शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण--सरकारकडून निर्यात अनुदानाच्या अटी शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:46 IST

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेले २० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या अटी शिथिल केल्या आहेत. तरीही चालू साखर हंगामाअखेर सुमारे १० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता ...

ठळक मुद्देहंगामाअखेर १० लाख टन निर्यात शक्य

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेले २० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या अटी शिथिल केल्या आहेत. तरीही चालू साखर हंगामाअखेर सुमारे १० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या सर्व सूचना आणि नियमांचे पालन करणाऱ्या कारखान्यांनाच निर्यात अनुदान देण्यात येईल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आधीच्या आदेशात म्हटले होते. हे अनुदान प्रती टन ५५ रुपये ऊस उत्पादकाच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये अनेक साखर कारखान्यांनी विशेषत: खासगी साखर कारखान्यांनी साठा मर्यादेचे उल्लंघन करून साखर विकली होती. ते कारखाने साखर निर्यात अनुदानाला अपात्र ठरत होते. निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नाही, असे दिसताच केंद्राने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यात इतर सर्व अटी आहेत, मात्र फेब्रुवारी, मार्चमधील साठा मर्यादेची अट समाविष्ट नाही, त्यामुळे अपात्र ठरणारे अनेक खासगी कारखानेही निर्यात अनुदानास पात्र ठरणार आहेत.कोटा विकण्यास परवानगीसरकारने २० लाख टन साखरेची निर्यात करण्यासाठी कारखान्यांना निर्यात कोटा ठरवून दिला आहे. मात्र, आतापर्यंत कसेबसे कारखान्यांना २ लाख ४४ हजार टन साखर निर्यात करता आली आहे. साखर निर्यात करणे ज्या कारखान्यांना शक्य नाही त्यांनी निर्यात अनुदान मिळविण्यासाठी आपला कोटा अन्य कारखान्यांना विकता येतो. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील साखर कारखाने निर्यात कोटा उत्तर प्रदेशातील कारखान्यांना ७५0 रुपये प्रति क्विंटल या दराने विकत आहेत. अटी शिथिल केल्याने अनुदानास पात्र ठरणारे कारखानेही निर्यात करण्यासाठी किंवा कोटा विकण्यासाठी पुढे येतील. यामुळे चालू साखर हंगामाअखेर म्हणजेच सप्टेंबरअखेर सुमारे दहा लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. ती निर्धारित लक्ष्यापेक्षा निम्मीच लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे.उशिरा सुचलेले शहाणपणसाखर निर्यात अनुदानाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. हा निर्णय दोन-तीन महिन्यांपूर्वी झाला असता तर कारखान्यांना ते सोयीचे ठरले असते. आता पावसाळा सुरू झाला असल्याने निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चीन, श्रीलंका, सुदानला निर्यातसध्या चीन, श्रीलंका, सुदान, सोमालिया आदी देशांना साखर निर्यात होत आहे. आतापर्यंत बंदर जवळ असल्याने महाराष्टÑ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कारखान्यांनी साखर निर्यात केली आहे. 

साखर निर्यातीच्या अटी शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे आणखी साखर कारखाने निर्यातीसाठी पुढे येतील. सप्टेंबरअखेर सुमारे १० लाख टन साखरेची निर्यात होऊ शकेल.- प्रफुल्ल विठलानीअध्यक्ष, आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन.