शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एटीएसच्या तपासाबद्दल पानसरे कुटुंबीय असमाधानी, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र केले सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:51 IST

जिल्हा न्यायालयात आज सुनावणी

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास दोन वर्षांपूर्वी विशेष तपास पथकाकडून काढून दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवला. मात्र, एटीएसकडून तपासात काहीच प्रगती नसल्याची तक्रार पानसरे कुटुंबीयांनी बुधवारी (दि.१४) मुंबई उच्च न्यायालयात प्रतित्रापत्राद्वारे केली तसेच गुन्ह्याच्या कटाचा उलगडा करून तातडीने मारेकऱ्यांना अटक करावी, यासाठी न्यायालयाने एटीएसला निर्देश द्यावेत, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली आहे.एटीएसच्या तपासाबद्दल नाराजी आणि असमाधान व्यक्त करणारे प्रतिज्ञापत्र मेघा पानसरे यांनी ॲड. अभय नेवगी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. कर्नाटक पोलिसांनी डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनातील आरोपींना पकडून खुनाचा उद्देश शोधला. त्याउलट गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही एसआयटी आणि एटीएसला सापडलेले नाहीत. विशेष पथकाने तपासात अपेक्षित प्रगती दाखविली नसल्याने हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविला.मात्र, गेल्या दोन वर्षांत केवळ मुदतवाढ घेण्याशिवाय त्यांनी काहीच तपास केला नाही, असा आरोप पानसरे कुटुंबीयांनी केला आहे. तपासाबद्दल आम्ही असमाधानी असून, गुन्ह्यातील कट, कट रचणारे संशयित आरोपी आणि मारेकरी यांचा तातडीने शोध घेण्याबद्दल न्यायालयाने एटीएसला निर्देश द्यावेत, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली आहे.

पानसरेंच्या पुस्तकांबद्दल राग?गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाला काही प्रतिगामी विचारधारेच्या संघटनांनी आक्षेप घेतले होते. काही ठिकाणी पानसरे यांच्या व्याख्यानांना विरोध झाला होता. त्यांचे पुरोगामी विचार संपवण्यासाठीच त्यांच्यावर हल्ला झाला. या गुन्ह्यांमागे व्यापक षङ्यंत्र असून, त्याचा उलगडा व्हावा, अशी अपेक्षा पानसरे यांच्या कुटुंबीयांनी प्रतिज्ञापत्रातून व्यक्त केली आहे.जिल्हा न्यायालयात आज सुनावणीपानसरे खूनखटल्याची सुनावणी गुरुवारी (दि. १५) जिल्ह व सत्र न्यायालयात झाली. यावेळी एका पंच साक्षीदाराची साक्ष आणि उलट तपासणी झाली. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी साक्ष घेतली. आज, शुक्रवारी आणखी एका पंच साक्षीदाराची साक्ष होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेHigh Courtउच्च न्यायालयAnti Terrorist Squadएटीएस