शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

हुंडा देणार नाही, घेणारही नाही, लमाण समाजाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:43 IST

कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना ...

ठळक मुद्देहुंडा देणार नाही, घेणारही नाही, लमाण समाजाचा निर्णयकोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा, सेवालाल महाराजांची शपथ 

कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना मूठमाती देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. हुंडा देण्याघेण्यावर निर्बंध घालतानाच अंत्यविधीवेळी होणाऱ्या अनावश्यक खर्चाच्या बाबतीतही नवा विचार स्वीकारण्याची समाजाने सामूहिक शपथ घेतली.लमाण समाज विकास संघाच्या नेतृत्वाखाली शाहू स्मारक भवनमध्ये लमाण समाजाचा मेळावा झाला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील समाजबांधव मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र पवार यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या या मेळाव्यात सुरेश पवार, वसंतराव मुळीक, अशोक लाखे, विमल राठोड, संजू राठोड, राजू चव्हाण, अविनाश सरनाईक, पुंडलिक चव्हाण, संतोष राठोड, अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.लमाण समाज भटक्या विमुक्तात मोडतो. या समाजात पारंपरिक प्रथा मोठ्या प्रमाणावर आहेत. या समाजाचे संत असलेले सेवालाल हे पुरोगामी विचारांचे होते. समाजाला अडचणीत घालणाºया प्रथा, परंपरांना त्यांचा विरोध होता. ते स्वत: शाकाहारी होते; पण समाज एकसंघ राहावा म्हणून परंपरांना टोकाचा विरोध केला नाही. परिणामी याचा वेगळा अर्थ काढून समाजात हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथेने पाय घट्ट केले.

साखरपुड्याला ताटात पाच लाख रुपये, त्यानंतर गाडी व उर्वरित १५ लाखांपर्यंतचा हुंडा वधुपित्याकडून घेतल्याशिवाय वर बोहल्यावर चढत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हुंडा देणे समाजातील सर्वसामान्यांना परवडत नाही. तरीही समाजाच्या विरोधात जायचे नाही म्हणून हुंडा देणे-घेणे सुरूच आहे. शिवाय मयताच्या वेळी लाख दीडलाख रुपये सहज खर्च होतात. मांसाहारी पंगती उठतात. यातून समाजातील गोरगरिबांना न झेपणारा खर्च करावा लागतो. प्रसंगी कर्ज काढावे लागते.या प्रथांच्या विरोधात समाजातच आता आवाज उठू लागला आहे. मेळाव्यात सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेत, या प्रथा पाळणार नसल्याचे समाजाने हात उंचावून जाहीर केले. याचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यासह महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचाही निर्णय झाला.

२५ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणभटक्या विमुक्त जाती जमातीला झोपडपट्टी योजना लागू करणे. आदिवासींप्रमाणे लमाण समाजाला हक्काने जमीन मिळणे, विधवांना संजय गांधी निराधार पेन्शन चालू करणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळणे, वसंतराव नाईक तांडा वस्तीसाठी ७0 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविणे, आदी मागण्यांसाठी समाजाने लढ्याची घोषणा केली. २४ पर्यंत निर्णय न झाल्यास २५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूकरण्याचा निर्णय मेळाव्यात झाला.

 

 

टॅग्स :Socialसामाजिकkolhapurकोल्हापूर