शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Kolhapur: वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी देवठाणे ग्रामस्थांत संताप, मठ ताब्यात घेण्याचा विचार

By उद्धव गोडसे | Updated: April 15, 2024 16:58 IST

महाराजांनी स्वत:हून हजर होण्याचे आवाहन, ग्रामस्थांकडून 'लोकमत'चे अभिनंदन

उद्धव गोडसेकोल्हापूर : देवठाणे (ता. पन्हाळा) येथील श्री नृसिंह समर्थ ज्ञान मंदिर मठाचे प्रमुख बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज या दोघांच्या विरोधात देवठाणे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तरुणीच्या खून प्रकरणी महाराज निर्दोष असतील तर, त्यांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होऊन खुलासा करावा. अन्यथा, मठ ताब्यात घेऊन महाराजांना हद्दपार करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देवठाणे येथील ग्रामस्थांनी दिली. मठात घडलेला गैरप्रकार बाहेर काढल्याबद्दल त्यांनी 'लोकमत'चे अभिनंदन केले.

गेली २०-२२ वर्षे बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज या दोघांवर नितांत श्रद्धा ठेवून भाविकांनी त्यांना गुरू मानले. त्यांना जमीन दिली. मठाच्या इमारती बांधायला पैसे दिले. तीर्थयात्रा करण्यासाठी मागेल तेवढ्या रकमा दिल्या. पंढरपूरमध्ये मठ घेण्यासाठी देणग्या गोळा केल्या. घरातील शुभकार्याचा मुहूर्त काढण्यापासून ते मुलांचे शिक्षण, लग्न अशा महत्त्वाच्या कामांमध्ये महाराजांचा सल्ला घेतला. मात्र, त्याच महाराजांसमोर एका तरुणीला होणारी जीवघेणी मारहाण ते थांबवू शकले नाहीत. त्यांच्या सल्ल्याने झालेल्या मारहाणीत तरुणीचा जीव गेल्याने देवठाणे परिसरातील ग्रामस्थांमध्ये महाराजांबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.गुन्हा दाखल झाल्यामुळे देवठाणे मठाची आणि महाराजांची बदनामी होत आहे. हे थांबवण्यासाठी दोन्ही महाराजांनी स्वत:हून पोलिसात हजर होऊन खुलासा करणे गरजेचे आहे. ते समोर येत नसल्याने दोषी असल्याचा संशय बळावत आहे. त्यांनी तातडीने पोलिसांसमोर येऊन आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट करावे, अन्यथा मठाचा ताबा घेऊन महाराजांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती देवठाणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

लक्ष्मीपुरी पोलिसांकडून तरुणीच्या खुनाचा सखोल तपास सुरू आहे. अजूनही अटकेतील संशयित आरोपी दोन्ही महाराजांना वाचवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. मठात घडलेला गैरप्रकार आणि दोन्ही महाराजांचे कारनामे चव्हाट्यावर आणल्याबद्दल देवठाणे येथील ग्रामस्थांनी 'लोकमत'चे अभिनंदन केले.

मारहाणीदरम्यान दोन्ही महाराज देवठाणे मठातवैष्णवीला मारहाण झालेल्या रात्री दोन्ही महाराज देवठाणे येथील मठात होते. पहाटे वैष्णवीची प्रकृती बिघडताच दोन्ही महाराजांनी पलायन केले. गावाकडील एका मठात जातो, असे सांगून गेलेल्या महाराजांचा मोबाइल नंबर अद्याप बंदच असल्याचे पोलिसांनी सांगितले.धार्मिक बाबींना विरोध नाहीचमठातील मंदिर आणि धार्मिक कार्यांना कोणाचाच विरोध नाही. धार्मिक, आध्यात्मिक कार्यांना ग्रामस्थांचे समर्थन आहे. मात्र, त्याआडून काही गैरप्रकार होणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. संशयित महाराजांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध व्हावा, यासाठी पोलिसांना निवेदन देणार असल्याचेही ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

मठाचा चांगला विनियोग होऊ शकतोमठात सध्या एक मंदिर आणि दोन हॉल आहेत. समोरच्या स्वतंत्र हॉलमध्ये छोटे समारंभ होऊ शकतात. रिकाम्या जागेत लग्न समारंभ, स्वागत समारंभ होऊ शकतात. यातून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू शकते. तसेच मंदिर आणि मठाची देखभालही होऊ शकते. याबाबत विचार सुरू असल्याची माहिती ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस