शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

दिंडनेर्ली गायरान क्षेत्र बनले कचरा डेपो

By admin | Updated: January 3, 2017 00:27 IST

ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमींतून संताप : शेतकऱ्यांसह जनावरांनाही मोठा त्रास; परिसरात काचांचा खच

सागर शिंदे --दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील गायरान क्षेत्र हे कचरा डेपोचे ठिकाण बनले असून शेतकरी, जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. या प्रकाराबद्दल ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त केला जात आहे.कोल्हापूर-गारगोटी मार्गावरती दिंडनेर्ली-हणबरवाडी दरम्यान घाट रस्त्यात दिंडनेर्ली हद्दीत राजीव सहकारी सूतगिरणीजवळ गायरान क्षेत्र आहे. येथे सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायत यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. निसर्गरम्य परिसर मानवी हस्तक्षेपामुळे समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. आसपासच्या भागातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. रस्त्यालगतच गायरान क्षेत्र असल्याने गाडीतून जाता-जाता कचऱ्याची पोती टाकली जात आहेत. यामध्ये घरगुती कचऱ्याबरोबरच दवाखान्यातील वापरलेली सलाईन व औषधे, बाटल्या, इंजेक्शन सिरींज, मुदतबाह्य गोळ्या, सुया, ड्रेसिंगचे कापूस, तर सलून दुकानदार कापलेले केस, ब्लेड, आदी कचरा मोठ्या प्रमाणात टाकतात. शेतकऱ्यांबरोबर जनावरांनाही याचा त्रास होत आहे. कित्येकदा जनावरांच्या तोंडाला व पायाला काचा लागून जखमाही झाल्या आहेत. तसेच परिसरामध्ये जेवणावळीचे कार्यक्रम असतील तर ग्रामस्थ प्लास्टिक, कागदी पत्रावळी येथे आणून टाकतात. जनावरे चरत असताना या प्लास्टिक पत्रावळीही खातात. आता ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्याच्या बाजूलाच पाण्याचा छोटा ओढा आहे. या ओढ्यातही कचरा मिसळला जातो. हाच ओढा पुढे दिंडनेर्लीतील मुख्य ओढ्याला मिळतो. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते, तसेच ग्रामस्थांबरोबर जनावरांनाही याचा त्रास होेतो आहे.बाटल्या फोडण्याचे प्रकारकित्येक लोक रस्त्यावरून जाता-जाता कचरा पोत्यात भरून या वळणावर टाकून जातात. या परिसरात दारूच्या व औषधांच्या काचेच्या बाटल्याही फ ोडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र काचांचा खच उघड्यावर, गवतामध्ये झाला आहे. याचा नाहक त्रास मात्र जनावरे व ग्रामस्थांना होत आहे. त्यामुळे भागातील ग्रामस्थांनी सार्वजनिक जबाबदारीचे भान ठेवून स्वत:च कचरा टाकू नये, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून होत आहे. गायरान क्षेत्रात कचरा टाकत असताना कुणी आढळल्यास किंवा माहिती मिळाल्यास ग्रामपंचायतीमार्फ त सार्वजनिक ठिकाण विद्रूपीकरण कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.- सचिन तारदाळे, ग्रामसेवक