शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

Kolhapur News: वादग्रस्त स्टेटस..वातावरण स्फोटक; सोशल मीडियाच्या वापरास हवे गांभीर्य

By उद्धव गोडसे | Updated: March 23, 2023 14:07 IST

सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर

उद्धव गोडसेकोल्हापूर : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. वादग्रस्त स्टेटस ठेवणे, महापुरुषांबद्दल बदनामीकारक मजकूर व्हायरल करणे, चिथावणीखोर भाषेचा वापर करून गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणे अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात चार ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचा गांभीर्याने विचार करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.

गावोगावी हवे प्रबोधनसोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा चांगला वापर केल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, गैरवापरामुळे स्वत:सोबत समाजाचेही नुकसान होते. याची वेळीच तरुणांना जाणीव करून देण्यासाठी गावोगावी प्रबोधन होणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांनाही त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.घटना पहिली - सावर्डे (ता. हातकणंगले) येथे एका तरुणाने महापुरुषांच्या बदनामीचा स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवला. या घटनेचे पडसाद परिसरातील मिणचे आणि खोची या गावांमध्ये उमटले. व्हॉट्सॲपच्या स्टेटसला निदर्शनांनी उत्तर देण्यात आले. तरुणांनी गावोगावी दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी केली. गुन्हे दाखल करण्यासाठी पेठ वडगाव पोलिस ठाण्याबाहेर जमावाने ठिय्या मारला आणि गावोगावी बंदही पाळण्यात आला.घटना दुसरी - व्यवसायानिमित्त शिरोळमध्ये येऊन राहिलेल्या एका कुटुंबातील तरुणाने राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचा स्टेटस ठेवला. काही तासांत हा स्टेटस व्हायरल झाला आणि शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले. संबंधित तरुणाच्या विरोधात निदर्शने सुरू असतानाच तक्रारदार तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने पुन्हा वातावरण चिघळले. अखेर पोलिसांनी दोषीवर गुन्हा दाखल केला आणि त्या कुटुंबाला गाव सोडून जावे लागले.सामाजिक स्वास्थ्य धोक्यातसोशल मीडियातील वादाचे परिणाम काही क्षणात समाजावर होतात. बंद, निदर्शने यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होते. शाळा, महाविद्यालये यासह दैनंदिन व्यवहारांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. आर्थिक व्यवहारही मंदावतात. जाती-धर्मामध्ये तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते.तरुणाईचे भवितव्य अंधारातसोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर आहे. एखाद्या चुकीच्या कृतीचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची काहीच कल्पना नसणारे तरुण बेफिकीरपणे वाटेल ते मेसेज फॉरवर्ड करतात. निदर्शने, मोर्चांमध्ये ते सहभागी होतात. यामुळे होणाऱ्या पोलिस कारवाईनंतर तरुणांचे करिअर धोक्यात येते. याचा तरुणांसह त्यांच्या पालकांनीही वेळीच विचार करण्याची गरज आहे.हे करणे टाळा

  • सोशल मीडियात वादग्रस्त मेसेज करू नका
  • वाद निर्माण होतील, असे स्टेटस ठेवू नका
  • चिथावणीखोर भाषेचा वापर टाळा
  • गुन्हेगार, गुंडांचे उदात्तीकरण नको
  • धार्मिक मुद्द्यांवर चुकीचे भाष्य करू नये
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर नको
  • निदर्शने, मोर्चे, रॅली यात सहभाग टाळा

सोशल मीडियातील चुकीच्या मेसेजमुळे निर्माण होणारा तणाव संपूर्ण समाजाची शांतता धोक्यात आणतो. याचे दीर्घकालीन परिणाम उमटत राहतात. त्यामुळे तरुणांनी जपून सोशल मीडियाचा वापर करावा. दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे. - शैलेश बलकवडे - पोलिस अधीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी