शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

निवडणुकीच्या तोंडावर पाचगावच्या पाणीप्रश्नाची आठवण का ?: अमल महाडिक यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:57 IST

बारा वर्षे आमदार आणि त्यातील तीन वर्षे मंत्री असताना पाचगावच्या पाणीप्रश्न ज्यांना सोडविता आला नाही, त्यांना निवडणुकीच्या तोंडवरच हा प्रश्न कसा आठवला, असा सवाल आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर पाचगावच्या पाणीप्रश्नाची आठवण का ? अमल महाडिक यांचा सवाल

कोल्हापूर : बारा वर्षे आमदार आणि त्यातील तीन वर्षे मंत्री असताना पाचगावच्या पाणीप्रश्न ज्यांना सोडविता आला नाही, त्यांना निवडणुकीच्या तोंडवरच हा प्रश्न कसा आठवला, असा सवाल आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.निवेदनात म्हटले आहे, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये बैठक घेऊन पाचगावसाठी पाच कोटी तीन लाख रुपये मंजूर करून आणले. त्यातून शिक्षक कॉलनीत साडेतीन लाख लिटरची पाणी टाकी उभी केली. उजळाईवाडीतून चित्रनगरीला आणि तिथून पाचगावला नव्या पाईपलाईनद्वारे पाणी नेले. २६ जानेवारी २०१६ पासून पाचगावला रोज १४ लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे. याव्यतिरिक्त ज्या कॉलनी आणि वस्तींना पाणीपुरवठा होत नाही, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि नियोजन समितीमधून काम मंजूर झाले आहे.खास बाब म्हणून टंचाई निधीतून दहा कोटी ५३ लाख रुपये मंजूर करून घेतले असून, यातून गळकी पाईप बदलणे, जलशुद्धिकरण, पंप बदलणे ही कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत २०२ कोटी ८८ लाख रुपये मंजूर केले असून, यातून गांधीनगरजवळील १३ गावे आणि नवीन ७ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.या सर्व परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असताना नंदगावमधून पाणी आणण्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची कुणकुण लागल्यानेच श्रेय घेण्यासाठी ही संबंधितांची धडपड असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाचगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी आणि माझे शासन बांधील आहे. केवळ पाचगावसाठी १६०० मीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. मात्र, ही कामे आपण मंजूर केल्याचे भासवून श्रेय लाटण्याचा उद्योग बंद करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.

तुमचे कर्तृत्व माहिती आहेपाचगाव, गांधीनगरच्या पाणी योजनांसाठी काय केले याची माहिती देताना आमदार अमल महाडिक यांनी नाव न घेता आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. आयआरबी प्रकल्प आणि अपुरी थेट पाईपलाईन योजना हे तुमचे कर्तृत्व सर्वांना माहिती आहे, असे पत्रकात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Amal Mahadikअमल महाडिकkolhapurकोल्हापूर