शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 16:57 IST

स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देदिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमाकन्याकुमारीपासून केला १६०० किलोमीटरचा प्रवास

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकाच्या सप्टेंबर २०१९ ते २०२० या काळात साजऱ्या होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आर. थांगराजा यांनी ‘विश्वबंधुत्व दिवसा’च्या औचित्याने ११ सप्टेंबर रोजी या परिक्रमेस कन्याकुमारी येथून प्रारंभ केला. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून थांगराजा यांनी खास तयार केलेल्या स्कूटरवरून कन्याकुमारीहून लेह, इटानगर आणि कन्याकुमारी अशा मार्गाने त्यांची परिक्रमा सुरू केली आहे.गोव्याहून मंगळवारी (दि. १७) रात्री कोल्हापुरात आलेल्या थांगराजा यांनी बुधवारी पुण्याकडे प्रयाण केले. तेथून ते मुंबईकडे जाणार आहेत. कोल्हापुरात ‘प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड’चे अंध कार्यकर्ते सतीश नवले, कोल्हापूर केंद्राचे संचालक अरुण जनार्दन कुलकर्णी, ज्ञानसंवर्धन प्रकाशनचे ज्ञानराज भेलोंडे यांनी त्यांचे स्वागत केले.कन्याकुमारी येथील इझुस्सातूपट्टू येथे २१ जून १९८१ रोजी जन्मलेल्या थांगराजा यांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले असून २००८ पासून ते कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात कार्यरत आहेत. या शिलास्मारकाच्या उभारणीमध्येही त्यांनी त्यांच्या आईसह योगदान दिले आहे. पोलिओमुळे लहानपणापासून त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.यापूर्वी केलेल्या परिक्रमा१. कन्याकुमारी ते चेन्नई द्वारा रामेश्वरम, पुडुचेरी (१९ दिवसांत ११०० किलोमीटर, १९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१३)२. कोलकाता ते कन्याकुमारी, द्वारा ओरिसा-आंध्र प्रदेश (५२ दिवसांत २८०० किलोमीटर, २२ जुलै ते ११ सप्टेंबर २०१३)३. टिमटाला (अमरावती) ते कन्याकुमारी, द्वारा हैदराबाद, बंगलोर (१३ दिवसांत २८०० किलोमीटर, ७ ते १९ नोव्हेंबर २०१४)४. भगिनी निवेदिता जन्मशताब्दी वर्षानिमित्त कन्याकुमारी ते दार्जिलिंग, द्वारा नागपूर, कोलकाता (२३ दिवसांत ४५०० किलोमीटर, २३ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर २०१७)

 

 

टॅग्स :Divyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर