शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

दिंडनेर्ली गायरान क्षेत्र बनले कचरा डेपो

By admin | Updated: January 3, 2017 00:27 IST

ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमींतून संताप : शेतकऱ्यांसह जनावरांनाही मोठा त्रास; परिसरात काचांचा खच

सागर शिंदे --दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील गायरान क्षेत्र हे कचरा डेपोचे ठिकाण बनले असून शेतकरी, जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. या प्रकाराबद्दल ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त केला जात आहे.कोल्हापूर-गारगोटी मार्गावरती दिंडनेर्ली-हणबरवाडी दरम्यान घाट रस्त्यात दिंडनेर्ली हद्दीत राजीव सहकारी सूतगिरणीजवळ गायरान क्षेत्र आहे. येथे सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायत यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. निसर्गरम्य परिसर मानवी हस्तक्षेपामुळे समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. आसपासच्या भागातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. रस्त्यालगतच गायरान क्षेत्र असल्याने गाडीतून जाता-जाता कचऱ्याची पोती टाकली जात आहेत. यामध्ये घरगुती कचऱ्याबरोबरच दवाखान्यातील वापरलेली सलाईन व औषधे, बाटल्या, इंजेक्शन सिरींज, मुदतबाह्य गोळ्या, सुया, ड्रेसिंगचे कापूस, तर सलून दुकानदार कापलेले केस, ब्लेड, आदी कचरा मोठ्या प्रमाणात टाकतात. शेतकऱ्यांबरोबर जनावरांनाही याचा त्रास होत आहे. कित्येकदा जनावरांच्या तोंडाला व पायाला काचा लागून जखमाही झाल्या आहेत. तसेच परिसरामध्ये जेवणावळीचे कार्यक्रम असतील तर ग्रामस्थ प्लास्टिक, कागदी पत्रावळी येथे आणून टाकतात. जनावरे चरत असताना या प्लास्टिक पत्रावळीही खातात. आता ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्याच्या बाजूलाच पाण्याचा छोटा ओढा आहे. या ओढ्यातही कचरा मिसळला जातो. हाच ओढा पुढे दिंडनेर्लीतील मुख्य ओढ्याला मिळतो. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते, तसेच ग्रामस्थांबरोबर जनावरांनाही याचा त्रास होेतो आहे.बाटल्या फोडण्याचे प्रकारकित्येक लोक रस्त्यावरून जाता-जाता कचरा पोत्यात भरून या वळणावर टाकून जातात. या परिसरात दारूच्या व औषधांच्या काचेच्या बाटल्याही फ ोडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र काचांचा खच उघड्यावर, गवतामध्ये झाला आहे. याचा नाहक त्रास मात्र जनावरे व ग्रामस्थांना होत आहे. त्यामुळे भागातील ग्रामस्थांनी सार्वजनिक जबाबदारीचे भान ठेवून स्वत:च कचरा टाकू नये, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून होत आहे. गायरान क्षेत्रात कचरा टाकत असताना कुणी आढळल्यास किंवा माहिती मिळाल्यास ग्रामपंचायतीमार्फ त सार्वजनिक ठिकाण विद्रूपीकरण कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.- सचिन तारदाळे, ग्रामसेवक