शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोल्हा'पूर'! कोयना, राधानगरी, अलमट्टीमधून विसर्ग सुरू; शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 22:47 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित 7 दरवाजे उघडले असून, 11400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून 67391, तर अलमट्टीमधून 303525 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रात्री 9 वाजता पंचगंगेने 45.10 फूट इतकी पातळी गाठली असून 93 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उद्या (सोमवारी) सुट्टी जाहीर केली आहे.हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि जिल्ह्यातील सद्यस्थिती पाहता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून उद्या सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्ग अतिवृष्टीमुळे बंद झाला आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावरुन मिरजेसाठी अतिरिक्त 5 बसेस सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. आजरा ते गडहिंग्लज मार्गावरील गिजवणे या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी उत्तुर मुमेवाडीमार्गे वळविण्यात आली आहे.वाघबिळ ते पन्हाळगड मार्गावर मोठी भेग पडल्याने तसेच दरड कोसळल्याने पन्हाळगडाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सांगलीकडून कोल्हापूर मार्गावर शिरोली नाक्यावर सर्व्हिस रोडवर पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यायी नागाव फाट्यामार्गे वाहतूक सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी येथे पूर परिस्थितीची आज पाहणी केली. कोयनेमधून 67391, धोममधून 10000, कन्हेरमधून 16820 तर वारणामधून 20472 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. कृष्णा नदीतील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन ती धोक्याची पातळी 45 फूटापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करु नये. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून, सर्व विभाग सतर्क ठेवण्यात आले आहेत. प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.१९८९ ला पंचगंगेच्या पुराची पातळी ५० फूट सहा इंच इतकी होती. २००५ ला ४९ फूट सहा इंच इतकी होती. आता ४६ फुटांपर्यंत पाणी पोहोचले आले. रेड झोनसंबंधी १९८९ चा पाटबंधारे विभागाचा अध्यादेश आहे, तो आजही कायम आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर