शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

हुंडा देणार नाही, घेणारही नाही, लमाण समाजाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:43 IST

कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना ...

ठळक मुद्देहुंडा देणार नाही, घेणारही नाही, लमाण समाजाचा निर्णयकोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा, सेवालाल महाराजांची शपथ 

कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना मूठमाती देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. हुंडा देण्याघेण्यावर निर्बंध घालतानाच अंत्यविधीवेळी होणाऱ्या अनावश्यक खर्चाच्या बाबतीतही नवा विचार स्वीकारण्याची समाजाने सामूहिक शपथ घेतली.लमाण समाज विकास संघाच्या नेतृत्वाखाली शाहू स्मारक भवनमध्ये लमाण समाजाचा मेळावा झाला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील समाजबांधव मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र पवार यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या या मेळाव्यात सुरेश पवार, वसंतराव मुळीक, अशोक लाखे, विमल राठोड, संजू राठोड, राजू चव्हाण, अविनाश सरनाईक, पुंडलिक चव्हाण, संतोष राठोड, अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.लमाण समाज भटक्या विमुक्तात मोडतो. या समाजात पारंपरिक प्रथा मोठ्या प्रमाणावर आहेत. या समाजाचे संत असलेले सेवालाल हे पुरोगामी विचारांचे होते. समाजाला अडचणीत घालणाºया प्रथा, परंपरांना त्यांचा विरोध होता. ते स्वत: शाकाहारी होते; पण समाज एकसंघ राहावा म्हणून परंपरांना टोकाचा विरोध केला नाही. परिणामी याचा वेगळा अर्थ काढून समाजात हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथेने पाय घट्ट केले.

साखरपुड्याला ताटात पाच लाख रुपये, त्यानंतर गाडी व उर्वरित १५ लाखांपर्यंतचा हुंडा वधुपित्याकडून घेतल्याशिवाय वर बोहल्यावर चढत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हुंडा देणे समाजातील सर्वसामान्यांना परवडत नाही. तरीही समाजाच्या विरोधात जायचे नाही म्हणून हुंडा देणे-घेणे सुरूच आहे. शिवाय मयताच्या वेळी लाख दीडलाख रुपये सहज खर्च होतात. मांसाहारी पंगती उठतात. यातून समाजातील गोरगरिबांना न झेपणारा खर्च करावा लागतो. प्रसंगी कर्ज काढावे लागते.या प्रथांच्या विरोधात समाजातच आता आवाज उठू लागला आहे. मेळाव्यात सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेत, या प्रथा पाळणार नसल्याचे समाजाने हात उंचावून जाहीर केले. याचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यासह महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचाही निर्णय झाला.

२५ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणभटक्या विमुक्त जाती जमातीला झोपडपट्टी योजना लागू करणे. आदिवासींप्रमाणे लमाण समाजाला हक्काने जमीन मिळणे, विधवांना संजय गांधी निराधार पेन्शन चालू करणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळणे, वसंतराव नाईक तांडा वस्तीसाठी ७0 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविणे, आदी मागण्यांसाठी समाजाने लढ्याची घोषणा केली. २४ पर्यंत निर्णय न झाल्यास २५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूकरण्याचा निर्णय मेळाव्यात झाला.

 

 

टॅग्स :Socialसामाजिकkolhapurकोल्हापूर