शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: वादग्रस्त स्टेटस..वातावरण स्फोटक; सोशल मीडियाच्या वापरास हवे गांभीर्य

By उद्धव गोडसे | Updated: March 23, 2023 14:07 IST

सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर

उद्धव गोडसेकोल्हापूर : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. वादग्रस्त स्टेटस ठेवणे, महापुरुषांबद्दल बदनामीकारक मजकूर व्हायरल करणे, चिथावणीखोर भाषेचा वापर करून गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणे अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात चार ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचा गांभीर्याने विचार करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.

गावोगावी हवे प्रबोधनसोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा चांगला वापर केल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, गैरवापरामुळे स्वत:सोबत समाजाचेही नुकसान होते. याची वेळीच तरुणांना जाणीव करून देण्यासाठी गावोगावी प्रबोधन होणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांनाही त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.घटना पहिली - सावर्डे (ता. हातकणंगले) येथे एका तरुणाने महापुरुषांच्या बदनामीचा स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवला. या घटनेचे पडसाद परिसरातील मिणचे आणि खोची या गावांमध्ये उमटले. व्हॉट्सॲपच्या स्टेटसला निदर्शनांनी उत्तर देण्यात आले. तरुणांनी गावोगावी दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी केली. गुन्हे दाखल करण्यासाठी पेठ वडगाव पोलिस ठाण्याबाहेर जमावाने ठिय्या मारला आणि गावोगावी बंदही पाळण्यात आला.घटना दुसरी - व्यवसायानिमित्त शिरोळमध्ये येऊन राहिलेल्या एका कुटुंबातील तरुणाने राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचा स्टेटस ठेवला. काही तासांत हा स्टेटस व्हायरल झाला आणि शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले. संबंधित तरुणाच्या विरोधात निदर्शने सुरू असतानाच तक्रारदार तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने पुन्हा वातावरण चिघळले. अखेर पोलिसांनी दोषीवर गुन्हा दाखल केला आणि त्या कुटुंबाला गाव सोडून जावे लागले.सामाजिक स्वास्थ्य धोक्यातसोशल मीडियातील वादाचे परिणाम काही क्षणात समाजावर होतात. बंद, निदर्शने यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होते. शाळा, महाविद्यालये यासह दैनंदिन व्यवहारांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. आर्थिक व्यवहारही मंदावतात. जाती-धर्मामध्ये तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते.तरुणाईचे भवितव्य अंधारातसोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर आहे. एखाद्या चुकीच्या कृतीचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची काहीच कल्पना नसणारे तरुण बेफिकीरपणे वाटेल ते मेसेज फॉरवर्ड करतात. निदर्शने, मोर्चांमध्ये ते सहभागी होतात. यामुळे होणाऱ्या पोलिस कारवाईनंतर तरुणांचे करिअर धोक्यात येते. याचा तरुणांसह त्यांच्या पालकांनीही वेळीच विचार करण्याची गरज आहे.हे करणे टाळा

  • सोशल मीडियात वादग्रस्त मेसेज करू नका
  • वाद निर्माण होतील, असे स्टेटस ठेवू नका
  • चिथावणीखोर भाषेचा वापर टाळा
  • गुन्हेगार, गुंडांचे उदात्तीकरण नको
  • धार्मिक मुद्द्यांवर चुकीचे भाष्य करू नये
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर नको
  • निदर्शने, मोर्चे, रॅली यात सहभाग टाळा

सोशल मीडियातील चुकीच्या मेसेजमुळे निर्माण होणारा तणाव संपूर्ण समाजाची शांतता धोक्यात आणतो. याचे दीर्घकालीन परिणाम उमटत राहतात. त्यामुळे तरुणांनी जपून सोशल मीडियाचा वापर करावा. दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे. - शैलेश बलकवडे - पोलिस अधीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी