शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण--सरकारकडून निर्यात अनुदानाच्या अटी शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:46 IST

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेले २० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या अटी शिथिल केल्या आहेत. तरीही चालू साखर हंगामाअखेर सुमारे १० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता ...

ठळक मुद्देहंगामाअखेर १० लाख टन निर्यात शक्य

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेले २० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या अटी शिथिल केल्या आहेत. तरीही चालू साखर हंगामाअखेर सुमारे १० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या सर्व सूचना आणि नियमांचे पालन करणाऱ्या कारखान्यांनाच निर्यात अनुदान देण्यात येईल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आधीच्या आदेशात म्हटले होते. हे अनुदान प्रती टन ५५ रुपये ऊस उत्पादकाच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये अनेक साखर कारखान्यांनी विशेषत: खासगी साखर कारखान्यांनी साठा मर्यादेचे उल्लंघन करून साखर विकली होती. ते कारखाने साखर निर्यात अनुदानाला अपात्र ठरत होते. निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नाही, असे दिसताच केंद्राने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यात इतर सर्व अटी आहेत, मात्र फेब्रुवारी, मार्चमधील साठा मर्यादेची अट समाविष्ट नाही, त्यामुळे अपात्र ठरणारे अनेक खासगी कारखानेही निर्यात अनुदानास पात्र ठरणार आहेत.कोटा विकण्यास परवानगीसरकारने २० लाख टन साखरेची निर्यात करण्यासाठी कारखान्यांना निर्यात कोटा ठरवून दिला आहे. मात्र, आतापर्यंत कसेबसे कारखान्यांना २ लाख ४४ हजार टन साखर निर्यात करता आली आहे. साखर निर्यात करणे ज्या कारखान्यांना शक्य नाही त्यांनी निर्यात अनुदान मिळविण्यासाठी आपला कोटा अन्य कारखान्यांना विकता येतो. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील साखर कारखाने निर्यात कोटा उत्तर प्रदेशातील कारखान्यांना ७५0 रुपये प्रति क्विंटल या दराने विकत आहेत. अटी शिथिल केल्याने अनुदानास पात्र ठरणारे कारखानेही निर्यात करण्यासाठी किंवा कोटा विकण्यासाठी पुढे येतील. यामुळे चालू साखर हंगामाअखेर म्हणजेच सप्टेंबरअखेर सुमारे दहा लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. ती निर्धारित लक्ष्यापेक्षा निम्मीच लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे.उशिरा सुचलेले शहाणपणसाखर निर्यात अनुदानाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. हा निर्णय दोन-तीन महिन्यांपूर्वी झाला असता तर कारखान्यांना ते सोयीचे ठरले असते. आता पावसाळा सुरू झाला असल्याने निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चीन, श्रीलंका, सुदानला निर्यातसध्या चीन, श्रीलंका, सुदान, सोमालिया आदी देशांना साखर निर्यात होत आहे. आतापर्यंत बंदर जवळ असल्याने महाराष्टÑ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कारखान्यांनी साखर निर्यात केली आहे. 

साखर निर्यातीच्या अटी शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे आणखी साखर कारखाने निर्यातीसाठी पुढे येतील. सप्टेंबरअखेर सुमारे १० लाख टन साखरेची निर्यात होऊ शकेल.- प्रफुल्ल विठलानीअध्यक्ष, आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन.