भाजप-शिवसेनेतील अंतर आता न संपणारेच!
By Admin | Updated: August 25, 2015 00:06 IST2015-08-25T00:06:03+5:302015-08-25T00:06:18+5:30
महापालिकेच्या निवडणुक

भाजप-शिवसेनेतील अंतर आता न संपणारेच!
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी करण्याची अजूनही तयारी असल्याचा प्रस्ताव शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिला असला तरी भाजपला आता मागे फिरणे अवघड असल्याचे वास्तव आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर इतकी चिखलफेक झाली आहे की, ती विसरून एकी होणे हाच त्यातील खरा अडसर आहे. भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील टोकाचा दुरावा युती न होण्यात झाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये आपण एकत्र येऊ, असा नुसता विचारही कोणत्याच टप्प्यावर झाला नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शहरात भाजपच्या महेश जाधव यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेली ४० हजार मते. या निकालानंतर शिवसेनेने महेश जाधव यांना व जाधव यांनी क्षीरसागर यांना आपले खरे प्रतिस्पर्धी मानले. तिथेच युतीला सुरूंग लागला. जो भाजप मुंबई महापालिकेत शिवसेनेबरोबर युती करणार, असे कोल्हापुरात झालेल्या राज्य अधिवेशनात जाहीर करतो. त्याच भाजपने कोल्हापूर महापालिकेबाबत मात्र नेमकी त्याच्या उलटी भूमिका घेतली. त्याचा पायाही भाजपचे वाढलेले मतदान हाच होता.
भाजपने शिवसेनेला फाट्यावर मारून ताराराणी आघाडीशी संगत केली आहे. कुणी किती जागा लढवायच्या हे निश्चित झाले आहे. निम्मे उमेदवारही निश्चित झाले आहेत, असे असताना आता तेथून मागे येऊन शिवसेनेशी घरोबा करणे बरेच अवघड आहे. या दोन पक्षांतील नेत्यांतील संबंध सौहार्दाचे असते, तर ते याघडीलाही शक्य झाले असते. पक्षापेक्षा नेत्यांतील राजकीय कटुता हाच युती होण्यातला अडसर आहे, परंतु तरीही शिवसेनेच्या राऊत यांनी ‘आघाडीचे अजूनही दोर कापलेले नाहीत,’ असे म्हटले आहे. त्यामागे सहानुभूती मिळविण्याचे राजकारण आहे. बघा, आम्ही युतीसाठी केव्हाही तयार होतो; परंतु भाजपलाच ते नको होते, असा ‘ब्लेम गेम...’ प्रचारात ते करू शकतात. राऊत यांचे शिवसेनेतील स्थान महत्त्वाचे आहे. त्याचवेळेला त्यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपमधील ताकद व शिवसेना-भाजप युतीतील महत्त्वाचा दुवा म्हणूनही असलेले स्थान माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी हा प्रस्ताव ठेवून राळ उडवून दिली आहे.