शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

Kolhapur News: वादग्रस्त स्टेटस..वातावरण स्फोटक; सोशल मीडियाच्या वापरास हवे गांभीर्य

By उद्धव गोडसे | Updated: March 23, 2023 14:07 IST

सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर

उद्धव गोडसेकोल्हापूर : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. वादग्रस्त स्टेटस ठेवणे, महापुरुषांबद्दल बदनामीकारक मजकूर व्हायरल करणे, चिथावणीखोर भाषेचा वापर करून गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणे अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात चार ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचा गांभीर्याने विचार करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.

गावोगावी हवे प्रबोधनसोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा चांगला वापर केल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, गैरवापरामुळे स्वत:सोबत समाजाचेही नुकसान होते. याची वेळीच तरुणांना जाणीव करून देण्यासाठी गावोगावी प्रबोधन होणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांनाही त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.घटना पहिली - सावर्डे (ता. हातकणंगले) येथे एका तरुणाने महापुरुषांच्या बदनामीचा स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवला. या घटनेचे पडसाद परिसरातील मिणचे आणि खोची या गावांमध्ये उमटले. व्हॉट्सॲपच्या स्टेटसला निदर्शनांनी उत्तर देण्यात आले. तरुणांनी गावोगावी दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी केली. गुन्हे दाखल करण्यासाठी पेठ वडगाव पोलिस ठाण्याबाहेर जमावाने ठिय्या मारला आणि गावोगावी बंदही पाळण्यात आला.घटना दुसरी - व्यवसायानिमित्त शिरोळमध्ये येऊन राहिलेल्या एका कुटुंबातील तरुणाने राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचा स्टेटस ठेवला. काही तासांत हा स्टेटस व्हायरल झाला आणि शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले. संबंधित तरुणाच्या विरोधात निदर्शने सुरू असतानाच तक्रारदार तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने पुन्हा वातावरण चिघळले. अखेर पोलिसांनी दोषीवर गुन्हा दाखल केला आणि त्या कुटुंबाला गाव सोडून जावे लागले.सामाजिक स्वास्थ्य धोक्यातसोशल मीडियातील वादाचे परिणाम काही क्षणात समाजावर होतात. बंद, निदर्शने यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होते. शाळा, महाविद्यालये यासह दैनंदिन व्यवहारांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. आर्थिक व्यवहारही मंदावतात. जाती-धर्मामध्ये तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते.तरुणाईचे भवितव्य अंधारातसोशल मीडियाचा गैरवापर करण्यात तरुणाई आघाडीवर आहे. एखाद्या चुकीच्या कृतीचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची काहीच कल्पना नसणारे तरुण बेफिकीरपणे वाटेल ते मेसेज फॉरवर्ड करतात. निदर्शने, मोर्चांमध्ये ते सहभागी होतात. यामुळे होणाऱ्या पोलिस कारवाईनंतर तरुणांचे करिअर धोक्यात येते. याचा तरुणांसह त्यांच्या पालकांनीही वेळीच विचार करण्याची गरज आहे.हे करणे टाळा

  • सोशल मीडियात वादग्रस्त मेसेज करू नका
  • वाद निर्माण होतील, असे स्टेटस ठेवू नका
  • चिथावणीखोर भाषेचा वापर टाळा
  • गुन्हेगार, गुंडांचे उदात्तीकरण नको
  • धार्मिक मुद्द्यांवर चुकीचे भाष्य करू नये
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर नको
  • निदर्शने, मोर्चे, रॅली यात सहभाग टाळा

सोशल मीडियातील चुकीच्या मेसेजमुळे निर्माण होणारा तणाव संपूर्ण समाजाची शांतता धोक्यात आणतो. याचे दीर्घकालीन परिणाम उमटत राहतात. त्यामुळे तरुणांनी जपून सोशल मीडियाचा वापर करावा. दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे. - शैलेश बलकवडे - पोलिस अधीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी