शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री की गुजरातचे?, सुषमा अंधारेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 16:25 IST

फडणवीस सूडबुद्धीचे, पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोप

उद्धव गोडसेकोल्हापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप करत, फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. आज, बुधवारी (दि. १६) कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सध्या राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने सुषमा अंधारे कोल्हापुरात आल्या आहेत. काल, कुरुंदवाड येथे त्यांची जाहीर सभा झाली. आज, बुधवारी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. 'महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचा डाव भाजपकडून सुरू आहे. फडणवीस यांच्या पुढाकारातूनच महाराष्ट्राला कंगाल केले जात आहे, त्यामुळे फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे आहेत?' असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपची महाराष्ट्रद्रोही भूमिका महाप्रबोधन यात्रेतून उघड करत राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.महाराष्ट्रात २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुका लागतील, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला. शिंदे गटातील फुटीर आमदारांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता वाढली आहे. त्यातून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असेही त्या म्हणाल्या.फडणवीस सूडबुद्धीचे, पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोपआमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईवर बोलताना अंधारे यांनी  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सूडबुद्धीचे आणि पक्षपाती राजकारण करत असल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह डॉ. सुजित मिणचेकर, रविकरिण इंगवले, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस