शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
3
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
4
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
5
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
6
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
7
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
8
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...
9
लश्कर ए तोयबानं पाडलं बांगलादेशातील शेख हसीना सरकार?; आता भारताला दिली धमकी
10
वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या
11
Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट
12
Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ
13
Video - बापरे! रीलच्या नादात ट्रेनच्या दरवाजाला लटकत होती तरुणी, अचानक हात सुटला अन्...
14
Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट
15
एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...
16
IPL 2025 Playoffs Rules: पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलला कोणता संघ जाणार? जाणून घ्या नियम
17
"आता गांधीजींचा देशही दुसरा गाल पुढे करणार नाही, तर…’’, शशी थरूर यांनी ठणकावले   
18
MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी
19
'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
20
सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

Kolhapur: पंचायत राज समितीचा थाट, अनेकांच्या खिशाला चाट

By समीर देशपांडे | Updated: May 26, 2025 19:43 IST

या समितीच्या उपयुक्ततेबाबतही व्हायला हवी चर्चा

समीर देशपांडे कोल्हापूर : धुळे जिल्ह्यातील विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा १ कोटी ८४ लाख रुपयांचे घबाड सापडल्याने चर्चेत आला आहे. याच पध्दतीने गेल्या काही वर्षांतील पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्याही अविस्मरणीय आठवणी यानिमित्ताने काढल्या जात आहेत. ‘पंचायत राज समितीचा थाट आणि आमच्या खिशाला चाट’ असे अधिकारी का म्हणतात, हे या समितीचा ज्या - ज्या ठिकाणी दौरा होऊन जातो त्यानंतरच्या चर्चेतून लक्षात येते. अनेक प्रकारची ऑडिट सुरू असताना चार वर्षांनंतर कारभाराची चौकशी करणारी ही समिती खरोखरच उपयुक्त ठरते का, याचाही फेरविचार होण्याची गरज आहे.महाराष्ट्र विधिमंडळांच्या आमदारांची ‘पंचायत राज समिती’ असून, तिचे लघुरूप म्हणजे ‘पीआरसी.’ ही समिती येणार म्हटले की, चार महिने आधी अधिकारी, कर्मचाऱ्यांची झोप उडते? ही समिती परत जाईपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नसतो. अनेकांच्या खिशाला या सर्व प्रक्रियेमध्ये किती चाट लागली, याचाही पत्ता नसतो. या अंदाज समितीच्या प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याच्या आधीच्या दणक्याने विधिमंडळाच्या या समित्या चर्चेत आल्या आहेत.

२५ ते ३० आमदारांची ही समिती सरकार स्थापन झाले की, बनविण्यात येते. ही समिती चार वर्षांपूर्वीच्या कामाचा हिशेब मागण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा दौरा करते. या समितीला विधानमंडळाचे सर्व अधिकार प्राप्त असतात. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची वेगळी प्रश्नावली तयार केली जाते. याची उत्तरे शोधण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग सुट्यांच्या दिवशीही काम करतात. चार - पाच वर्षांपूर्वीच्या फायली उपसल्या जातात आणि माहिती जमा केली जाते. स्थानिक निधीच्या लेखापरीक्षणातील मुद्दे काढून त्याचे स्पष्टीकरण विचारले जाते. त्यासाठी बदलून गेलेले अधिकारीही परत समितीसमोर येतात.

जागेवर निलंबनाचा अधिकारया समितीला एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला जागेवरच निलंबित करण्याचा अधिकार आहे. याचाच फायदा घेऊन एक भीतीयुक्त वातावरण तयार करण्यात येते. मग या समितीच्या खास पाहुणचारासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांना आणि गटविकास अधिकाऱ्यांना वेठीस धरले जाते. हे सर्वजण ठेकेदार आणि मोठ्या ग्रामपंचायतीला दम देतात. अशी वर्गणी गोळा करून ठेवली जाते आणि मग समिती परत जाण्याआधी हा पाहुणचार केला जातो.

गाड्या भरून साहित्यया समितीच्या काही सदस्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या २०१८ साली दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या पैशातून इतके साहित्य खरेदी केले की, ते नेण्यासाठी जादाच्या दोन गाड्या येथून कराव्या लागल्या. कोल्हापुरी पायताण, गुळाच्या ढेपांसह बरेच साहित्य यामध्ये असल्याचे सांगण्यात येते.

पंचायत राज समिती दौऱ्यावर आल्यानंतर अनेक चर्चा जिल्हा परिषदेत ऐकू येतात. या समितीने खरोखरच पंचायत राज क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधा करण्यासाठी योगदान देण्याची भूमिका घेण्याची गरज आहे. आजही ग्रामपंचाायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचे कामकाज करताना अनेक अडचणी येतात. त्यावर उपाययोजना सुचविल्यास या समितीची उपयुक्तता आणखी वाढेल.- राजू मगदूम सरपंच, माणगाव, ता. हातकणंगले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद