शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोल्हा'पूर'! कोयना, राधानगरी, अलमट्टीमधून विसर्ग सुरू; शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 22:47 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित 7 दरवाजे उघडले असून, 11400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून 67391, तर अलमट्टीमधून 303525 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रात्री 9 वाजता पंचगंगेने 45.10 फूट इतकी पातळी गाठली असून 93 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उद्या (सोमवारी) सुट्टी जाहीर केली आहे.हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि जिल्ह्यातील सद्यस्थिती पाहता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून उद्या सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्ग अतिवृष्टीमुळे बंद झाला आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावरुन मिरजेसाठी अतिरिक्त 5 बसेस सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. आजरा ते गडहिंग्लज मार्गावरील गिजवणे या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी उत्तुर मुमेवाडीमार्गे वळविण्यात आली आहे.वाघबिळ ते पन्हाळगड मार्गावर मोठी भेग पडल्याने तसेच दरड कोसळल्याने पन्हाळगडाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सांगलीकडून कोल्हापूर मार्गावर शिरोली नाक्यावर सर्व्हिस रोडवर पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यायी नागाव फाट्यामार्गे वाहतूक सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी येथे पूर परिस्थितीची आज पाहणी केली. कोयनेमधून 67391, धोममधून 10000, कन्हेरमधून 16820 तर वारणामधून 20472 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. कृष्णा नदीतील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन ती धोक्याची पातळी 45 फूटापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करु नये. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून, सर्व विभाग सतर्क ठेवण्यात आले आहेत. प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.१९८९ ला पंचगंगेच्या पुराची पातळी ५० फूट सहा इंच इतकी होती. २००५ ला ४९ फूट सहा इंच इतकी होती. आता ४६ फुटांपर्यंत पाणी पोहोचले आले. रेड झोनसंबंधी १९८९ चा पाटबंधारे विभागाचा अध्यादेश आहे, तो आजही कायम आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर