शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कागल पालिका सभेत धुमशान : पालिका जळिताचा राजकीय भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:07 IST

कसबा सांगाव : सत्ताधारी-विरोधकांत होणारी हातघाई, ढकलाढकली, सत्ताधारी पक्षप्रतोद प्रवीण काळबर व विरोधी पक्षनेता विशाल पाटील यांचे एकमेकांच्या अंगावर धावून

ठळक मुद्देसत्तारूढ-विरोधकांत हमरी-तुमरी, धक्काबुक्की; पोलिसांना पाचारणआरोपी शोधण्यासाठी मदत करण्यापेक्षा राजकारण करीत राष्ट्रवादी नगरसेवकांवर चुकीचे व बेताल आरोप

कसबा सांगाव : सत्ताधारी-विरोधकांत होणारी हातघाई, ढकलाढकली, सत्ताधारी पक्षप्रतोद प्रवीण काळबर व विरोधी पक्षनेता विशाल पाटील यांचे एकमेकांच्या अंगावर धावून जाणे यामुळे कागल नगरपालिकेची आजची विशेष सभा वादळी ठरली. नगरपालिका इमारत जळितानंतर ही पहिलीच सभा बोलाविण्यात आली होती. मात्र, पालिका जळिताचा राजकीय भडका या सभेत उडाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्याची पाळी प्रशासनावर आली. पालिका इतिहासात पहिल्यादांच पोलीस बंदोबस्तात ही सभा पार पडली.

कागल येथील शाहूनगर वाचनालयात सभा पार पडली. पालिकेला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ही सभा बोलावण्यात आली होती. विषयपत्रिकेवर नऊ विषय होते. सताधाºयांनी गोंधळातच सर्व विषय बहुमताने मंजूर केले. मात्र, या सर्वच विषयांना विरोधकांनी तीव्र विरोध केला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. मुख्याधिकारी टीना गवळी पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या.

पालिका इमारतीला लागलेल्या भीषण आगीची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, बांधकाम अभियंत्याच्या एफआयआरची कॉपी जोडूनच मुदतवाढ प्रस्ताव पाठवावा, मंजुरीनंतरच काम करण्यात यावे, इमारतीला आग लावली गेली असल्यास त्यामधील दोषीकडून व्याजासह नुकसानभरपाई वसूल करावी, इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून खर्चाचे अदांजपत्रक तयार करावे, नुकसानीच्या रकमेचा अजेंड्यावर उल्लेख नाही. नुकसानीच्या खर्चाची रक्कम प्रशासनाने कौन्सिलसमोर आणल्यानंतरच ती मंजूर करण्यात यावी. तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवावा, अन्यथा या कामासाठी बेहिशेबी रक्कम खर्च होण्याची शक्यता आहे. झालेल्या नुकसानीसंदर्भात चौकशी समिती नेमावी आदी मागण्यांचे निवेदन सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी भाजपा पक्षप्रतोद विशाल पाटील हे देण्यासाठी व्यासपीठासमोर गेल्यानंतर विषयांना सुरुवात होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले.

सत्ताधारी पक्षप्रतोद प्रवीण काळबर व विशाल पाटील यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. यामध्ये ओढाओढीत विशाल पाटील यांच्या शर्टाची बटणे तुटली. ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता मात्र दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील माळगे हे पोलीस कर्मचाºयांना घेऊन उपस्थित झाले.

गोंधळातच सभेला सुरुवात झाली. विषयपत्रिकेवर या दुर्घटनेची उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी करावी, विकासकामांचा निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी, नुकसानीसाठी आकस्मिक निधी मिळावा, इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे व नुकसानीचे अंदाजपत्रक तयार करावे? पुढील काळात खबरदारी घ्यावी, पालिकेचे कामकाज कन्याशाळेत स्थलांतरित करावे आदींसह नऊ विषय या विषयपत्रिकेवर होते. सत्ताधारी गटाकडून प्रवीण काळबर, चंद्रकांत गवळी, गाड्डीवड्ड, विवेक लोटे, सौरभ पाटील, आदींनी विरोधकांचे आरोप फेटाळत विरोधकांच्या काही विधानांचा निषेध केला.त्यांच्या आरोपांचे मुद्दे खोडून काढीत सर्व विषय बहुमताने मंजूर केले. विशाल पाटील यांनी पालिका पेटवल्याच्या संदर्भात केलेले गंभीर आरोप मागे घ्यावेत अशी जोरदार मागणी प्रवीण काळबर यांनी करत पाटील यांनी माफी मागितल्याशिवाय सभा सुरू करू नये अशी मागणी लावून धरली.

यावेळी सुरेश पाटील यांनी मध्यस्थी केली. नगराध्यक्षांनी आपल्या अधिकारात प्रशासनाच्या मदतीने कामे पूर्ण करावीत, असा ठराव सत्ताधाºयांनी केला. उपनगराध्यक्ष नितीन धोंडे यांनी यावेळी सत्ताधारी नगरसेवक व पालिका कर्मचाºयांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व विरोधकांनी दिशाहीन चुकीचे आरोप करू नयेत, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असे सांगितले, तर नगराध्यक्षा माळी यांनी सभागृहाचे भान ठेवून थोडक्यात बोला, असे सांगत सभेचे कामकाज गतिमान केले.आगप्रकरणी निष्पक्ष तपास करावासभा संपल्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी कागलचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना निवेदन दिले. त्यामध्ये भाजपा नगरसेवकांनीच सुपारी देऊन कागल पालिका जळीत कृत्य घडवून आणले आहे, अशी आमची खात्री आहे. तपासात राजकारण न आणता निष्पक्षपाती तपास करावा व आरोपींना कठोर शासन करावे. भाजपा नगरसेवक आरोपी शोधण्यासाठी मदत करण्यापेक्षा राजकारण करीत राष्ट्रवादी नगरसेवकांवर चुकीचे व बेताल आरोप करीत आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.