शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अंगणास या करू नये रे कधी रणांगण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST

कोल्हापूर : ‘अंगणास या करू नये रे कधी रणांगण, विसरून जावे माजघरातच आपले भांडण’ ही नरहर कुलकर्णी यांची गझल ...

कोल्हापूर : ‘अंगणास या करू नये रे कधी रणांगण, विसरून जावे माजघरातच आपले भांडण’ ही नरहर कुलकर्णी यांची गझल असो किंवा राजश्री सूर्यवंशी यांची, ‘जीव वेडा वाट पाही त्या क्षणांची सारखी, अंगणी चाहूल आता माणसांची पारखी’ ही गझल असाे. यासारख्या गजलांनी गझलसाद समूहाच्यावतीने रविवारी आयोजित मुशायऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

डॉ. संजीवनी तोफखाने यांनी, ‘ध्येयवेड्या माणसांची आज आहे वानवा, ज्ञानवादी ज्ञातकांची आज आहे वानवा, अशी सुरुवात केली. प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांनी, ‘ कधीतरी तू प्रियकर हो ना सहज म्हणाले, अवचित येऊन जवळी घे ना सहज म्हणाले’ अशी प्रेमभावना व्यक्त केली. सारिका पाटील यांनी, ‘झुंज द्यायची आहे, खडतर बाकी काही नाही,’ अशा प्रभावी रचना सादर केल्या.

अशोक वाडकर यांनी, ‘किती कथा या शहराच्या, किती? व्यथा या शहराच्या’ असे वास्तव मांडले. प्रवीण पुजारी यांनी, ‘कोणाच्याही खांद्यावर मी ओझे ठेवत नाही’. डॉ. दयानंद काळे यांनी, ‘घेऊन सोंग आता झोपायचे किती?, समजून धर्म अफूला मी प्यायचे किती? प्रसाद कुलकर्णी यांनी ‘हीच सदिच्छा उरी जपावी नवीन वर्षी ,स्नेहफुलांची बाग फुलावी नवीन वर्षी , अशी रचना सादर करत मानवता व गझल यांचे नाते बळकट होवो, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी हेमंत डांगे यांनी मराठी व उर्दू गझल सादर केल्या. प्रथमेश गंगापुरे यांनीही रचना सादर केली. नागेशकर सभागृहात झालेल्या या मैफलीला सुभाष नागेशकर ,वरुणा कुलकर्णी, अभय वाडकर यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.

०४०१२०२१ कोल गझलसाद

येथील गझलसाद समूहाच्या मुशायऱ्यावेळी गझलकारांनी उपस्थित राहून उत्तम गझलांचे सादरीकरण केले.