शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अंगणास या करू नये रे कधी रणांगण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST

कोल्हापूर : ‘अंगणास या करू नये रे कधी रणांगण, विसरून जावे माजघरातच आपले भांडण’ ही नरहर कुलकर्णी यांची गझल ...

कोल्हापूर : ‘अंगणास या करू नये रे कधी रणांगण, विसरून जावे माजघरातच आपले भांडण’ ही नरहर कुलकर्णी यांची गझल असो किंवा राजश्री सूर्यवंशी यांची, ‘जीव वेडा वाट पाही त्या क्षणांची सारखी, अंगणी चाहूल आता माणसांची पारखी’ ही गझल असाे. यासारख्या गजलांनी गझलसाद समूहाच्यावतीने रविवारी आयोजित मुशायऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

डॉ. संजीवनी तोफखाने यांनी, ‘ध्येयवेड्या माणसांची आज आहे वानवा, ज्ञानवादी ज्ञातकांची आज आहे वानवा, अशी सुरुवात केली. प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांनी, ‘ कधीतरी तू प्रियकर हो ना सहज म्हणाले, अवचित येऊन जवळी घे ना सहज म्हणाले’ अशी प्रेमभावना व्यक्त केली. सारिका पाटील यांनी, ‘झुंज द्यायची आहे, खडतर बाकी काही नाही,’ अशा प्रभावी रचना सादर केल्या.

अशोक वाडकर यांनी, ‘किती कथा या शहराच्या, किती? व्यथा या शहराच्या’ असे वास्तव मांडले. प्रवीण पुजारी यांनी, ‘कोणाच्याही खांद्यावर मी ओझे ठेवत नाही’. डॉ. दयानंद काळे यांनी, ‘घेऊन सोंग आता झोपायचे किती?, समजून धर्म अफूला मी प्यायचे किती? प्रसाद कुलकर्णी यांनी ‘हीच सदिच्छा उरी जपावी नवीन वर्षी ,स्नेहफुलांची बाग फुलावी नवीन वर्षी , अशी रचना सादर करत मानवता व गझल यांचे नाते बळकट होवो, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी हेमंत डांगे यांनी मराठी व उर्दू गझल सादर केल्या. प्रथमेश गंगापुरे यांनीही रचना सादर केली. नागेशकर सभागृहात झालेल्या या मैफलीला सुभाष नागेशकर ,वरुणा कुलकर्णी, अभय वाडकर यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.

०४०१२०२१ कोल गझलसाद

येथील गझलसाद समूहाच्या मुशायऱ्यावेळी गझलकारांनी उपस्थित राहून उत्तम गझलांचे सादरीकरण केले.