शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

दिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 16:57 IST

स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देदिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमाकन्याकुमारीपासून केला १६०० किलोमीटरचा प्रवास

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकाच्या सप्टेंबर २०१९ ते २०२० या काळात साजऱ्या होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आर. थांगराजा यांनी ‘विश्वबंधुत्व दिवसा’च्या औचित्याने ११ सप्टेंबर रोजी या परिक्रमेस कन्याकुमारी येथून प्रारंभ केला. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून थांगराजा यांनी खास तयार केलेल्या स्कूटरवरून कन्याकुमारीहून लेह, इटानगर आणि कन्याकुमारी अशा मार्गाने त्यांची परिक्रमा सुरू केली आहे.गोव्याहून मंगळवारी (दि. १७) रात्री कोल्हापुरात आलेल्या थांगराजा यांनी बुधवारी पुण्याकडे प्रयाण केले. तेथून ते मुंबईकडे जाणार आहेत. कोल्हापुरात ‘प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड’चे अंध कार्यकर्ते सतीश नवले, कोल्हापूर केंद्राचे संचालक अरुण जनार्दन कुलकर्णी, ज्ञानसंवर्धन प्रकाशनचे ज्ञानराज भेलोंडे यांनी त्यांचे स्वागत केले.कन्याकुमारी येथील इझुस्सातूपट्टू येथे २१ जून १९८१ रोजी जन्मलेल्या थांगराजा यांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले असून २००८ पासून ते कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात कार्यरत आहेत. या शिलास्मारकाच्या उभारणीमध्येही त्यांनी त्यांच्या आईसह योगदान दिले आहे. पोलिओमुळे लहानपणापासून त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.यापूर्वी केलेल्या परिक्रमा१. कन्याकुमारी ते चेन्नई द्वारा रामेश्वरम, पुडुचेरी (१९ दिवसांत ११०० किलोमीटर, १९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१३)२. कोलकाता ते कन्याकुमारी, द्वारा ओरिसा-आंध्र प्रदेश (५२ दिवसांत २८०० किलोमीटर, २२ जुलै ते ११ सप्टेंबर २०१३)३. टिमटाला (अमरावती) ते कन्याकुमारी, द्वारा हैदराबाद, बंगलोर (१३ दिवसांत २८०० किलोमीटर, ७ ते १९ नोव्हेंबर २०१४)४. भगिनी निवेदिता जन्मशताब्दी वर्षानिमित्त कन्याकुमारी ते दार्जिलिंग, द्वारा नागपूर, कोलकाता (२३ दिवसांत ४५०० किलोमीटर, २३ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर २०१७)

 

 

टॅग्स :Divyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर