शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

हुंडा देणार नाही, घेणारही नाही, लमाण समाजाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:43 IST

कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना ...

ठळक मुद्देहुंडा देणार नाही, घेणारही नाही, लमाण समाजाचा निर्णयकोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा, सेवालाल महाराजांची शपथ 

कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना मूठमाती देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. हुंडा देण्याघेण्यावर निर्बंध घालतानाच अंत्यविधीवेळी होणाऱ्या अनावश्यक खर्चाच्या बाबतीतही नवा विचार स्वीकारण्याची समाजाने सामूहिक शपथ घेतली.लमाण समाज विकास संघाच्या नेतृत्वाखाली शाहू स्मारक भवनमध्ये लमाण समाजाचा मेळावा झाला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील समाजबांधव मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र पवार यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या या मेळाव्यात सुरेश पवार, वसंतराव मुळीक, अशोक लाखे, विमल राठोड, संजू राठोड, राजू चव्हाण, अविनाश सरनाईक, पुंडलिक चव्हाण, संतोष राठोड, अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.लमाण समाज भटक्या विमुक्तात मोडतो. या समाजात पारंपरिक प्रथा मोठ्या प्रमाणावर आहेत. या समाजाचे संत असलेले सेवालाल हे पुरोगामी विचारांचे होते. समाजाला अडचणीत घालणाºया प्रथा, परंपरांना त्यांचा विरोध होता. ते स्वत: शाकाहारी होते; पण समाज एकसंघ राहावा म्हणून परंपरांना टोकाचा विरोध केला नाही. परिणामी याचा वेगळा अर्थ काढून समाजात हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथेने पाय घट्ट केले.

साखरपुड्याला ताटात पाच लाख रुपये, त्यानंतर गाडी व उर्वरित १५ लाखांपर्यंतचा हुंडा वधुपित्याकडून घेतल्याशिवाय वर बोहल्यावर चढत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हुंडा देणे समाजातील सर्वसामान्यांना परवडत नाही. तरीही समाजाच्या विरोधात जायचे नाही म्हणून हुंडा देणे-घेणे सुरूच आहे. शिवाय मयताच्या वेळी लाख दीडलाख रुपये सहज खर्च होतात. मांसाहारी पंगती उठतात. यातून समाजातील गोरगरिबांना न झेपणारा खर्च करावा लागतो. प्रसंगी कर्ज काढावे लागते.या प्रथांच्या विरोधात समाजातच आता आवाज उठू लागला आहे. मेळाव्यात सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेत, या प्रथा पाळणार नसल्याचे समाजाने हात उंचावून जाहीर केले. याचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यासह महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचाही निर्णय झाला.

२५ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणभटक्या विमुक्त जाती जमातीला झोपडपट्टी योजना लागू करणे. आदिवासींप्रमाणे लमाण समाजाला हक्काने जमीन मिळणे, विधवांना संजय गांधी निराधार पेन्शन चालू करणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळणे, वसंतराव नाईक तांडा वस्तीसाठी ७0 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविणे, आदी मागण्यांसाठी समाजाने लढ्याची घोषणा केली. २४ पर्यंत निर्णय न झाल्यास २५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूकरण्याचा निर्णय मेळाव्यात झाला.

 

 

टॅग्स :Socialसामाजिकkolhapurकोल्हापूर