संचालिका अनुराधा पाटील महिला राखीवमधून लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:23 IST2021-04-16T04:23:41+5:302021-04-16T04:23:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माघार घेण्याच्या आठव्या दिवशी एकाच वेळी पाच महिलांनी गोकुळच्या रिंगणातून माघार घेतली. यात सर्वसाधारण ...

संचालिका अनुराधा पाटील महिला राखीवमधून लढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माघार घेण्याच्या आठव्या दिवशी एकाच वेळी पाच महिलांनी गोकुळच्या रिंगणातून माघार घेतली. यात सर्वसाधारण व इतर मागास वर्गामधून प्रत्येकी एक तर महिला राखीव गटातून तिघींचा समावेश आहे. माघारीचे हे अर्ज डमी अर्ज आहेत. विद्यमान संचालिका अनुराधा बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी शाहूवाडीतून सर्वसाधारणमधून माघार घेतली आहे, त्यांचा महिला राखीवमधून अर्ज शिल्लक आहे.
मुरगुड येथून मंजूषादेवी रणजितसिंह पाटील यांनी सर्वसाधारण गटातून डमी म्हणून भरलेला उमेदवारी मागे घेतला. त्यामुळे तेथून सत्ताधारी गटाकडून रणजितसिंह पाटील हे एकमेव उमेदवार राहिले आहेत. बेलवळे (ता. कागल) येथील रोहिणी नारायणराव पाटील यांनी इतर मागास व महिला राखीव या दोन्ही गटांतून अर्ज मागे घेतला. महिला राखीवमधून पोर्ले तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथून श्रृतिका शाहू काटकर यांनी तर उचगाव (ता. करवीर) येथून अश्विनी मधुकर चव्हाण यांनी माघार घेतली.
गुरुवारी एकाच दिवशी झालेल्या माघारीमुळे रिंगणातून बाहेर जाणाऱ्यांची आतापर्यंतची संख्या ९ झाली आहे. यात एक अरुण नरके वगळता उर्वरित सर्व महिलाच आहेत.