शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

धामोडवाशीयानो सावधान ! फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 17:34 IST

water shortage Grampanchyat Kolhapur- धामोड (ता. राधानगरी) येथील ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या दीड वर्षापासूनची घरफाळा व पाणीपट्टीची जवळपास सोळा लाख रुपयांची वसुली थांबली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुली थकल्याने विज बिल भरणे कठीण झाले आहे. त्यातच वीज मंडळाने हे वीज बिल भरण्यासाठी वारंवार तगादा लावल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांनी दोन दिवसात थकित रक्कम न भरल्यास नाईलाजास्तव एक फेब्रुवारी पासून गावच्या पाणीपुरवठा बंद होणार आहे.

ठळक मुद्देधामोडवाशीयानो सावधान ! फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा होणार बंद थकबाकी वसुलीसाठी उचलले पाऊल

श्रीकांत ऱ्हायकरधामोड (ता. राधानगरी) :  येथील ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या दीड वर्षापासूनची घरफाळा व पाणीपट्टीची जवळपास सोळा लाख रुपयांची वसुली थांबली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुली थकल्याने विज बिल भरणे कठीण झाले आहे. त्यातच वीज मंडळाने हे वीज बिल भरण्यासाठी वारंवार तगादा लावल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांनी दोन दिवसात थकित रक्कम न भरल्यास नाईलाजास्तव एक फेब्रुवारी पासून गावच्या पाणीपुरवठा बंद होणार आहे.धामोड येथील ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये नऊनंबर, लाडवाडी, कुरणेवाडी, जाधववाडी व तुळशी धरण वसाहत या गावांचा समावेश होतो. या सर्व गावांसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. सध्या या सर्व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत आहे.

पण गेल्या दीड वर्षापासून ग्रामपंचायतीच्या मिळकत उत्पन्नातील घरफाळा व पाणीपट्टीचे जवळपास सोळा लाख रुपये थकल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी वाढली आहे. त्यातच थकीत वीज बिल भरण्यासाठी वीज महामंडळाने तगादा लावला आहे. पण ग्रामपंचायतीकडे हे वीज बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.वीजपुरवठा खंडित झाल्यास या सर्वच गावचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. याची पूर्व कल्पना म्हणून गावातून वारंवार दौंडी देऊन लोकांना पाणीपट्टी व घरफाळा भरण्याचे आवाहन केले आहे. पण लोकांनी या आवाहनाला दाद न दिल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने कालच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात गावकऱ्यांकडून घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य न मिळाल्यास एक फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा नाईलाजास्तव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण डिमांड व वसुली यांचा विचार केला असता लाईट बिल व इतर खर्चाचा ताळमेळ घालणे अशक्य असल्याची बाब सर्व सदस्यांना सांगीतली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय बैठकअंती घेतला आहे .-एल. एस. इंगळेग्रामसेवक, धामोड.

थकित घरफाळा व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन धामोड वाशीयांना वारंवार करून देखील ते भरण्याची तसदी त्यांनी न घेतल्याने नाईलाजास्तव ही कठोर पावले उचलावी लागणार आहेत .- अशोक सुतारसरपंच, ग्रामपंचायत, धामोड

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर