शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

धोबी तलाव, एसटीपी प्लान्ट, क्लस्टर पंचगंगा नदी प्रदुषणमुक्तीचा आराखडा : महिन्याभरात सुक्ष्म नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मांडण्यात आलेल्या २२० कोटींच्या आराखड्यात कपडे धुण्यासाठी धोबी घाट, जनावरांसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मांडण्यात आलेल्या २२० कोटींच्या आराखड्यात कपडे धुण्यासाठी धोबी घाट, जनावरांसाठी स्वतंत्र व्यवस्था, विसर्जन कुंड यासह इचलकरंजीतील सांडपाणी, औद्योगिक वसाहतीतील पाण्यावर प्रक्रिया, गावांना जलशुद्धीकरणासाठी निधी अशा वेगवेगळ्या बाबींचा समावेश आहे. या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन करुन त्याचा प्रस्ताव महिन्याभरात राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठीचा २२० कोटींचा आराखडा सादर केला. यानुसार कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, औद्योगिक वसाहती, जिल्हा परिषद, जलसंपदा अशा वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून, त्यांनी आपल्या पातळीवर प्रदूषण रोखण्यासाठीचा सूक्ष्म आराखडा तयार करावयाचा आहे. मंगळवारी सादर झालेला आराखडा हा ढोबळ असून, त्याचे सूक्ष्म नियोजन करून निधीसाठी राज्य शासनाकडे प्रस्तावित करावयाचा आहे.

-

धोबी तलाव, विसर्जन कुंड, जनावरांची स्वतंत्र सोय : महापालिका

कपडे धुण्यासाठी धोबी तलाव, जनावरे धुण्यासाठी स्वतंत्र सोय, गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जन कुंड महापालिकेने प्रस्तावित केले आहे. भविष्यातील नियोजन म्हणून १० एमएलडीचा एसटीपी प्लान्ट प्रस्तावित केला आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील ९६ पैकी ९१ एमएलडी सांडपाण्यावर शुद्धतेची प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते. उर्वरित ४ व ६ एमएलडी एसटीपीचे काम सध्या सुरू आहे. १२ पैकी ७ नाले एसटीपीला जोडले असून, उर्वरित ५ नाल्यांचे काम सुरू आहे.

---

पंचगंगा नदीच्या परिघातील नगरपालिका, औद्योगिक स्थिती अशी

कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी-पन्हाळा नगरपालिका

१७४ गावे (७ तालुके), ८ साखर कारखाने, ५ आसवन्या, ३ औद्योगिक वसाहती, ३ सहकारी औद्योगिक वसाहती, ३ अन्य औद्योगिक वसाहती,

३ हजार ५०० उद्योगांपैकी १०५ पाणी वापर करणारे मोठे उद्योग.

--

४०० उद्योगांवर नियंत्रण नाही...

इचलकरंजीतील घरगुती सांडपाण्याचे प्रमाण ३८ एमएलडी असून, २० एमएलडीवर प्रक्रिया केली जाते. उर्वरित १८ एमएलडी पाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळते. येथे घरोघरी उद्योग केले जातात व हे पाणी नाल्याद्वारे नदीत मिसळते. हे पाणी साठविण्यासाठी टँकर पुरविण्याचे नियोजन आहे. हे पाणी लिफ्ट करून सायझिंग (२५० युनिट) च्या पाण्यापासून बायोगॅस निर्मिती व रंगारी (१५० युनिट)च्या पाण्यावर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया करण्यात येणार आहे.

--

इचलकरंजी नगपालिका

सध्याचे २० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्र अद्ययावत करणे, २० एमएलडी क्षमतेचे नवे केंद्र उभारणे, ५ नाले वळवणे, जवळच्या गावांतील सांडपाण्याचे व्यवस्थापन, ६८ टेक्स्टाईलसाठी सीएईटीपी, घनकचरा व भूमिगत गटारे असे इचलकरंजी नगरपालिकेचे नियोजन आहे.

--

३९ गावांचे पाणी थेट नदीत

जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या १७४ गावांपैकी नदीजवळच्या ३९ गावांचे सांडपाणी थेट नदीत मिसळते. त्यात ११ गावे मोठी आहेत. यापैकी दोन-दोन गावांचे एक क्लस्टर करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना दीड कोटींचे बिनव्याजी कर्ज व सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्टसाठी २ लाख रुपये दिले आहे.

--

औद्योगिक

पंचतारांकित एमआयडीसी : ६ उद्योग

गोकुळ शिरगाव : ५ उद्योग

शिरोली : ४ उद्योग, येथील नागरी सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही.

सहकारी, साखर : सांडपाणी व घनकचरा प्रक्रिया व पुनर्वापर बंधनकारक

--