शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Kolhapur: वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी देवठाणे ग्रामस्थांत संताप, मठ ताब्यात घेण्याचा विचार

By उद्धव गोडसे | Updated: April 15, 2024 16:58 IST

महाराजांनी स्वत:हून हजर होण्याचे आवाहन, ग्रामस्थांकडून 'लोकमत'चे अभिनंदन

उद्धव गोडसेकोल्हापूर : देवठाणे (ता. पन्हाळा) येथील श्री नृसिंह समर्थ ज्ञान मंदिर मठाचे प्रमुख बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज या दोघांच्या विरोधात देवठाणे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तरुणीच्या खून प्रकरणी महाराज निर्दोष असतील तर, त्यांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होऊन खुलासा करावा. अन्यथा, मठ ताब्यात घेऊन महाराजांना हद्दपार करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देवठाणे येथील ग्रामस्थांनी दिली. मठात घडलेला गैरप्रकार बाहेर काढल्याबद्दल त्यांनी 'लोकमत'चे अभिनंदन केले.

गेली २०-२२ वर्षे बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज या दोघांवर नितांत श्रद्धा ठेवून भाविकांनी त्यांना गुरू मानले. त्यांना जमीन दिली. मठाच्या इमारती बांधायला पैसे दिले. तीर्थयात्रा करण्यासाठी मागेल तेवढ्या रकमा दिल्या. पंढरपूरमध्ये मठ घेण्यासाठी देणग्या गोळा केल्या. घरातील शुभकार्याचा मुहूर्त काढण्यापासून ते मुलांचे शिक्षण, लग्न अशा महत्त्वाच्या कामांमध्ये महाराजांचा सल्ला घेतला. मात्र, त्याच महाराजांसमोर एका तरुणीला होणारी जीवघेणी मारहाण ते थांबवू शकले नाहीत. त्यांच्या सल्ल्याने झालेल्या मारहाणीत तरुणीचा जीव गेल्याने देवठाणे परिसरातील ग्रामस्थांमध्ये महाराजांबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.गुन्हा दाखल झाल्यामुळे देवठाणे मठाची आणि महाराजांची बदनामी होत आहे. हे थांबवण्यासाठी दोन्ही महाराजांनी स्वत:हून पोलिसात हजर होऊन खुलासा करणे गरजेचे आहे. ते समोर येत नसल्याने दोषी असल्याचा संशय बळावत आहे. त्यांनी तातडीने पोलिसांसमोर येऊन आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट करावे, अन्यथा मठाचा ताबा घेऊन महाराजांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती देवठाणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

लक्ष्मीपुरी पोलिसांकडून तरुणीच्या खुनाचा सखोल तपास सुरू आहे. अजूनही अटकेतील संशयित आरोपी दोन्ही महाराजांना वाचवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. मठात घडलेला गैरप्रकार आणि दोन्ही महाराजांचे कारनामे चव्हाट्यावर आणल्याबद्दल देवठाणे येथील ग्रामस्थांनी 'लोकमत'चे अभिनंदन केले.

मारहाणीदरम्यान दोन्ही महाराज देवठाणे मठातवैष्णवीला मारहाण झालेल्या रात्री दोन्ही महाराज देवठाणे येथील मठात होते. पहाटे वैष्णवीची प्रकृती बिघडताच दोन्ही महाराजांनी पलायन केले. गावाकडील एका मठात जातो, असे सांगून गेलेल्या महाराजांचा मोबाइल नंबर अद्याप बंदच असल्याचे पोलिसांनी सांगितले.धार्मिक बाबींना विरोध नाहीचमठातील मंदिर आणि धार्मिक कार्यांना कोणाचाच विरोध नाही. धार्मिक, आध्यात्मिक कार्यांना ग्रामस्थांचे समर्थन आहे. मात्र, त्याआडून काही गैरप्रकार होणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. संशयित महाराजांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध व्हावा, यासाठी पोलिसांना निवेदन देणार असल्याचेही ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

मठाचा चांगला विनियोग होऊ शकतोमठात सध्या एक मंदिर आणि दोन हॉल आहेत. समोरच्या स्वतंत्र हॉलमध्ये छोटे समारंभ होऊ शकतात. रिकाम्या जागेत लग्न समारंभ, स्वागत समारंभ होऊ शकतात. यातून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू शकते. तसेच मंदिर आणि मठाची देखभालही होऊ शकते. याबाबत विचार सुरू असल्याची माहिती ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस