शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

दरवाजा लवकर उघडला नाही म्हणून वडिलांचा भोकसून खून

By admin | Updated: May 8, 2017 18:00 IST

कोल्हापुरातील शाहू कॉलनीतील घटना : तरुणास अटक

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0८ : शाहू कॉलनी, विक्रमनगर येथे रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा लवकर उघडला नसल्याच्या रागातून तरुणाने वडिलांचा चाकूने भोकसून खून केला. पिरसाब महंमद मुल्ला (वय ५५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित रफिक पिरसाब मुल्ला (३०) याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकूही जप्त केला. ही घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी, पिरसाब मुल्ला यांचे विक्रमनगर शाहू कॉलनीत दुमजली कौलारू घर आहे. ते सेंट्रिंगचा व्यवसाय करीत होते. पत्नी, दोन मुले, मुलगी असे पाचजणांचे कुटुंब. पाच वर्षांपूर्वी थोरला मुलगा रफिक याचे लग्न केले. त्याला दोन मुले आहेत. रफिकदेखील सेंट्रिंगचा व्यवसाय करतो. तो दारूच्या आहारी गेल्याने नेहमी घरी उशिरा यायचा. घरी आल्यानंतर त्याचा आई-वडिलांसह पत्नीशी वाद होत असे. रफिक रविवारी सकाळी सेंट्रिंगच्या कामासाठी बाहेर पडला. नेहमीप्रमाणे रात्री अकरापर्यंत तो घरी न आल्याने त्याला बाहेरच राहू दे, असा निर्णय घेत वडिलांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास तो दारू ढोसून घरी आला.

दरवाजा बंद असल्याने त्याने दरवाजा उघडण्यासाठी हाक मारली. त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून घरातील लोकांनी बराचवेळ दरवाजा उघडलाच नाही. त्यानंतर त्याने दरवाजावर जोरात लाथा मारत ओरडायला सुरुवात केली. अखेर वैतागून वडील पिरसाब यांनी दरवाजा उघडत इतका वेळ कोठे होतास, अशी विचारणा केली. त्यावर मला कोण विचारणारा, दरवाजा लवकर उघडला नाहीस काय, तुला आता सोडत नाही, असे म्हणून जवळ असलेला चाकू बाहेर काढून त्यांच्या पोटात, छातीवर, कंबरेवर चार गंभीर वार केले. काही क्षणातच ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.

रफिक याचा रुद्र अवतार पाहून जिवाच्या भीतीने घरातील इतर सर्वजण आरडाओरड करीत बाहेर पळत आले. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे लोक धावत घरी आले. शब्बीर वाटंगी यांनी रफिकला पकडले, तर राजू पाटील यांनी त्याच्या हातातील रक्ताने माखलेला चाकू काढून घेतला. यावेळी या दोघांना हिसडा मारून तो पळून गेला. गंभीर वार झाल्याने पिरसाब बेशुद्ध पडले होते. शेजारील लोकांनी त्यांना रिक्षातून तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

घरातील साहित्याची तोडफोड पळून गेलेला रफिक पुन्हा घरी आला. त्याने बेफाम होत पत्नी, बहीण, भावाला शिवीगाळ करीत घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. या प्रकाराची माहिती नागरिकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांना दिली. ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. पोलीस आल्याची चाहूल लागताच रफिकने अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्याचा शोध घेतला असता तो विक्रमनगर गल्ली नं. ३ मध्ये लपून बसलेला मिळून आला. यावेळी त्याने पोलिसांशीही हुज्जत घातली.

सराईत गुन्हेगार

रफिक मुल्ला हा सेंट्रिंगचा व्यवसाय करीत असला तरी त्याचा गुन्हेगारी टोळीमध्ये सक्रिय सहभाग असायचा. विक्रमनगरमध्ये गुंड संजय निरंगे व लखन कांबळे या दोन गुंडांच्या टोळीमध्ये वर्चस्व वादातून खुनी हल्ला झाला होता. त्यामध्ये रफिकवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुंड निरंगे, बबलू माने, शरद पाटील यांच्या टोळीमध्ये तो सदस्य आहे. सगळं सांगण्यासारखं नाही रफिक याने वडिलांवर अतिशय क्रुरपणे वार केले आहेत. इतकी खुन्नस काय होती? असा प्रश्न पोलिसांनी त्याला केला. त्यावर साहेब, कौटुंबिक वाद आमच्यात आहे. सगळंच सांगण्यासारखं नाही, असे सांगून तो शांत झाला.