांव, उमळवाड गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची वारंवार मागणी होत आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.
तालुक्यातील दानोळी, उदगांव, उमळवाड, कोथळी या चार गावांची लोकसंख्या सुमारे ६० हजारांपर्यंत आहे. राजकीय व सामाजिक घडामोडीत अग्रेसर असणाऱ्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे गोपनीय कामकाज पोलीसपाटलांमार्फत होत असते. तसेच गावातील छोटे-मोठे तंटे सोडविण्याचे काम पोलीस पाटील यांच्याकडे असते. मात्र, शासनाने पोलीस पाटील रिक्त जागा भरण्याच्या कामात दिरंगाई केली आहे.
कोथळी येथील पोलीसपाटील उत्तम तिवडे यांच्यावर सध्या प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या लोकसंख्येची गावे नेमून दिली आहेत. त्यामध्ये दानोळी २० हजार, उदगाव २२ हजार, कोथळी १२ हजार, उमळवाड ८ हजार या गावांतील जबाबदारी त्यांच्यावर आहे. या चार गावांचे पोलीसपाटीलकी करताना त्यांची मोठी दमछाक होत आहे. शासनाकडून त्यांना एका कोथळी गावाचे मानधन मिळते व यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले उदगांव, दानोळी ही गावे मोठी असून या गावात स्वतंत्र पोलीसपाटील पद भरणे गरजेचे आहे. एकाच पोलीसपाटलांमुळे चार गावांतील छोटे-मोठे तंटे मिटविण्यासाठी भेटी देणे शक्य होत नाही. त्यामुळे गावामध्ये होणारे
तंटे रौद्ररूपधारक केल्यानंतरच
पोलीस ठाण्याला समजते. त्यामुळे गावातील शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या गावात स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील तरुणांना नोकरीच्या कामासाठी लागणारा वर्तणुकीचा दाखला, घातपाताची नोंद, पंचनामे व विविध दाखले यासाठी तीन
गावांतील नागरिकांना कोथळी पोलीसपाटील तिवडे किंवा जयसिंगपूर पोलीस ठाण्याला जावे लागते. (प्रतिनिधी)

संवेदनशील गावे
दानोळी हे संवेदनशील गाव असून याठिकाणी वारंवार वादावादीचे प्रकार घडत असतात, तर उदगाव येथेही वाळूच्या कारणामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे या दोन गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. जयसिंगपूर पोलीस ठाणेअंतर्गत उदगाव व दानोळी येथे पोलीस चौकीची गरज आहे.

Web Title: Due to the disability of the wife with two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.