शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पंचायत राज समितीचा थाट, अनेकांच्या खिशाला चाट

By समीर देशपांडे | Updated: May 26, 2025 19:43 IST

या समितीच्या उपयुक्ततेबाबतही व्हायला हवी चर्चा

समीर देशपांडे कोल्हापूर : धुळे जिल्ह्यातील विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा १ कोटी ८४ लाख रुपयांचे घबाड सापडल्याने चर्चेत आला आहे. याच पध्दतीने गेल्या काही वर्षांतील पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्याही अविस्मरणीय आठवणी यानिमित्ताने काढल्या जात आहेत. ‘पंचायत राज समितीचा थाट आणि आमच्या खिशाला चाट’ असे अधिकारी का म्हणतात, हे या समितीचा ज्या - ज्या ठिकाणी दौरा होऊन जातो त्यानंतरच्या चर्चेतून लक्षात येते. अनेक प्रकारची ऑडिट सुरू असताना चार वर्षांनंतर कारभाराची चौकशी करणारी ही समिती खरोखरच उपयुक्त ठरते का, याचाही फेरविचार होण्याची गरज आहे.महाराष्ट्र विधिमंडळांच्या आमदारांची ‘पंचायत राज समिती’ असून, तिचे लघुरूप म्हणजे ‘पीआरसी.’ ही समिती येणार म्हटले की, चार महिने आधी अधिकारी, कर्मचाऱ्यांची झोप उडते? ही समिती परत जाईपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नसतो. अनेकांच्या खिशाला या सर्व प्रक्रियेमध्ये किती चाट लागली, याचाही पत्ता नसतो. या अंदाज समितीच्या प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याच्या आधीच्या दणक्याने विधिमंडळाच्या या समित्या चर्चेत आल्या आहेत.

२५ ते ३० आमदारांची ही समिती सरकार स्थापन झाले की, बनविण्यात येते. ही समिती चार वर्षांपूर्वीच्या कामाचा हिशेब मागण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा दौरा करते. या समितीला विधानमंडळाचे सर्व अधिकार प्राप्त असतात. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची वेगळी प्रश्नावली तयार केली जाते. याची उत्तरे शोधण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग सुट्यांच्या दिवशीही काम करतात. चार - पाच वर्षांपूर्वीच्या फायली उपसल्या जातात आणि माहिती जमा केली जाते. स्थानिक निधीच्या लेखापरीक्षणातील मुद्दे काढून त्याचे स्पष्टीकरण विचारले जाते. त्यासाठी बदलून गेलेले अधिकारीही परत समितीसमोर येतात.

जागेवर निलंबनाचा अधिकारया समितीला एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला जागेवरच निलंबित करण्याचा अधिकार आहे. याचाच फायदा घेऊन एक भीतीयुक्त वातावरण तयार करण्यात येते. मग या समितीच्या खास पाहुणचारासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांना आणि गटविकास अधिकाऱ्यांना वेठीस धरले जाते. हे सर्वजण ठेकेदार आणि मोठ्या ग्रामपंचायतीला दम देतात. अशी वर्गणी गोळा करून ठेवली जाते आणि मग समिती परत जाण्याआधी हा पाहुणचार केला जातो.

गाड्या भरून साहित्यया समितीच्या काही सदस्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या २०१८ साली दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या पैशातून इतके साहित्य खरेदी केले की, ते नेण्यासाठी जादाच्या दोन गाड्या येथून कराव्या लागल्या. कोल्हापुरी पायताण, गुळाच्या ढेपांसह बरेच साहित्य यामध्ये असल्याचे सांगण्यात येते.

पंचायत राज समिती दौऱ्यावर आल्यानंतर अनेक चर्चा जिल्हा परिषदेत ऐकू येतात. या समितीने खरोखरच पंचायत राज क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधा करण्यासाठी योगदान देण्याची भूमिका घेण्याची गरज आहे. आजही ग्रामपंचाायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचे कामकाज करताना अनेक अडचणी येतात. त्यावर उपाययोजना सुचविल्यास या समितीची उपयुक्तता आणखी वाढेल.- राजू मगदूम सरपंच, माणगाव, ता. हातकणंगले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद