आठ दिवस मिळवलेले एका दिवसात घालवू नका - हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:59+5:302021-05-24T04:22:59+5:30
(हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात गेली आठ ...

आठ दिवस मिळवलेले एका दिवसात घालवू नका - हसन मुश्रीफ
(हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात गेली आठ दिवस तर कागल व गडहिंग्लजमध्ये चौदा दिवस कडक लॉकडाऊन होते. नागरिकांनी घरात बसून स्वत:ला सुरक्षित ठेवले, पण आजपासून लॉकडाऊन शिथिल होत आहे. त्यामुळे आठ दिवसात मिळवलेले एका दिवसात घालवू नका, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांनी वाढणारी बाधितांची संख्या, कुटुंबेच्या कुटुंबे व्याधिग्रस्त व तरुणांचे होणारे मृत्यू पाहता जे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आजपासून राज्याच्या नियमावलीनुसार ३१ मेपर्यंत लॉकडाऊन शिथिल होणार आहे. सकाळी सात ते अकरापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने, बँका आदी सुरू होणार आहेत. तरी आपणास हात जोडून विनंती आहे की, खरेदीसाठी अथवा दैनंदिन व्यवहारासाठी गर्दी करू नका. जे गेली आठ ते चौदा दिवस घरात बसून मिळवले ते एका दिवसात घालवू नका. आता खरेदी केली नाही तर पुन्हा आयुष्यात काही मिळणारच नाही, असे समजू नका. सामाजिक अंतर राखा, मास्क वापरा.
पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये ज्या चुका आपण सर्वांनी केल्या त्या पुन्हा केल्या तर गंभीर परिस्थिती उद्भवेल. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका अधिक असल्याने चुका टाळून पुढे जायचे आहे, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.