शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

दिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 16:57 IST

स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देदिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमाकन्याकुमारीपासून केला १६०० किलोमीटरचा प्रवास

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकाच्या सप्टेंबर २०१९ ते २०२० या काळात साजऱ्या होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आर. थांगराजा यांनी ‘विश्वबंधुत्व दिवसा’च्या औचित्याने ११ सप्टेंबर रोजी या परिक्रमेस कन्याकुमारी येथून प्रारंभ केला. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून थांगराजा यांनी खास तयार केलेल्या स्कूटरवरून कन्याकुमारीहून लेह, इटानगर आणि कन्याकुमारी अशा मार्गाने त्यांची परिक्रमा सुरू केली आहे.गोव्याहून मंगळवारी (दि. १७) रात्री कोल्हापुरात आलेल्या थांगराजा यांनी बुधवारी पुण्याकडे प्रयाण केले. तेथून ते मुंबईकडे जाणार आहेत. कोल्हापुरात ‘प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड’चे अंध कार्यकर्ते सतीश नवले, कोल्हापूर केंद्राचे संचालक अरुण जनार्दन कुलकर्णी, ज्ञानसंवर्धन प्रकाशनचे ज्ञानराज भेलोंडे यांनी त्यांचे स्वागत केले.कन्याकुमारी येथील इझुस्सातूपट्टू येथे २१ जून १९८१ रोजी जन्मलेल्या थांगराजा यांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले असून २००८ पासून ते कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात कार्यरत आहेत. या शिलास्मारकाच्या उभारणीमध्येही त्यांनी त्यांच्या आईसह योगदान दिले आहे. पोलिओमुळे लहानपणापासून त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.यापूर्वी केलेल्या परिक्रमा१. कन्याकुमारी ते चेन्नई द्वारा रामेश्वरम, पुडुचेरी (१९ दिवसांत ११०० किलोमीटर, १९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१३)२. कोलकाता ते कन्याकुमारी, द्वारा ओरिसा-आंध्र प्रदेश (५२ दिवसांत २८०० किलोमीटर, २२ जुलै ते ११ सप्टेंबर २०१३)३. टिमटाला (अमरावती) ते कन्याकुमारी, द्वारा हैदराबाद, बंगलोर (१३ दिवसांत २८०० किलोमीटर, ७ ते १९ नोव्हेंबर २०१४)४. भगिनी निवेदिता जन्मशताब्दी वर्षानिमित्त कन्याकुमारी ते दार्जिलिंग, द्वारा नागपूर, कोलकाता (२३ दिवसांत ४५०० किलोमीटर, २३ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर २०१७)

 

 

टॅग्स :Divyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर