शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

चांदोली धरणातून आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST

सरुड : गेल्या दोन दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे व धरणात ९९.८६ टक्के इतका पाणीसाठा ...

सरुड : गेल्या दोन दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे व धरणात ९९.८६ टक्के इतका पाणीसाठा झाल्याने चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

सोमवारी धरणातून ८२०५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात आला आहे. परिणामी वारणा नदीचे पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडले असून, धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणात सध्या ३४.३६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून, सध्या धरणात प्रतिसेकंद ५४८२ क्युसेक इतकी पाण्याची आवक होत आहे. धरणातील एकूण पाणीसाठा व पाण्याची होणारी आवक पाहता पाटबंधारे विभागाने सोमवारी सकाळी १० वाजता धरणातील वीजनिर्मिती गृहातून १३७७ क्युसेक, तर धरणातील सांडव्यातून ६८२८ क्युसेक असा एकूण ८२०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या वर्षी चांदोली धरण क्षेत्रात एकूण २८१२ मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणाची सांडवा पाणीपातळी ६२६.८५ मीटरपर्यंत पोहोचली आहे.