शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

धामणी प्रकल्प रखडल्याने धुंदवडेत जनआक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:03 IST

म्हासुर्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या धामणी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धामणी खोऱ्यातील अनेक गावांतील नागरिकांचा रविवारी धुंदवडे (ता. ...

म्हासुर्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या धामणी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धामणी खोऱ्यातील अनेक गावांतील नागरिकांचा रविवारी धुंदवडे (ता. गगनबावडा) येथे जनआक्रोश मेळावा झाला. यावेळी हजारो शेतकºयांनी घोषणाबाजी आणि मनोगताद्वारे सरकारचा निषेध करून आपल्या एकीची वज्रमूठ कायम राखण्याची शपथ घेऊन आगामी निवडणुकांवर बहिष्काराचा ठाम निर्धार व्यक्त केला.धामणी खोरे विकास कृती समितीच्या माध्यमातून हा जनआक्रोश मेळावा झाला. या मेळाव्यात हजारोंच्या समुदायाने प्रचंड घोषणाबाजी केली. येथील गावागावांतील निवडणुकांवर बहिष्काराचे ठराव धामणी विकास कृती समिती व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले असून, हजारो शेतकºयांच्या स्वाक्षºयांचे निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल, निवडणूक आयोग यांच्यासह जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे.पाणी पाणी म्हणत अनेक पिढ्या संपल्या; पण पाणी काही आलेच नाही. रखरखलेले जीवन आणि खुरटलेले संसार घेऊन जगणाºया धामणीवासीयांच्या भावनांचा बांध अखेर फुटला आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत अर्धेअधिक आयुष्य सरले. निदान आमच्या पोराबाळांच्या जीवनाचा तरी उद्घार होईल का? मायबाप सरकारचं इतके निष्ठूर का झाले असावे, अशाअनेक प्रश्नांची सरबत्ती करत शासनाप्रती धुंदवडे येथे जनतेने आक्रोश केला. यावेळी परिसरातील हजारो नागरिकउपस्थित होते.तब्बल १८ वर्षे धामणी प्रकल्प रखडल्याने येथील पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शासनाच्या प्रचंड बेफिकिरीमुळे या खोºयातील शेतकºयांना पाणी पाणी करावे लागत आहे. पावसाळयात अतिवृष्टी, तर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना अशा दुहेरी संकटात या खोºयातील शेतकरी सापडला असून, शेती व्यवसाय आतबट्टयाचा झाला आहे.सन २००० मध्ये ३.८५ टीएमसी साठवण क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. दोन तीन वर्षे चाललेले काम वगळता आजवर हा प्रकल्प रखडलेलाच आहे. दोन वर्षांपूर्वी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळूनही निविदा निघाली नसल्याने प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. अनेकदा आंदोलने करूनही येथील लोकांच्या न्याय मागणीला शासनाने केराची टोपलीच दाखविली. त्यामुळे ६० गावांतील जनतेने धामणी धरणाचे काम चालू होत नाही, तोपर्यंत पुढील सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे.‘लोकमत’मधील लेखाची चर्चा‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी रविवारच्या अंकात ‘जागर’ या सदरामध्ये लिहिलेल्या ‘निवडणुकांवर बहिष्कार हा पर्याय आहे का?’ या लेखाची चर्चा धुंदवडे येथे मेळाव्यात सुरू होती. अनेकांनी या लेखाचे कौतुक केले. वक्त्यांनी आपल्या भाषणात हा लेख अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले. धामणीवासीयांच्या पाठीशी नेहमी राहिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले.